कल्याण : वालधुनी नदी विकासाचा प्रस्ताव हा गेली कित्तेक वर्षे शासन दरबारी अक्षरशः धूळ खात पडलेला आहे. जागृत नागरिकांनी हा मुद्दा मंत्रालय, जिल्हाधिकारी आणि खालील नगरपालिका आणि महानगरपालिकांमधे गेली अनेक वर्षे लावून धरला आहे. तरी वालधुनी नदीच्या ताकास अद्यापि तूर लागलेला नाही. त्यामुळे नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी ( Eknath Shinde ) वालधुनी नदी विकासाच्या खेळखंडोब्यास न्याय देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. २००५ च्या प्रलयंकारी […]