कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याण पश्चिम उंबर्डे गावात रिक्षा चालकाची हत्या; अनुचित प्रकारातुन हत्या झाल्याचा संशय

कल्याण :- शहराच्या पश्चिम भागातील उंबर्डे गावात शनिवारी पहाटे अज्ञात व्यक्ती कडून रिक्षा चालकाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे नक्की कोणत्या कारणाने निर्घृणपणे हत्या केली ? हे समजू शकलेले नाही. खडकपाडा पोलिसां समोर या खुनाचा तपास करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ही हत्या काही अनुचित प्रकारातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून तशी परिसरात चर्चा सुरु असल्याचे समोर येत आहे.

उंबर्डे गावात रिक्षा चालक अभिमान दत्तू भंडारी वय ५३ वर्षे यांची सकाळी उंबर्डे या ठिकाणी हत्या करण्यात आली. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पहाटेच्या सुमारास आपल्या कामासाठी घराबाहेर रिक्षा घेऊन जात असावेत. त्यामुळे नक्की काय कारण असेल याचे तर्कविर्तक लढविले जात आहेत. काही अनुचित प्रकारातून ही हत्या झाल्याची चर्चा परिसरात दबक्या आवाजात केली जात आहे.

सर्व प्रकारचा मागोवा आणि या प्रकरणाची अधिक माहिती सूत्रांकडून पोलिस घेत आहेत. लवकरच हत्येतील आरोपी आणि हत्येचे कारण समोर येण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत. दरम्यान खडक पाडा पोलिसांनी भादवि कलम ३०२, ३४ अन्वेय गुन्हा नोंदवला आहे.

-रोशन उबाळे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *