घडामोडी

Barvi Dam : बारवी धरण झाले ओव्हरफ्लो

कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या शहरी तसेच ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण आज रात्री आठच्या दरम्यान ओव्हरफ्लो झाले आहे. धरणातील क्षमते पेक्षा जास्त पाणी होत असल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असल्याची माहिती आहे.

जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने जोरदार बरसात केल्याने बारवी धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली होती. मात्र नंतर पावसाने उसंत घेतल्याने धरणातील पाणीसाठ्यात होणारी वाढ थांबली होती. यानंतर मागील काही दिवसांपासून पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने थांबलेली वाढ पुन्हा सुरू झाली. यानंतर धरण आता पूर्ण क्षमतेने भरले आहे.

बारवी धरण उप अभियंते संजय माने यांच्या कडून मिळालेल्या माहिती नुसार बारवी धरण १००% भरले असुन धरणात ७२.६० घन मिटर इतका पाणीसाठा झालेला आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्याने सतर्क रहावे लागणार आहे. मात्र असे असले तरी पावसाने उसंत घेतला असून पूरपरिस्थिती ओढवण्याची शक्यता नसून कोणत्याही प्रकारच्या अफवांवर मात्र विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासना कडून केले जात आहे. सध्या धरणाच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

-संतोष दिवाडकर

Barvi Dam : Barvi Dam overflowed

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *