कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याणमधील भटाळे तलावाच्या अतिक्रमणा विरोधात आमरण उपोषण

कल्याण हे ऐतिहासिक शहर असून यामध्ये अनेक ऐतिहासिक तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यापैकीच एक असलेला तलाव म्हणजे भटाळे तलाव. ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या समोर असलेल्या या तलावात देखील भूमाफियांनी अतिक्रमण केले असून याविरोधात निर्भय सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. या संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयपाल कांबळे आणि ठाणे जिल्हा अध्यक्षा आसीया रिझवी हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषणाला बसले आहेत.

      कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्या समोर ऐतिहासिक शिवकालीन भटाळे तलाव होता. केडीएमसीच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी भूमाफियांशी संगनमत करून तो तलाव अतिक्रमणाच्या रूपाने भूमाफियांच्या घशात घातला असल्याचा आरोप निर्भय सामाजिक सेवाभावी संस्थेने केला आहे. अशा भ्रष्ट अधिकारी आणि भूमाफियांवर गुन्हा नोंद करून भटाळे तलाव पूर्ववत बांधून त्याचे सुशोभिकरण करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *