Shrikant Shinde : खासदारांच्या दौऱ्यात कल्याण पूर्वेच्या शाखेत राढा? ‘ही’ माहिती आली पुढे

Shrikant Shinde :- शिवसेना कल्याण उपशहर संघटक आशा रसाळ यांनी खासदार श्रीकांत शिंदेच्या कॉलरला धरून शिवसेनेच्या शाखेबाहेर काढले असल्याची एक पोस्ट काल पासून समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. श्रीकांत शिंदे यांनी काल कल्याण पूर्वेचा दौरा केला होता. याचदरम्यान कोळसेवाडी येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेत हा प्रकार घडला असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात होता. व असे कोणतेही कृत्य घडले नसून अज्ञात इसमाने ही पोस्ट व्हायरल केली असल्याचा खुलासा आशा रसाळ यांनी स्वतःच आता पोलिसां समोर केला आहे. पक्षांतर्गत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी तरी करीत असल्याचे सांगत अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोस्ट मागे कोणाचा हात आहे हा तपास सध्या पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती कल्याण परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे.

शिवसैनिकांनी मध्यवर्ती शाखेला टाळे ठोकले होते. यानंतर शिंदे समर्थकांनी कुलूप तोडले असून श्रीकांत शिंदे यांनी आत प्रवेश करू नये म्हणून आशा रसाळ यांनी त्यांना आत जाण्यास प्रतिबंध करीत गदारोळ केला असल्याचे व्हायरल पोस्ट मध्ये नमूद केले आहे. मात्र आता या पोस्ट बाबत त्यांना कसलीही कल्पना नसून अज्ञात इसमाने तेढ निर्माण करण्यासाठी हे केले असावे असा खुलासा त्यांनी स्वतः पोलिसांसमोर केला असल्याची माहिती स्वतः पोलिसांनी दिली आहे. आता यामागे कोण होते ? हा तपास सायबर सेल कडे सुपूर्द करण्यात आलेला आहे.

-संतोष दिवाडकर

Shrikant Shinde: Dispute in Kalyan East branch during MP’s visit? Sensation by viral post

Eknath Shinde : नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी वालधुनी नदी विकासाच्या खेळखंडोब्यास न्याय देण्याची मागणी  

कल्याण : वालधुनी नदी विकासाचा प्रस्ताव हा गेली कित्तेक वर्षे शासन दरबारी अक्षरशः धूळ खात पडलेला आहे. जागृत नागरिकांनी हा मुद्दा मंत्रालय, जिल्हाधिकारी आणि खालील नगरपालिका आणि महानगरपालिकांमधे गेली अनेक वर्षे लावून धरला आहे. तरी वालधुनी नदीच्या ताकास अद्यापि तूर लागलेला नाही. त्यामुळे नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी ( Eknath Shinde ) वालधुनी नदी विकासाच्या खेळखंडोब्यास न्याय देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.  

२००५ च्या प्रलयंकारी महापुरा नंतर मुंबईतील मिठी आणि ठाणे जिल्ह्यातील मलंग गडाच्या पायथ्याशी उगम पाऊन, पुढे अंबरनाथ नगरपालिका, उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातून वाहणारी वालधुनी नदी चर्चेत आली. कारण या नद्यांमुळे या शहरांत महापुरात मोठी जिवित आणि वित्तहानी झाली होती. तत्कालिन सरकारने त्या नंतर लगेच, दोन्ही नद्यांचा विकास करण्याचा प्रस्ताव पारित केला होता. 

यातील मिठी नदी विकासाचे काम एमएमआरडीएकडे सोपवून काही वर्षात पूर्ण करण्यात आले. त्या नंतरच्या काळात मिठी नदीच्या पुरामुळे उद्भवणारी मुंबईतील समस्या सुटली. मात्रं वालधुनी नदी विकासाचे काम जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत स्थानिक प्रशासनाच्या माथी मारण्यात आले. वेग वेगळ्या शहरातील स्थानिक प्रशासनातील समन्वयाच्या व निधीच्या अभावामुळे वालधुनी नदी विकासाचा मुद्दा कळीचा झाला आहे.

येथिल नागरिक मात्रं, पूर आणि प्रदूषणाच्या जीवघेण्या विळख्यात अडकले आहेत. त्यामुळे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कर्मभूमी मधिल जटिल समस्यांचे मार्ग सुकर करावेत अशी मागणी विनोद शिरवाडकर यांनी केली आहे.

-कुणाल म्हात्रे

Newly elected Chief Minister Eknath shinde demands justice for Valdhuni river development