कल्याण-डोंबिवली घडामोडी

केडीएमसी ९-आय प्रभागा अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान संपन्न

कल्याण : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने केंद्र सरकार मार्फत “स्वच्छता ही सेवा” अभियान देशभरात राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्वच्छता ही फक्त प्रशासकीय जबाबदारी नसून प्रत्येक जन आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तेसेच त्याने आपली गल्ली व आपले शहर स्वच्छ ठेवले पाहिजे या साठी चाललेला हा उपक्रम आहे.

आपल्या देशाला जनजागृतीची सर्वात जास्त गरज आहे. सर्व प्रथम लोकांना या देशात आपले अधिकार समजायला हवेत. देशाचा पाया हा १४० कोटी लोकसंख्येच्या हाती आहे. आपलं घर स्वच्छ असावं असे वाटणाऱ्या नागरिकांना आपलं शहर देश स्वच्छ असावं असं का वाटतं नाही? आपला देश हा सर्व सुविधा पुरवत असताना आपल्या देशाला अस्वच्छ देश असं आपलीच माणसं का बोलतात ही जबाबदारी प्रत्येक जन्माला आलेल्या या भारत देशातील नागरिकांची आहे, की आपण आपलं घर जसं स्वच्छ ठेवतो तसंच आपला शहर गल्ली स्वच्छ झाला पाहिजे. मग देश स्वच्छ होण्यासाठी किती दिवस लागतील?

आज केडीएमसी ९ आय प्रभागात झालेल्या स्वच्छता जनजागृती अभियानात आमदार गणपत गायकवाड, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, सहा.आयुक्त हेमा मुंबरकर, स्वच्छता अधिकारी, शिवसेना युवासेनेचे मधुर म्हात्रे, एल.एल.घुटे, स्वच्छता निरिक्षक मोहन दिघे, चेतना शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थी, संतोष खामकर उप विभाग प्रमुख, स्वच्छता निरिक्षक रोहिदास पाटील व शेखर उज्जैनवाल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे १०० कर्मचारी, फेरीवाला संघटनेचे सदस्य सह अनेक समाजसेवक, नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे अभियान चेतना शाळा, बुद्ध विहार, एसार पेट्रोल पंप ते नांदिवली कमान, नांदिवली गाव तलाव, आर्य गुरुकुल स्कूल येथे राबवण्यात आले. या वेळेस उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रियांद्वारे जनतेला आवाहन केले आहे की स्वच्छ्ता ही आपली सेवा आहे.

संतोष दिवाडकर

‘Swachhta Hi Seva’ campaign under KDMC 9-I Ward concluded

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *