ऑल इंडिया काँग्रेस सोशल ऑर्गनायझेशन ने या वर्षी आंतरराष्ट्रीय पीस अवार्ड चे आयोजन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त दिल्ली येथील संविधान सभा (कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडिया ) येथे २ ऑक्टोबर रोजी केले होते. देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथील एका विशेष कार्यक्रमात टिटवाळयातील युवा उद्योजक डॉ.आनंद कासवेकर यांना मान्यवरांच्या हस्ते “महात्मा गांधी शांती पुरस्कार २०२१” देऊन गौरविण्यात आले.
टिटवाळा येथील जय भवानी इंटरप्राइजेस व जे बी ग्रुप कंपनीचे डायरेक्टर डॉ. आनंद कासवेकर यांनी ‘रियल इस्टेट डेव्हलपर्स’ क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले. युवकांना त्यांनी रोजगार प्राप्त करून देऊन त्यांना रिअल इस्टेट बद्दल मार्गदर्शन करून स्वयंसिद्ध केले. कोरोना काळात बरेच लोकउपयोगी कार्य त्यांनी केले.

हा पुरस्कार संपूर्ण भारतातील सामान्य जीवन ते त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय प्रवास करणाऱ्या मान्य वरांना दिला जातो. अशा मान्यवरांना ऑल इंडिया काँग्रेस सोशल ऑर्गनायझेशन हि संस्था त्यांना पुढिल उंतुग प्रवासा साठि कौतुकाची थाप म्हणुन पुरस्कार देऊन सन्मानित करतात. हि संस्था २००८ पासुन विविध क्षेत्रातील मान्यवरांचे पुरस्कार देऊन दर वर्षी २आॉक्टबर रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
डॉ. आनंद कासवेकर हे गेली २००८ पासुन रिअल इस्टेट & डेव्हलपर या क्षेत्रात काम करत आहे.
२००८ मध्ये एक रिअल इस्टेट एजंट म्हणुन मुंबई मध्ये काम चालू केले ते २०१४ पर्यंत ते पुर्ण महाराष्ट्रभर काम करु लागले. महाराष्ट्रात कुठे ही एखाद्या ग्राहकाला जमीन /घर खरेदी करायचे असेल तर त्याची आपण उपलब्धता करुन देतो. तसेच घर,बंगला,फार्म हाऊस यांचे ही बांधकाम त्यांची कंपनी करते. २०१४ नंतर त्यांनी महाराष्ट्र बाहेर ही कामे करायला सुरुवात केली. आता संपूर्ण भारतात मी माझ्या सर्व सामान्य ग्राहक ते श्रीमंत यांना सेवा देण्याचे काम करत आहे. विशेष म्हणजे मी सर्व सामान्य ग्राहकांना त्यांच्या बजेट नुसार घरांची उपलब्धता करुन देतो. असे त्यांनी या वेळी सांगितले. घनःश्याम कोळंबे (एम्पॉवर ट्रेनर प्रा. लि.), सुरट माटे (ट्रेडिंग सर्विसेस), डॉ राज काले (इंटरनेशनल ट्रेनर), राजेश वारणकर यांची विशेष साथ त्यांना मिळाली.
-जैनेन्द्र सैतवाल