Foxconn Vedanta : महाराष्ट्रात होणारा सेमीकंडक्टर प्रकल्प आता गुजरातला नेण्यात येत असल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार होती. मावळ तालुक्यातील तळेगाव येथे होणारा हा १ लाख ५८ हजार कोटींचा भला मोठा प्रकल्प आता गुजरातला होणार असल्याचे जाहीर होताच शिंदे भाजप सरकारवर प्रश्नचिन्ह उमटवले जात आहेत.
फॉक्सकॉन ही तैवान देशातील एक इलेक्ट्रॉनिक कंपनी आहे तर वेदांता ही भारतीय कंपनी. या दोन्ही समूहांनी मिळून भारतात प्रथमच सेमीकंडक्टर प्लांट उभारायचे ठरवले आहे. सेमीकंडक्टर ही एक मायक्रोचिप आहे जी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरली जाते. ज्याकरिता भारताला आजवर चीन वर अवलंबून रहावे लागत होते. ही बाब भारतासाठी गौरवास्पद असून यानंतर लॅपटॉप, टेबलेट, स्मार्टफोन अशा काही उपकरणांच्या किंमती भारतीय बाजारात कमी होण्याची देखील शक्यता आहे.
गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यात हजार एकर जागेवर हा प्रकल्प येत्या दोन वर्षांत उभा राहणार असून त्यानंतर चिप निर्मितीला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती वेदांताचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी गुजरात सरकारशी करारबद्ध होत असताना दिली. यासाठी ६०-४० अशी दोन्ही कंपन्यांची या प्रकल्पात भागेदारी असणार आहे.
भारताचा हा एक मोठा प्रकल्प असून तो महाराष्ट्राच्या मावळ तालुक्यातील तळेगाव येथील एमआयडीसी क्षेत्रात होण्याची तयारी सुरू होती असं महाविकास आघाडी कडून सांगितले जात आहे. मात्र असे असताना हा प्रकल्प गुजरातला कसा काय जातो ? असे सवाल राजकीय वर्तुळात सुरू आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील शिंदे भाजप सरकारवर टिका केली आहे. तर प्रकल्पातून महाराष्ट्रात रोजगार निर्मिती होणार होती. हा प्रकल्प गुजरातला कसा काय नेला याची चौकशी केली जावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील केली आहे.
आम्ही त्यांना अकराशे एकर जमीन दिली होती मात्र मागील दोन वर्षे आधीच्या सरकार कडून त्यांना योग्य रिस्पॉन्स मिळत नसेल असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबाबदार धरले आहे. तर हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
-संतोष दिवाडकर
What exactly is the Foxconn-Vedanta Semiconductor Project? in marathi
आज पर्यंत किती प्रोजेक्ट महाराष्ट्रात यशस्वी झाले , काही सरकारने घालविले तर काही जन हित जपणारी महा मंडळी कारणीभूत ठरली ..
एकतरी M.I.D..C १००% उद्योग सुरू असलेली आहे का ? प्रत्येक प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या
उंबरठ्यावर येते अन्