कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याण उल्हासनगरच्या काही भागांत भटक्या कुत्र्यांची नागरिकांत दहशत

कल्याण :- पूर्वेतील आडीवली तसेच उल्हासनगर मधील काही भागांमध्ये कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. लहान मुलांचे लचके तोडण्याचा प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावी असं स्थानिकांचे म्हणणे आहे.

कल्याण पूर्व आडीवली ढोकळी तलावाजवळील कचराकुंडीच्या शेजारी असलेल्या कृष्ण नगरीच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू असून लहान मुलांना कुत्र्या कडून चावे घेण्याचे प्रकार घडत असून स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. लहान मुलांना कुत्र्याकडून चावे घेण्याच्या प्रकारात वाढ होत असून पालिका प्रशासनाने या परिसरातील भटक्या कुत्र्यांवर आळा घालून त्यांचं निर्बीजीकरण करणं गरजेच मानलं जातं आहे.

उल्हासनगरमध्ये रात्रंदिवस झुंडीने भटक्या कुत्र्यांचा वावर असून रात्री बाहेर फिरणं देखील नागरिकांना कठीण झालेय आहे. महानगरपालिकेने नियुक्त केलेला ठेकेदार नक्की शहरात कार्यरत आहे काय? असा प्रश्न निर्माण होतोय. एखाद्या बालकाचा जीव जाण्यापूर्वीच प्रशासन जागे झालं तर अनुचित प्रकार टाळता येईल एवढ मात्र नक्कीच.

-संतोष दिवाडकर

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *