खोणी-तळोजा महामार्गाच्या जवळपास असलेल्या चिरड गावचा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. सध्या या पुलाचे संरक्षक कठडे कोसळले असून पुलाच्या कठड्यांना बांबूच्या काठ्यांचा आधार दिलेला आहे. मात्र हा पूल जीर्ण झाल्याने कोसळण्याची भीती व्यक्त गावकऱ्यांकडून केली जात आहे.
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात असलेल्या चिरड शेलारपाडा या गावांच्या जोड रस्त्याला असलेला पूल हा वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या पुलावरून नागरिक ये-जा करत असल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र असे असताना प्रशासनासह लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने त्यांचं हे दुर्लक्ष अपघातांना निमंत्रण देऊ शकत असं येथील लोकांचं म्हणणं आहे.
माजी मंत्री शबीर शेख यांच्या कार्यकाळात २६-२७ वर्षांपूर्वी या पुलाचे काम झाले होते. मात्र त्या नंतर या पुलाचे कोणत्याही प्रकारचे काम झालं नसल्याने सध्या या पुलावर अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. चिरड गाव हा खोणी तळोजा या महामार्गाला लागूंन असल्यानं वाहनांची मोठ्या प्रमाणात या पुलावरून ये जा होत असते. त्यामुळे या पुलावर अपघात होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी बांबुच्या काठ्यांचा आधार दिला आहे. मात्र अधिक पाऊस झाला आणि या पुलामुळे अपघात घडल्या नंतर प्रशासनाला जाग येणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
-संदेश दाभणे