कल्याण-डोंबिवली घडामोडी

New District in Maharashtra : राज्यात नव्याने होणार २१ नवे जिल्हे?

New District in Maharashtra : महाराष्ट्र राज्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथील यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण होत आहे. याकरिता राज्यात २१ नवे जिल्हे बनविणार असल्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या यादीत ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्याचा देखील समावेश असून आता लवकरच कल्याण हा नवा जिल्हा होण्याची शक्यता आहे. याबाबत २६ जानेवारी रोजी अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजते. त्यामुळे २६ जानेवारी नंतर राज्यातील जिल्ह्यांची संख्या ३६ हुन ५७ पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ असे चार तालुके कल्याण तालुक्याला जोडलेले असून, कल्याण शहर हा सगळ्यांचा केंद्रबिंदू आहे. शिवाय आरटीओ, प्रांताधिकारी, न्यायालय, प्रादेशिक पोलिस विभाग अशी अनेक सरकारी कार्यालये कल्याण शहरात आहेत. त्यामुळे सगळ्याच दृष्टीने कल्याण सोयीस्कर पडत असून, कल्याण हा स्वतंत्र जिल्हा झाल्यास त्याचा लाखो लोकांना फायदा होणार आहे.

ठाणे जिल्ह्याचे या अगोदरही विभाजन होऊन पालघर जिल्हा वेगळा झाला होता. त्याच पालघर मधून जव्हार देखील अलिप्त होण्याचा प्रस्ताव आता ठेवण्यात आला आहे. तसेच ठाण्यातून कल्याण व मीरा भाईंदर देखील वेगळे होण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याचे मागील काही वर्षांत पाच भागांत विभाजन होत असल्याचे पहायला मिळत आहे. कल्याण सह आणखीन २० नव्या जिल्ह्यांचे प्रस्ताव असून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अशी शक्यता दरवर्षी वर्तवण्यात येते परंतु प्रत्यक्षात घोषणा मात्र केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

प्रस्तावित २१ नवे जिल्हे:-
कल्याण (ठाणे), मीरा भाईंदर (ठाणे), जव्हार (पालघर), महाड (रायगड), बारामती (पुणे), मंडणगड (महाड), माणदेश (सांगली,सातारा,कोल्हापूर), मालेगाव (नाशिक), कळवण (नाशिक), भुसावळ (जळगाव), उदगीर (लातूर), अंबेजोगाई (बीड), किनवट (नांदेड), खामगाव (बुलडाणा), पुसद (यवतमाळ), अचलपूर (अमरावती), साकोली (भंडारा), शिर्डी (अहमदनगर), संगमनेर (अहमदनगर), श्रीरामपूर (अहमदनगर), अहेरी (गडचिरोली).

New District in Maharashtra : Will there be 21 new districts in the state?

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *