लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात अडकलेल्या कल्याण पूर्व तिसगाव नाका परिसरातील एका व्यवसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत जनमत वृत्त संस्थेचे याच भागात वास्तव्यास असणारे पत्रकार आनंद गायकवाड यांनी आपल्या शब्दात एक लेख प्रसिद्ध केला आहे.
पत्रकार आनंद गायकवाड यांचा लेख खालीलप्रमाणे :-
गेली ३० ते ३५ वर्षे अनेक संकटांवर मात करीत आपल्या कुटूंबियांच्या उपजिविकेची समर्थ पणे जबाबदारी पार पाडणाऱ्या कल्पाण पूर्वेतील एका प्रिन्टींग प्रेस व्यवसायीकाने लॉकडाऊन मुळे आर्थिक संकटात सापडल्याने अखेर गळफास लावून आपले जिवन संपवल्याची ह्यदस्पर्शी घटना कल्याण पूर्वेतील तिसगांव नाक्यावर सोमवारच्या रात्री घडली आहे . तिसगांव नाक्यावरील मातोश्री इमारती मध्ये रहाणारे बंडू श्रीराम पांडे असे या व्यवसायीकाचे नांव असून अवघ्या ५६ वर्षे वयाच्या या दुदैवी व्यवसायीकाच्या पश्चात पत्नी आशा ( ५१ ) विवाहीत मुली चेतना ( २८ ) , रोशनी ( २६ ) आणि अविवाहीत मुलगी श्रुतीका असा परिवार आहे.
वर्धा जिल्ह्यातील पुलगांव या आपल्या मुळगावाहून ८० च्या दशकात व्यवसाया निमित्त कल्याण पूर्वैत स्थानिक झाल्या नंतर बंडू पांडे यांचा ओम शांती प्रिन्टर्स या नावाने प्रिटींग प्रेस चा व्यवसाय मोठ्या जोमात चालला होता. गेल्या ६ ते ७ वर्षा नंतर त्यांनी उल्हासनगर कॅम्प नं . ३ मध्ये आपल्या व्यवसायात जम बसविला होता. या दरम्यान त्यांच्या वर अनेक संकटे आली. अशाही परिस्थितीत त्यांनी प्रत्येक संकटावर मात करून आपल्या व्यवसायात भरभराट निर्माण केली होती. परंतु गेली १७ ते १८ महिने कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे प्रिटींग प्रेसचा व्यवसाय पुर्ण पणे ठप्प झाला होता. अशातच उल्हास नगर कॅम्प नं. ३ मधील प्रेस च्या गाळ्याचे भाडेही वाढू लागल्याने त्यांनी गेल्या पंधरा दिवसां पासून प्रिन्टींग प्रेसचे साहित्य विकण्यास सुरुवात केली होती. या सर्व परिस्थितीमुळे नैराश्य आल्याने त्यांनी सोमवारच्या रात्री घरातील एका खोलीत जाऊन पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या समयी त्यांची पत्नी आणि दोन मुली दुसऱ्या रुम मध्ये होत्या. फाशी घेण्यापूर्वी त्यांनी हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातून जिव जात नसल्याने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी नागरीकांकडून सांगितले जात आहे.
अत्यंत कष्टमय जिवन जगत असतांनाच त्यांनी आपल्या एका मुलीला डॉक्टर केले आहे. त्यांनी काही काळ एका पतसंस्थेत वसुली अधिकारी म्हणूनही पार्ट टाईम नोकरी केली होती. अखेर लॉकडाउने निर्माण केलेल्या आर्थिक संकटामुळे आलेल्या नैराश्येतून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पार्थिवावर विठ्ठलवाडी स्मशान भूमीत मोठ्या शोकाकूल वातावरणात त्यांच्या मुलींनी मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आला. या समयी समर्थ मित्र मंडळ, तिसाई नागरी सहकारी पतपेढीचे सर्व सदस्य, पदाधिकारी तसेच त्यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लेखणी :- आनंद गायकवाड (पत्रकार)
लॉकडाऊनमुळे अनेक व्यापारी क्षेत्रातील लोक सध्या अडचणीत आणि तणावात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सतत लादल्या जाणाऱ्या निर्बंधांचा परिणाम अनेक व्यावसायिकांवर होताना दिसत आहे. यामुळे हसत्या खेळत्या कुटुंबांच्या चेहऱ्यावर सुखाची चिन्हे दिसेनाशी होऊ लागली आहेत. कोरोना महामारीमुळे प्रशासनाची नामुष्की असल्याने लॉकडाउन रुपी संकट आ वासून उभे आहे. परंतु आत्महत्या हा यावर मार्ग नसून एका वादळाप्रमाणे सामना करा हे ही दिवस बदलतील. शेवटी जीवनच महत्त्वाचे आहे. संयम ठेवा आत्महत्या करू नका असे आवाहन आमच्या कडून केले जात आहे.
-संतोष दिवाडकर