डोंबिवली :- ठाकुर्ली जवळील खंबाळपाडा मच्छी विक्रेत्या महिलेला तिच्या व्यवसायात मदत करणाऱ्या सहकाऱ्या सोबत तिच्या दिराने वाद घातला. आणि रागाच्या भरात त्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र या वादात स्व:ताचाच जीव गमावल्याची घटना समोर आली आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय ही वर्तविण्यात येत आहे.
भानुदास चौधरी हे मासळी विकन्याचा व्यवसाय करतात. तसेच त्यांची वहिनी ही मासळी विकण्याचा व्यवसाय करीत असे. मात्र हितेश उर्फ काळ्या नकवाल हा फक्त भानुदास चौधरी यांच्या वाहिनीस व्यवसायात मदत करीत असे. आणि हा राग मनात ठेवून अनेक वेळा दोघांमध्ये भांडणही व्हायची. यानंतर पुन्हा एकदा असाच प्रकार झाला. दोघामध्ये कडाक्याचे भांडण झाले. भानुदास ने हितेश यास शेतावर बोलावले. भानुदास ने माझ्याकडे तलवार आहे असे त्यांना धमकावले. मात्र हितेश काल्याने तीच तलवार घेऊन भानुदास यांचा गळा चिरला. त्यात ते जखमी होऊन मरण पावले. सदर तक्रार त्यांच्या पुतण्याने टिळक नगर पोलिसात केली आहे.
दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अजय अफाले यांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून हत्येतील आरोपी गुन्हेगार पार्श्वभूमीचा आहे. यावर अधिक तपास केला जात असून विविध बाजूने हत्येच्या कारणांचा शोध सुरू असल्याचे पोलीसां कडून सांगण्यात आले आहे.
-संतोष दिवाडकर