पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंदीय मंत्रिमंडळात भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांची वर्णी लागली होती. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विविध विधानसभा क्षेत्रातून पाच दिवस त्यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू असणार आहे. कल्याण पूर्व भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात पहिल्या दिवसाची सांगता करण्यात आली.
सोमवारी सकाळपासूनच केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यात आली. ठाणे, कळवा, मुंब्रा झाल्यानंतर शिळफाटा मार्गे ते कल्याण डोंबिवलीच्या दिशेने निघाले. येथून कल्याण ग्रामीण, डोंबिवली आणि कल्याण पूर्व अश्या तीन विधानसभा मतदारसंघात ते फिरण्यासाठी निघाले होते. कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तिथून पुढे ही यात्रा डोंबिवलीकडे निघाली. त्यानंतर रात्री कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयावर आल्यानंतर त्यांच्या पहिल्या दिवसाच्या यात्रेचा समारोप करण्यात आला. याठिकाणी स्थानिक आमदार गणपत गायकवाड तसेच केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले.

आज पहिल्या दिवसाची जन आशिर्वाद यात्रा ठाणे, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पू. असा प्रवास करत संपन्न झाली. कल्याण पू. येथील आमदार मा. श्री. गणपत गायकवाडजी यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे या यात्रेचा समारोप झाला. सर्वच ठिकाणी जनतेचा या यात्रेसाठी उदंड प्रतिसाद लाभला. मा. मोदी साहेबांनी ठाणे जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्राला एवढी मोठी जबाबदारी देऊन ठाणे जिल्ह्याचा सन्मान केला आहे. अशी भूमिका मी यावेळी मांडली. केंद्रीय राज्यमंत्री म्हणून नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या विभागातील जनतेशी संवाद साधण्याची संधी आज मिळाली. आपल्या साऱ्यांचे मिळालेले हे प्रेम, हा आशिर्वाद माझ्यासाठी अमूल्य आहे.
– कपिल पाटील (केंद्रीय राज्यमंत्री)

-संतोष दिवाडकर