आईच्या स्मृतिदिनी मा.नगरसेवक महेश गायकवाड यांनी गरजू महिलांना दिला साडी चोळीचा मान.

कैलासवासी गुंजाई दशरथ गायकवाड यांच्या २१ व्या स्मृति दिनानिमित्त घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणार्‍या महिलांसाठी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यातर्फे साडी-चोळी व धान्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कल्याण पूर्व मधील प्र.क्र.८८ संतोष नगरचे शिवसेना मा. नगरसेवक महेश गायकवाड ३ एप्रिल रोजीचा आपल्या मातोश्रीचा पुण्यतिथी दिन हा स्मृतिदिन म्हणून साजरा करतात.
आयोजित कार्यक्रमात मातोश्री गुंजाई यांना उपस्थितांकडून आदरांजली वाहण्यात आली. दीनदुबळ्यांसाठी मदतीचा हात पुढे करणारे म्हणून नगरसेवक महेश गायकवाड ओळखले जात आहेत. आजच्या दिवशी आपल्या मातोश्रीची आठवण म्हणून, अतिशय हलाखीचे जीवन जगत असलेल्या तर कचरा जमा करून, घरकाम करून कुटुंब उदर निर्वाह करणाऱ्या महिलांसाठी त्यांनी मदतीचा हात पुढे करून मान्यवरांच्या हस्ते साडीचोळी आणि धान्य वाटप केले.

कोविड महामारीच्या काळात अनेक घरकाम करणाऱ्या महिलांना,बेरोजगार कुटुंबांना,मदत करण्याचा प्रयत्न शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड सातत्याने करत होते. कोविड महामारीच्या काळात सर्वप्रथम कल्याण पूर्वेत मातोश्री गुंजाई फाउंडेशन तर्फे अन्नदान तसेच धान्य वाटप कार्यक्रम राबावून गोरगरिबांना दिलासा दिला होता. मातोश्री गुंजाई फाउंडेशन तर्फे मातोश्री गुंजाई दशरथ गायकवाड यांच्या स्मरणार्थ विविध लोकपयोगी कार्यक्रम ते राबवत असतात. कोणतीही महिला व तिचे कुटुंब उपासमारीचे बळी पडू नये म्हणून आपल्या कार्यालयाचे दार सदैव उघडे आहे असे मातोश्रींच्या एकविसाव्या स्मृतिदिनी त्यांनी सांगितले.

मातोश्री गुंजाई दशरथ गायकवाड स्मृतिदिन कार्यक्रमाला नगरसेवक महेश गायकवाड, नगरसेवक राजाराम ऊर्फ आप्पा पावशे, आडवली माजी सरपंच राहुल पाटील,
मधुर म्हात्रे युवासेना अंबरनाथ, शंकर पाटील उपविभाग प्रमुख,महिला विभाग प्रमुख वंदना तांबे, महिला उपविभागप्रमुख सुजाता शिंदे, कलाकार बजरंग बादशाह, गायिका चंद्रकला दासरी,शाखा प्रमुख प्रशांत बोटे, शाखाप्रमुख प्रतिक महिले,संतोष नवगिरे, समाजसेविका वैशाली ठाकूर ,सुजाता पवार, योगेश चव्हाण, सुरेश रसाळ, कार्यालय प्रमुख निलेश रसाळ तसेच शिवसैनिक व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

मा. नगरसेवक महेश गायकवाड यांनी या स्मृतिदिनी आई बद्दल भाष्य केले असता उपस्थित महिलांना देखील गहिवरून आले होते. पहा व्हिडीओ.

मनसे आंदोलकांवर गुन्हे दाखल मग उदघाटन करणाऱ्या गर्दीवर गुन्हे का नाहीत ? पोलिसांनी पक्षपात करू नये. – आमदार राजू पाटील

एप्रिल फुल म्हणजे १ एप्रिल रोजी मनसे कार्यकर्त्यांनी डोंबिवली येथे ‘एप्रिल फुल डब्बा गुल’ आंदोलन केले होते. या आंदोलनातुन पुलाच्या संथगतीने होत असलेल्या कामावर निशाणा साधला होता. मात्र कोरोना निर्बंधांचे उल्लंघन झाल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वडवली पुलाच्या उदघाटनावेळी गर्दी झाली होती तर मग त्यांच्यावर गुन्हे का नाहीत ? पोलिसांनी पक्षपातीपणा करू नये असे ट्वीट मनसे आमदार राजू पाटील यांनी केले आहे.

क.डों.म.पा. क्षेत्रात सध्या अनेक पुलांची कामं झालेली आहेत व काही सुरू देखील आहेत. ही काम अत्यंत संथ गतीने होत असल्याचे म्हणत मनसेने १ एप्रिल ला केक कापून आंदोलन केले होते. ‘एप्रिल फुल डब्बा गुल कधी होणार कोपर पूल?’ अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या होत्या. मात्र महापालिकेने आखलेल्या निर्बंधांचे उल्लंघन झाल्याचे म्हणत त्यांच्यावर आता गुन्हे दाखल केले गेले आहेत.

मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनसेला गृहीत धरू नये. प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनू नये. तसेच पोलिसांबद्दल आम्हाला आदर आहे आणि पोलिसांनी पक्षपातीपणा करू नये असे ट्विट राजू पाटील यांनी केले आहे. आयुक्त व डीसीपी यांच्या उपस्थितीत वडवली पुलाचे उदघाटन झाले यावेळी झालेली गर्दी तसेच कोपर पुलाच्या गर्डर लॉंचिंगला गर्दी करणाऱ्यांवर गुन्हे कधी दाखल करणार ? असा सवाल त्यांनी केला आहे.