उल्हासनदीत सोडली दोन विभिन्न प्रजातीची २० हजार माशांची पिल्ले

उल्हासनदी जतन व संवर्धनासाठी नदीमध्ये ग्रास कार्प व सिल्वर कार्प जातीच्या २०,००० माशांची पिल्ले आज सोडण्यात आली आहेत. सध्या या नदीत ठिकठिकाणी जलपर्णी वनस्पती इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली आहे कि त्यामुळे येथील मासेमारी करणारे ते सर्व साधारण स्थानिक पासून ते पालकमंत्र्यापर्यंत सर्वच सामाजिक घटक चिंतीत आले आहेत.

ग्रास कार्प व सिल्वर कार्प या दोन जातीचे मत्स्यबीज एकूण २०,००० नग कलकत्त्याहून विमानाने मुंबई पर्यंत आणण्यात आले. आज पहाटे रायते ब्रीज येथे या सर्व माशांची पिल्ले पोहोचली. या अभियानात लहानग्या पासुन मोठ्या पर्यंत, विविध समाजसेवी संस्थानी सहभाग दर्शविला.

कृषिरत्न चंद्रशेखर भडसावळे, कल्याण तालुका तहसीलदार दिपक आकडे, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक नितिन निकम, उल्हास नदी बचाव कृती समिती चे अश्विन भोईर, रविंद्र लिंगायत, विवेक गंभीरराव व वालधुनी बिरादरी चे शशिकांत दायमा, उल्हास नदी च्या दोन्ही बाजूच्या ग्रामपंचायत सदस्य. म्हारळ, वरप, कांबाचे बरेच नवनिर्वाचित सदस्य, द वॉटर फाउंडेशन चे पंकज गुरव व कुमार रेड्डीयार, तसेच अश्वमेध प्रतिष्ठान चे अविनाश हरड, तुषार पवार, दत्ता बोंबे आदि पर्यावरणप्रेमी, ऊमाई पुत्र या अभियानात सामील झाले होते.

उल्हास नदीचे वाढते प्रदूषण व त्यावरील उपाययोजना यावर कृषिरत्न  चंद्रशेखर भडसावळे, सगुणा बाग नेरळ यांनी प्रमुख मार्गदर्शन केले तसेच प्रशासकीय पातळीवर उल्हास नदी बचावासाठी शक्य अश्या सर्व उपाययोजना व मदत केली जाइल अशी ग्वाही कल्याण तालुका तहसीलदार दिपक आकडे यांनी दिली. 

मासे म्हटले की, फक्त खाण्यासाठी उपयोगात येत नसून ते पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी ही उपयोगी असतात असे नमूद करतांना मासे नदीत सोडत लहानग्यांनी सुद्धा सहभाग नोंदवला. आज सोडण्यात आलेल्या दोन्ही प्रजातींचे मासे हे पर्यावरणच नव्हे तर स्थानिकांचा रोजगार देखील बनणार आहे. तसेच या माश्यांची उत्पत्ती वाढल्याने हे मासे आसपासच्या गावातील लोकांच्या आहारात देखील सामावले जाऊ शकतात. या दोन्ही प्रजातींचे मासे हे एका वर्षाने एक किलो वजनाचे होऊ शकतात. तर हाच मासा जास्त जगला तर ४ किलो पर्यंत देखील भरू शकतो असा दावा केला गेला आहे. त्यामुळे या माशांची उत्पत्ती वाढली तर पुढच्या वर्षी मोठं मोठे मासे या नदीतून मिळतील हे नक्की.

कल्याण डोंबिवलीत विनामास्क फिरणाऱ्यांना पोलीस टाकणार हॉस्पिटलमध्ये ; पोलिसांनी महापालिकेला सांगितला आपला निर्णय

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे आकडे भलतेच वाढताना दिसत आहेत. मात्र असे असतानाही लोकांचा यावर विश्वास नसल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. मात्र पालिका प्रशासन याबाबतीत कठोर निर्णय घेताना दिसत आहे. आता पालिके बरोबर पोलीस प्रशासनाने देखील आपली भूमिका पालिका आयुक्तांकडे मांडली आहे.

क.डों.म.पा. क्षेत्रात आजपासून सरकारच्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी होणार आहे. या साठी पालिका मुख्यालयात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, दोन्ही सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच महापालिका अधिकारी यांची बैठक पार पडली. निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी काय केले पाहिजे यावर बराच वेळ चर्चा झाली. कोरोनाचे प्रादूर्भाव रोखण्यासाठी जे काही करायचे ते सरकार करणार आहे. महापालिका आयुक्तांनी सांगितले की, निर्बधाच्या अंमलबजावणीसाटी प्रशासन सज्ज आहे. मंगल कार्यालय आणि भाजी मंडईवर विशेष नजर ठेवली जाईल. नियमांचे उल्लंघन केल्यास तर मंगल कार्यालये ३० एप्रिलर्पयत सिल करण्यात येतील.

विनामास्क फिरणाऱ्यांची होऊ शकते रुग्णालयात रवानगी :-

महापालिका अधिका:यांसोबत पोलिस सुद्धा निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी सज्ज झाले आहेत. विना मास्क फिरणा:या नागरीकांवर केवळ दंडात्मक कारवाई करणार नाही तर त्यांना पोलिस ठाण्यात नेऊन त्यांची प्रथम अँटीजेन टेस्ट केली जाईल. यामध्ये व्यक्ती पॉझीटीव्ह आझळल्यास त्याची रवानगी थेट रुग्णालयात केली जाईल असा निर्णय कल्याण पोलिसांनी घेतला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली आहे.