कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे आकडे भलतेच वाढताना दिसत आहेत. मात्र असे असतानाही लोकांचा यावर विश्वास नसल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. मात्र पालिका प्रशासन याबाबतीत कठोर निर्णय घेताना दिसत आहे. आता पालिके बरोबर पोलीस प्रशासनाने देखील आपली भूमिका पालिका आयुक्तांकडे मांडली आहे.
क.डों.म.पा. क्षेत्रात आजपासून सरकारच्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी होणार आहे. या साठी पालिका मुख्यालयात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, दोन्ही सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच महापालिका अधिकारी यांची बैठक पार पडली. निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी काय केले पाहिजे यावर बराच वेळ चर्चा झाली. कोरोनाचे प्रादूर्भाव रोखण्यासाठी जे काही करायचे ते सरकार करणार आहे. महापालिका आयुक्तांनी सांगितले की, निर्बधाच्या अंमलबजावणीसाटी प्रशासन सज्ज आहे. मंगल कार्यालय आणि भाजी मंडईवर विशेष नजर ठेवली जाईल. नियमांचे उल्लंघन केल्यास तर मंगल कार्यालये ३० एप्रिलर्पयत सिल करण्यात येतील.
विनामास्क फिरणाऱ्यांची होऊ शकते रुग्णालयात रवानगी :-
महापालिका अधिका:यांसोबत पोलिस सुद्धा निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी सज्ज झाले आहेत. विना मास्क फिरणा:या नागरीकांवर केवळ दंडात्मक कारवाई करणार नाही तर त्यांना पोलिस ठाण्यात नेऊन त्यांची प्रथम अँटीजेन टेस्ट केली जाईल. यामध्ये व्यक्ती पॉझीटीव्ह आझळल्यास त्याची रवानगी थेट रुग्णालयात केली जाईल असा निर्णय कल्याण पोलिसांनी घेतला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली आहे.