कल्याण-डोंबिवली घडामोडी

उंबर्डे रिक्षाचालक हत्येचा लागला शोध; हत्येप्रकरणी एकाला अटक

कल्याण :- दोन दिवसापूर्वी पहाटेच्या सुमारास एका रिक्षाचालकाचा हत्येमुळे कल्याण पश्चिम उंबर्डे परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अवघ्या २४ तासांत पोलिसांनी रिक्षाचालक अभिमान भंडारी याची हत्या करणाऱ्या सोपान पंजे या आरोपीला अटक केली आहे. ‘विकृतीने केला घात, दुसऱ्यांच्या घरात डोकावणे पडले महागात’ अशी माहिती पोलिसांनी देऊन याच कारणाने आरोपीने हत्या केल्याचे कबुली दिली आहे.

कल्याण पश्चिमेत उंबर्डे गावात रिक्षा चालक अभिमान भंडारी याची पहाटेच्या सुमारास धारदार शस्त्रने हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली होती. या हत्येमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली होती. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत हत्या का व कोणी केली याचा तपास सुरू केला. अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी या हत्येचा छडा लावला. अभिमान याची हत्या करणाऱ्या सोपान पंजे या आरोपीला पोलिसांनी अटक केली. दरम्यान मयत अभिमान हा रात्री अपरात्री पंजे याच्या वहिनीच्या बेडरुमच्या खिडकीत डोकवायचा. त्याने अनेकदा अभिमानला समज दिली मात्र तो ऐकत नसल्याने सोपान याने अभिमान भंडारी याची हत्या केली असल्याची कबुली दिली आहे.

दरम्यान उमेश माने पाटील (कल्याण एसीपी) यांनी हत्याचे कारण सांगत वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक पवार आणि तपास पथकाने यावेळी आरोपी सोबत पत्रकार परिषदेत घेतली.

-रोशन उबाळे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *