बांग्लादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन देशांत नुकतीच पाच सामन्यांची टी-20 मालीका संपन्न झाली. या मालिकेत बांग्लादेशने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 4-1 ने पराभूत करत ट्रॉफी उचलून सेलिब्रेशन केले. तर याचबरोबर ऑस्ट्रेलियाला मात्र छोट्या संघासोबत झालेला मोठा पराभव जिव्हारी लागला आहे. मात्र या पराभवाला त्यांचा ‘इगो’ कारणीभूत असल्याचे नेटकरी म्हणत आहेत.
बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टी-20 मालिकेतील पहिले तिन्ही सामने बांग्लादेशने जिंकून मालिका ताब्यात घेतली. चौथ्या सामन्यात कसाबसा ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. सोमवारी झालेल्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाने फक्त 122 धावांवर बांग्लादेशला रोखले. 123 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने मात्र नांगीच टाकली. एकामागोमाग एक असे सारे फलंदाज तंबूत परतले आणि संपूर्ण बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा संघ बांग्लादेशच्या निम्म्या मात्र ६२ धावांवर गारद झाला.

बांग्लादेश सारख्या दुबळ्या संघाबरोबर झालेला इतका मोठा पराभव ऑस्ट्रेलिया विसरणार नाहीच. तर मिळालेला विजय बांग्लादेश साठी प्रेरणादायी ठरणार आहे. मात्र या पराभवा मागे ऑस्ट्रेलियाचा इगो नडला असे नेटकरी म्हणत आहेत. बांग्लादेश संघाला हलक्यात घेण्याची चूक ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅनेजमेंट आणि निवड समितीने केली. यात त्यांनी वॉर्नर,स्मिथ,मॅक्सवेल आणि इतर दिगग्ज खेळाडूंना विश्रांती देत कमी अनुभव असलेल्या खेळाडूंना दौऱ्यावर पाठवले. याचमुळे ऑस्ट्रेलियाला पराभव पहावा लागला असे नेटकरी म्हणत आहेत.
ऑस्ट्रेलिया संघ: मॅथ्यू वेड (कर्णधार), जोश फिलिप, मिचेल मार्श, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, एश्टन टर्नर, एश्टन अगार, वेस अगार, एलेक्स केरी, अँड्र्यू टाय, एडम झांपा, जोश हेजलवूड, मोईसेस हेन्रिक्स, बेन मॅकडरमॉट, डॅन ख्रिश्चन, रिले मेरीडिथ, जेसन बेहरनडोर्फ, नेथेन ईलिस, तनविर संघा.
भारताचा संघ देखील नवख्या खेळाडूंना घेऊन श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. सुरुवातीला 2-1 ने वनडे मालिका जिंकली मात्र नंतर भारताने सुद्धा 2-1 ने टी-20 मालिका गमावली. पुढील काळात आयपीएल संपल्यावर टी-20 वर्ल्डकप रंगणार आहे. यादरम्यान अनेक लहानसहान संघ यात समाविष्ट असणार आहेत. अशात कोणत्याही संघाला कोणी हलक्यात घेऊ नये हे आता स्पष्ट झाले आहे. कारण छोट्या संघाला हलके घेण्याच्या नादात वर्ल्डकप मध्ये आयर्लंडचा संघ बलाढ्य इंग्लंडवर भारी पडताना दिसला आहे.
-संतोष दिवाडकर