Shocking !!! कल्याणमध्ये कोरोनाने तोडले सर्व रेकॉर्ड – झाली विक्रमी नोंद

क.डों.म.पा. क्षेत्रात कोरोनाचा नुसता हाहाकार माजला असल्याचे दिसून येत आहे. मागील काही आठवड्यापासून वाढते आकडे थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. आज मंगळवार दि. २३ मार्च २०२१ रोजी कोरोनाच्या आकड्याने विक्रमी नोंद केली आहे. महानगरपालिका क्षेत्रात आज तब्बल ७११ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत ७०० चा आकडा प्रथमच पार झालेला असून हा कोरोनाचा हायस्कोर बनला असून संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनू लागला आहेत.

२२ मार्च २०२० रोजी लोकडाऊन घोषित करण्यात आले होते. सध्या लोकडाउनमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी महापालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी कडक निर्बंध बनविले होते. मात्र इतके करूनही कोरोनाचा आकडा काही केल्या थांबताना दिसत नाही. मंगळवारी सायंकाळी आकडा बाहेर पडताच पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. यानंतर आता पालिका आयुक्त कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.

आजच्या ७११ रुग्णांसह महापालिका क्षेत्रात आता एकूण ५४५९ कोरोना संक्रमित रुग्ण उपचार घेत आहेत. आज दिवसभरात कोरोनाने तीन रुग्ण दगावल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. वाढलेल्या आकड्या समवेत ४०४ रुग्णांना आज डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे. मात्र असे असले तरी अधिक काळजी घेणे आता गरजेचे ठरू लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली जिल्हा कार्यकारिणी जाहीर -पदांचे वाटप करून राष्ट्रवादीने भरला उत्साह

राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली जिल्हा कार्यकारिणी मंगळवारी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीतुन पक्षातील पदाधिकाऱ्यांना विविध पदाच्या जबाबदाऱ्या नव्याने देण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे व कार्याध्यक्ष वंडार पाटील देखील उपस्थित होते.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक आता आणखीनच लांबणीवर पडताना दिसत आहे. शहरातील सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने देखील आपली नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. यातून विधानसभा अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस अशी पदे वितरित करण्यात आली आहेत. पदे मिळाल्यानंतर पदाधिकारी देखील नव्या उत्साहाने व जोमाने कामाला लागले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची नवी कार्यकारिणी खालीलप्रमाणे :-

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची क.डों.म.पा.तील सध्यस्तिथी :-

    राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोदी लाटे नंतर मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. शहरातील अनेक मोठे चेहरे देखील पक्ष सोडून निघून गेल्याचे पहायला मिळाले. २०१० च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ नगरसेवक निवडून आले होते. मात्र राष्ट्रवादीची राज्यातून सत्ता गेल्यानंतर २०१५ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत कल्याण डोंबिवलीत मोठी पीछेहाट झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ २ च नगरसेवक निवडून आले होते. असे असले तरी आगामी निवडणुकीत पुनरागमन करण्याच्या तयारीत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. राज्यातील महाविकास आघाडी राष्ट्रवादीच्या पुनरागमनाला फायदेशीर ठरू शकते. परंतु ही निवडणूक स्वबळावर झाली तर मात्र राष्ट्रवादीला शिवसेना,भाजपा आणि मनसे या पक्षांचा सामना करावा लागणार आहे. या तिन्ही पक्षांचे कल्याण मध्ये आमदार असून त्यांचा विशेष असा पगडा आहे.

    वडवली पुलावरून कल्याणच्या दोन आमदारांत जुंपली – मनसेच्या उदघाटनानंतर पुन्हा बंद केला पूल

    मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सोमवारी असंख्य मनसे पदाधिकाऱ्यांसोबत मोहने वडवली येथील रेल्वे उड्डाणपूलाचे लोकार्पण केले होते. वास्तविकपणे सोमवारी या पुलाचे लोकार्पण होणार होते. मात्र ते लांबणीवर पडल्याने राजू पाटील यांनी स्वतः जाऊन पुलाचे उदघाटन करून टाकले आणि पूल वाहतुकीसाठी खुला करून दिला. मात्र रात्री पुन्हा हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून अधिकृत लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर खुला करणार असल्याचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केले.

    कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात वाहतुकीच्या अनेक समस्या आहेत. यातच आता नवा पत्रिपुल आणि कोपर पूल बनल्याने काहीसा त्राण कमी झाला आहे. शिवाय सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केल्याने देखील काहीसा फरक पडल्याचे दिसून येते. मोहने येथील वडवली पूल देखील आता लोकार्पण सोहळ्या साठी पुन्हा बंद करण्यात आलेला आहे.

    “काही तांत्रिक कारणामुळे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले होते. आणि याबाबत सर्व आमदारांना माहिती देखील दिली होती. मनसेने केलेले उदघाटन अनधिकृत आहे. केवळ खोडसाळपणे राजकीय स्टंटबाजी म्हणून त्यांनी असे केले आहे. या पुलाच्या कामासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला होता त्यानंतरच हा पूल बनला आहे. मनसेने अनधिकृतपणे उदघाटन केले होते म्हणून पुन्हा पूल बंद करण्यात आला आहे. आता लवकरच अधिकृत लोकार्पण केले जाणार आहे.”

    – विश्वनाथ भोईर (शिवसेना आमदार

    “जवळपास १०-११ वर्षानंतर हा पूल वापरासाठी तयार आहे. काल मंत्र्यांना वेळ नसल्याने नियोजित लोकार्पण पुढे ढकलण्यात आले होते. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही तो सुरू केला होता. मात्र तो पुन्हा बंद करण्यात आला आहे. यांना लोकांची सोय महत्त्वाची आहे की उदघाटन ?”

    – राजू पाटील (मनसे आमदार)