डोंबिवलीच्या राम नगर पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शेतच जर कुंपण खायला लागले तर सामान्य नागरिकांनी जायचे कोणाकडे असा प्रश्न पडला आहे. या अगोदर सचिन वझे आणि पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या गाजलेल्या प्रकरणा मुळे पोलीस खात्यावर विविध प्रश्न उपस्थित राहिले होते. त्यातच डोंबिवलीतील घटनेने पुन्हा पोलीस खाते वाईट गोष्टीसाठी चर्चेत आले आहे.
पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारी नंतर राम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून. दुष्कृत्य करणाऱ्या पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली आहे. ज्या रामनगर पोलीस ठाण्यात तो कार्यरत होता त्याच पोलीस ठाण्याने त्याला अटक केली आहे. सतीश कारले असे या पोलीस हवालदाराचं नाव असून आता त्याच पोलीस सेवेतून निलंबन करण्यात आलं आहे.
या घटनेमुळे कल्याण डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी विविध कलमा अन्वये या पोलिस हवालदारावर गुन्हे दाखल केले आहेत. अश्या निकृष्ठ वृत्तीच्या पोलिसांमुळे समाजातील इतर चांगल्या व इमानदार पोलिसांना देखील नाईलाजास्तव खाली मान घालावी लागते. त्यामुळे संपूर्ण पोलीस खात्यावर प्रश्नचिन्ह उठण्या पूर्वी अशा वृत्तीच्या पोलिसांचा निकाल लावणे गरजेचे ठरू लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय राज्यमंत्रीमंडळात निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली होती. यातच संपूर्ण ठाणे जिल्ह्यात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पाच दिवस भेटी दिल्या. याचदरम्यान शेवटच्या दिवशी यात्रेची सांगता झाल्यानंतर त्यांनी एका खुर्चीला वंदन करून तिच्यासमोर ते नतमस्तक झाले. यानंतर त्यांनी असे का केले ? याबद्दल काही लोक अनभिज्ञ आहेत.
राजकारण असोत किंवा इतर कोणतेही क्षेत्र प्रत्येकाची सुरुवात ही तळा गाळातून आणि शून्यातूनच होत असते. आणि शून्यातुन सुरुवात करून केंद्रीय राज्यमंत्री पद मिळवणारे कपिल पाटील हे देखील त्यातीलच एक. कपिल पाटील यांनी ज्या खुर्चीला वंदन केले ती केंद्रीय खुर्ची नसून ज्या खुर्चीने त्यांना घडवलं ती ही खुर्ची होती. राजकारणात पहिलं मिळालेलं मोठं यश म्हणजे हीच खुर्ची जिला कपिल पाटील यांनी विनम्रपणे हात जोडले. ती खुर्ची होती सरपंच पदाची. म्हणूनच कपिल पाटील यांनी कुटुंबातील लोकांना घेऊन थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले.
कपिल पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला त्यावेळी म्हणजेच १९८८ मध्ये ते दिवे अंजूर गावासाठी ग्रामपंचायत निवडणूक लढवत होते. आणि याच गावचे ते सरपंच बनले होते. सरपंच पदाच्या लहान मात्र गावात प्रचंड मान असणाऱ्या खुर्चीवरून कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास सुरु झाला होता. या खुर्चीवरून पुढे एवढा मोठा प्रवास होईल असे त्यांनी स्वप्नात देखील पाहिले नव्हते. सरपंच कपिल पाटील ते केंद्रीय मंत्री कपिल पाटील हा प्रवास ज्या खुर्चीमुळे शक्य झाला त्या खुर्चीला मी कधीही विसरणार नाही अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि त्यांना गहिवरून आले. आयुष्यात कितीही उंची गाठा पण पहिल्या पायरीला कधीही विसरू नका असा संदेश कपिल पाटलांनी यातून लोकांना दिला आहे. यातून कपिल पाटील हे किती भावनिक आहेत याचाच एक प्रत्यय लोकांना आला आहे.
