कल्याण-डोंबिवली घडामोडी

दुसऱ्या राज्यातील निवडणूका जिंकण्यासाठी भाजपने महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम थांबवावे; कल्याण मधील पदयात्रेतून नाना पटोलेंचं भाजपला आवाहन

कल्याण :  खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढ, वाढलेली महागाई, बेरोजगारीला भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत कॉंग्रेसने रविवारी कल्याणात जनजागरण अभियान अंतर्गत पदयात्रा काढली होती. या पदयात्रेत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह शेकडो कॉग्रेस  कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते. भाजप सरकारच्या काळात जनतेची लूट सुरू असून ही जनजागरण मोहीम महाराष्ट्रात नव्हे तर देशात राबवली जाते. भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचा काँग्रेसचा संकल्प असल्याचे नाना पटोले यांनी सांगत भाजप सरकारवर सडकून टीका केली.

कल्याणच्या सहजनानंद चौकात महागाई विरोधात आकाशात काळे फुगे सोडून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. त्यानंतर जनजागरण यात्रेला सुरुवात होऊन सहजानंद चौक ते बैलबाजार्पयत गेली. काँग्रेसची भूमिका आम्ही वारंवार स्पष्ट केली आहे. कोणाच्याही व्यक्तिगत प्रश्नामध्ये काँग्रेस कधीही हस्तक्षेप करणार नाही. ही भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार या दोघांच्या व्यक्तव्यामध्ये आम्हाला काही ही स्वारस्य नाही, असं पटोले म्हणाले.

विधान परिषदेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी खदखद व्यक्त केली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपमध्ये मोठया प्रमाणात खदखद सुरु आहे. हे तर स्पष्ट आहे. त्याचे परिमाण काय होणार हे पुढच्या काळात समजेल, असं सूचक विधान त्यांनी केलं. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना सैतान संबोधलं. त्यावरून पटोले यांनी सदाभाऊंना टोला लगावाल. ते पण मंत्री होते. आपण कोणावर या पद्धतीचे वक्तव्य करण्यापेक्षा आपणही आधी आपल्याला समजून घेतले पाहिजे. ही काही महाराष्ट्राची परंपरा नाही. गुजरातची परंपरा सदाभाऊनीं आणली असेल तर मला माहिती नाही, असा टोला त्यांनी लगावला.

काँग्रेसने क्रूझ पार्टीच्या बाबतजी भूमिका स्पष्ट केली तीच पूढे येत आहे. क्रूझ पार्टीत भाजपच्या लोकांचा  हात आहे. भाजपच्या लोकांनी हे प्रकरण ठरवून केले आहे. जेव्हा उत्तर प्रदेश आणि इतर राज्यात निवडणूका येतात. तेव्हा भाजप महाराष्ट्राला प्रचाराचे साधन बनवून बदनाम करते. हे आपल्याला सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात दिसून आले. बिहारच्या निवडणूकीच्यावेळी सुशांतसिंहचे प्रकरण आणले होते. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केंद्र सरकारने थांबावे. महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम कदापि खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

-कुणाल म्हात्रे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *