भाऊ कदम आणि राणा दा ने ठोकला कल्याणमध्ये तळ; ‘गेम डाव स्टार्ट’ चित्रपटाचं शुटिंग झालं सुरू

मराठी सिनेसृष्टीत ‘गॅम डाव स्टार्ट’ हा नवा चित्रपट पुढील काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आता कल्याणमध्ये सुरुवात झाली आहे. या चित्रपटातुन कॉमेडी किंग भाऊ कदम आपल्याला खलनायक म्हणून दिसणार आहे. तर राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी या चित्रपटाचा नायक आहे.

कल्याण मधील कशीश इंटरनेशनल हॉटेलमध्ये ‘गॅम डाव स्टार्ट’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला होता. आता या चित्रपटाच्या चित्रीकरणाला याच हॉटेलमधून सुरुवात करण्यात आलेली आहे. ‘गॅम डाव स्टार्ट’ या नावानुसार हा चित्रपट म्हणजे जुगार आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती यावर आधारित असणार आहे. बाकी यात कॉमेडी,एक्शन,ट्विस्ट अशा बऱ्याच गोष्टी असणार आहेत.

या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत राना दा म्हणजेच हार्दिक जोशी असणार आहे. तर खलनायकाची भूमिका भाऊ कदम करीत आहेत. त्याचबरोबर कल्याण मधील काही नवोदित कलाकार देखील या चित्रपटात दिसणार आहेत. त्यातीलच नितीन रुपणवर हे देखील भाऊ कदम यांच्या समवेत सहखलनायक म्हणून भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या नायिकेबद्दल अजूनही सस्पेन्स ठेवण्यात आलेला आहे. नायिका कोण आहे ? हे अद्याप कुणालाही माहीत नाही. मात्र ही नायिका दाक्षिणात्य असेल अशी एक चर्चा सुरू आहे.

कल्याण मधील प्रसिद्ध कॉमेडी आर्टिस्ट, गायक बजरंग बादशाह यांच्या कथेवर आधारित हा चित्रपट असणार आहे. नाथ प्रोडक्शनच्या माध्यमातून हा चित्रपट बनवला जात आहे. वैशाली ठाकूर, सुजाता पवार, बजरंग बादशाह हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित कोळी यांच्या नजरेतून होत आहे. चित्रपटाची संकल्पना महेश गायकवाड यांची आहे तर संजय गायकवाड यांचे देखील योगदान चित्रपटाला लाभले आहे. कल्याण शहरातील कशीष हॉटेल मधून चित्रीकरण सुरू झाले असून पुढील काही दिवस कल्याण शहरातील काही भागात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असणार आहे. व त्यामुळे भाऊ कदम आणि राणा दा कल्याणमध्ये तळ ठोकून असणार आहेत.

चित्रपटाचे शुटिंग तसेच भाऊ आणि राणाची मुलाखत पहा खालील लिंकवर :-

-संतोष दिवाडकर

अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे कल्याण पूर्वेतील १०० फुटी रोडचे चुकीचे अलाईन्मेंट ? तर मग १०० कुटुंब होतील बेघर

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे सुमारे १०० कुटुंब बेघर होण्याच्या उंबरठ्यावर असून कल्याण पूर्वेतील १०० फुटी रोडचे चुकीचे अलाईन्मेंट बनविल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत येथील नागरिकांनी आयुक्तांना निवेदन देत रहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

डिसेंबर २०२० पासून मलंगगड रोड ते उल्हासनगरकडे जाणारा १०० फुट रोडचे चिंचपाडा हद्दीत रस्ता बनविण्यास सुरवात केली असून, हा रस्ता चुकीच्या रोड अलाईन्मेंट प्रमाणे बनविण्यास घेतल्याचे येथील नागरीकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी त्याबाबत  पालिकेकडे वेळोवेळी लेखी पत्रव्यवहार केला. त्याचप्रमाणे दोन वेळा आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेवून या रस्त्याचे काम चुकीचे होत असल्याची माहिती त्यांना दिली.

 त्या अनुशंगाने आयुक्तांनी कार्यकारी अभियंता सुनिल जोशी यांना सुचना देवून प्रशांत भुजबळ यांना प्रत्यक्ष जागेवर जावून दोन्ही इमारती मधील मोकळया जागी असलेल्या २८ मीटर मध्ये पूर्णपणे रस्ता बनविण्याची सुचना केली. त्यावेळी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे देखील हजर होते. मात्र आयुक्तांनी केलेल्या सूचनाचे पालन व अंमलबजावणी न करता उलट मनमानी पद्धतीने चूकीचे काम करून १०० कुटूंबाना बेघर करण्याचा प्रयल होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या प्रकरणात आयुक्तांनी  लक्ष घालून करधारक नागरीकांना न्याय देण्याची मागणी येथील स्थानिक रहिवाशांनी केली असून याबाबत फ्रेंड्स कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

-कुणाल म्हात्रे