कल्याणमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या एका व्यक्तीचा ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याबाबत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली होती. मात्र आता त्यापाठोपाठ शिवसेनेने देखील या वादात उडी घेतली आहे. शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची भेट घेत हा गंभीर प्रकार असून सर्व यंत्रणेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली . त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दै.बातमीदारने प्रसिद्ध केलेल्या या व्हडिओ मुळे उडाली खळबळ
व्हायरल होत असलेल्या व्हडिओमध्ये आशिष चौधरी नामक इसम आमदार गणपत गायकवाड हे ईव्हीएम हॅक करून निवडुन आल्याचा दावा करताना दिसत आहे. आणि हीच व्हिडियो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे स्टिंग असल्याचा दावा देखील करण्यात आलाय. या व्हायरल व्हिडियो स्टिंगमध्ये दिसणारा तरुण हा आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे कामाला होता. त्यांच्या मुलाची जवळपास ४० लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. आशिष चौधरी याने १९ मे रोजी मुंबई उच्च न्यायालय, पोलीस महा संचालक आणि संबंधी सरकारी यंत्रणांना तक्रार केली आहे. त्याच मे महिन्यातील हा व्हिडियो असून २०१९ च्या कल्याण पूर्व विधान सभेत काही ठिकाणी ईव्हीएम हॅक केल्याचा दावा केला आहे आणि याबदल्यात ५० लाख रुपये मिळाले होते असे त्याने म्हटले आहे.
आमदार गणपत गायकवाड यांनी या सर्व आरोपांचे खंडन करत या व्हिडियोत दावा करणाऱ्या आशिष चौधरीने आपल्या मूलाची ४० लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून तो अटकेत असल्याचे स्पष्ट केले. तसेच मला बदनाम करण्याचं हे षड्यंत्र असून या व्हिडियोची सत्यता तपासून दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणीही आमदार गायकवाड यांनी केली आहे. मात्र आता या प्रकरणात शिवसेनेने देखील उडी घेतली आहे. शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार गायकवाड यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार धनंजय बोडारे यांच्या समवेत पोलीस उपयुक्ताची भेट घेत त्यांना याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आमदार गणपत गायकवाड यांची बदनामी करत असल्या बाबत पोलिसात तक्रार
आतापर्यंत आमदारांनी मशीन मध्ये घोळ केल्याची शंका होती मात्र आता या क्लिप मुळे ते स्पष्ट झाल्याचा आरोप लांडगे यांनी केला आहे. सुरुवातीपासूनच ईव्हीएम मशीनमधून चुकीचे काम केले जात असल्याची सर्व पक्षीय राजकारण्यांची ओरड सुरू आहे. ईव्हीएम मशीन मधील गोंधळामुळे चुकीचा निर्णय लागला आहे. मतदार आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या डोळ्यात धूळफेक करत त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. याचा कायदेशीर ब होणे गरजेचे आहे यासाठी शुक्रवारी पोलिस उपायुक्तांना निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितलं.
ईव्हीएम मशीन हॅक करणे हा देशद्रोह आहे आणि चौधरी याने आपण पैशासाठी हे काम केल्याची कबुली दिली आहे. सर्व यंत्रणेच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न असल्याने यातील दोषींवर गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी धनंजय बोडारे यांनी केली आहे. आतापर्यंत १३५ करोड लोकांच्या आणि राजकारण्यांच्या मनात असलेल्या संशयाला आणि चर्चेला हॅकरने सिद्ध करून दाखवले आहे. लोकशाही वर विश्वास असून आपण याप्रकरणी पोलीस, निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून संबंधित यंत्रणा चौकशी करून न्याय देतील असा विश्वास गोपाळ लांडगे ( कल्याण जिल्हा प्रमुख) यांनी व्यक्त केला आहे.
संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची प्रतिस्पर्धी धनंजय बोडारे यांची मागणी