डोंबिवलीत घरात एकट्या राहणाऱ्या महिलेचा खूण

डोंबिवली : महिलेच्या खूनाने डोंबिवली हादरली आहे. घरात एकट्या राहणाऱ्या महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना सांस्कृतिक राजधानी असलेल्या डोंबिवली टिळक नगर येथे घडली आहे. या हत्येमागे कोण आहे ? हा शोध आता सुरू होत आहे. (Dombivli crime)

प्राथमिक माहितीनुसार डोंबिवली पूर्व टिळक नगर चौकातील ‘आनंद शीला’ या सोयसायतीत राहणाऱ्या महिलेचा प्राथमिक गळा दाबून खून झाल्याची खळबजनक घटना घडली आहे. ५८ वर्षीय घटस्फोटीत विजया बावीस्कर या घरात एकट्या राहत होत्या. अज्ञात इसमाने आधीच्या रात्री घरात घुसून या महिलेचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.

सकाळच्या वेळेस घरकाम करणारी महिला कामासाठी घरात आली असता झालेला सर्व प्रकार तिच्या डोळ्यासमोर दिसला. त्यानंतर तिने तात्काळ शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर ही माहिती टिळक नगर पोलीस ठाण्याला मिळाली. आता या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. विजया बाविस्कर यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार साधारण तीस वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता. मागील तीन वर्षांपासून ते या इमारतीत राहत होत्या.

-संतोष दिवाडकर

Murder of a woman living alone in a house in Dombivali

खोणी तळोजा महामार्गावर अपघात; ट्रक खाली चिरडून दुचाकीस्वार ठार

मलंगगड : कल्याण शहराजवळ असलेल्या मलंगगड भागात आज सकाळी मालवाहतूक करणारा ट्रक आणि दुचाकीस्वाराचा अपघात झाला. या अपघातात ट्रक खाली चिरडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सध्या ट्रकचालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

खोणी तळोजा (Khoni Taloja) महामार्ग हा प्रचंड रहदारीचा मार्ग मानला जातो. या मार्गावर सततच्या होणाऱ्या अपघातामुळे या मार्गाला मृत्यूचा सापळा म्हटले जात आहे. आज सकाळी ११:३० च्या दरम्यान झालेल्या अपघातात जवळच्याच पाली गावातील रवी ठाकरे नामक इसमाला आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवुन दिला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून ट्रक आणि क्लिनरला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार याच ठिकाणी मागील महिन्यात ट्रक आणि एर्टीगा गाडीत भीषण अपघात झाला होता. यात देखील दोघा तिघांना प्राणाला मुकावे लागले होते. हा महामार्ग आणखी किती जणांचा जीव घेणार हे काही सांगता येत नाही. मात्र प्रशासनाने सतत होणाऱ्या अपघातांचे कारण जाणून घेऊन तांत्रिक बाबींचा अभ्यास करणे काळाची गरज बनली आहे. वेळीच यावर तोडगा न निघाल्यास मृत्यूची मालिका अशीच सुरू राहू शकते.

-संदेश दाभने

Accident on Khoni Taloja Highway; The truck crushed down and killed the biker