कल्याण डोंबिवलीत झोपडपट्टी पुनर्वसन योजना; रवींद्र चव्हाण यांची प्राधिकरण अधिकाऱ्यांशी चर्चा

डोंबिवली : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र हद्दीत कल्याण, डोंबिवली विभागातील खासगी आणि सरकारी जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. प्रत्येक लाभार्थी घटकाला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना माजी मंत्री तसेच डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या मुंंबईतील अधिकाऱ्यांना दिले.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात किती अंमलबजावणी झाली? आणि करायची असेल तर ती कशा पध्दतीने करता येईल? लाभार्थींना या योजनेचा अधिकाधिक लाभ कसा मिळेल? तसेच कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी, या दृष्टीने भाजप प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. यावेळी प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी अश्विनी जोशी, तहसीलदार विजय वाकोडे, साहाय्यक अधिकारी हर्षद घोटेकर उपस्थित होते.

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात कल्याण डोंबिवली पालिकेसह, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था भागात ही योजना तातडीने राबविण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे तेथे या योजनेचा विनाविलंब शुभारंभ करावा. या योजनेतून खरा लाभार्थी अजिबात वंचित राहता कामा नये. प्राधिकरणाच्या अन्य क्षेत्रातही खासगी, शासकीय जमिनींवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक प्रभावीपणे, गतिमानतेने राबविता येईल यासाठी प्राधिकरणाने वेगाने हालचाली सुरू कराव्यात. या योजनेच्या अंमलबजावणीत काही अडथळे येत असतील तर त्याचे शासन पातळीवर निराकरण करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे आश्वासन आमदार रवींद्र चव्हाण यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही ही योजना कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे सांगितले.

Slum rehabilitation scheme in Kalyan Dombivali; Ravindra Chavan discusses with authority officials

Vitthalwadi Police : पासपोर्ट पडताळणीसाठी आलेला निघाला बांगलादेशी

Vitthalwadi Police : उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस स्थानकात १५ फेब्रुवारी रोजी एका बांगलादेशी इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे. जोहरुल शेख (वय ३३ वर्षे) हा इसम बांगलादेशहुन घुसखोरी करून भारतात शिरला होता. पासपोर्ट पडताळणी करिता बनावट कागदपत्रांसह सदर इसम पोलीस स्थानकातील गोपनीय कक्षात आला असता त्याच्याजवळ असलेल्या बनावट कागदपत्रांमुळे तो पकडला गेला. यानंतर तो भारतीय नसून बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले.

विठ्ठलवाडी पोलीस स्थानकातील गोपनीय कक्षात नियमितपणे काम करणाऱ्या महेंद्र भोई, दिनेश शिर्के, चेतन खांबेकर, संतोष कुडले या पोलीस कर्मचाऱ्यांसमोर शनिवारी एक इसम कागदपत्रे घेऊन पासपोर्ट पडताळणी करिता आला होता. सदर इसमाला हिंदी भाषा येत नसल्याने तो बंगालीतच बोलत होता. त्याने दिलेल्या कागदपत्रांमध्ये पोलिसांना त्याने दिलेला जन्म दाखला संशयास्पद आढळून आला. सातवी शिकलेल्या जोहरुलने स्वतःच्या हाताने तो बनवला असावा असा संशय पोलिसांना आला. शिवाय जन्म दाखल्याचा कागद हा त्याच्या जन्माच्या वेळीचाही वाटत नव्हता. हाच नवा कोरा बनावट जन्मदाखला पोलीसांच्या नजरेत आला आणि पोलिसांनी जोहरुलची झाडाझडती सुरू केली.

जोहरुल बंगालीत बोलत असल्याने पोलिसांनी तात्काळ बंगाली भाषिकाला बोलावून घेतले. जोहरूलचा मोबाईल फोन तपासला असता त्यात बांगलादेशी नंबर आढळून आले. व्हॉट्सअप वरूनच अगोदर डाईल केलेल्या नंबरवर पुन्हा कॉल केले असता समोरून सदर इसम बांगलादेशी असल्याचे सांगत त्याचा पत्ताही पोलिसांना दिला. यानंतर पोलिसांनी सदर इसमास ताब्यात घेत त्याचा पुढील तपास सुरू केला आहे.

अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोरी वाढली असून कोलकत्तासह मुंबई व उपनगरात मोठ्या प्रमाणावर छुप्या पद्धतीने हे आश्रय घेत आहेत. आशेळे, माणेरे तसेच कल्याण शहराबाहेर असलेल्या ग्रामीण पट्ट्यात नव्याने उभ्या राहणाऱ्या चाळींमध्ये हे बांगलादेशी आश्रय घेत असल्याच्या जोरदर चर्चा आहेत. असे असल्यास अनेकांनी बनावट कागदपत्रे बनवली असण्याची शक्यताही आहे. असाच एक इसम पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. असे अजून किती बांगलादेशी शहरात लपले आहेत याची विशेष शोधमोहीम तसेच जनजागृती करण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे.

Vitthalwadi Police : Bangladeshi intruder arrested during passport verification

ठाणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीतील EVM मशिन्सची होणार Checking

EVM Checking : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक उमेदवारांनी निकलांवर संशय व्यक्त करून ईव्हीएम मशीनच्या तपासणीची मागणी केली आहे. यासाठी आवश्यक असणारा भरणा देखील त्यांनी केलेला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील १० विधानसभा क्षेत्रांतील ईव्हीएम मशिन्सची पडताळणी १० फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान केली जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातून जारी केलेल्या परिपत्रकात देण्यात आली आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात पडताळणीची मागणी करणाऱ्या पराभूत उमेदवारांसह बैठक आयोजित करण्यात आली होती.

ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनच्या ब्रँट मेमरी/मायक्रोकंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणी संदर्भात बेल कंपनीच्या नियोजनावर आज बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगलोर (BEL) यांच्याकडून तपासणी व पडताळणीसाठी वेळापत्रक तयार करण्यात आले असल्याची माहिती दिली. तसेच, संपूर्ण प्रक्रिया निवडणूक प्रतिनिधी व उमेदवारांना समजावून सांगण्यात आली.

आयोजित बैठकीत उमेदवारांनी एकमताने या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण त्रुटींची आणि अनुत्तरित प्रश्नांची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. उमेदवारांना अपेक्षित असलेली पारदर्शक प्रक्रिया नसेल किंवा त्यांच्या शंकांचे समाधान न झाल्यास या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात येईल असाही ईशारा यावेळी उमेदवारांकडून देण्यात आला.

उमेदवारांच्या मागणीनुसार पडताळणी केली जाणारे विधानसभा क्षेत्र :-

1धनंजय बोडारे १४२, कल्याण पूर्व
2सचिन बासरे१३८, कल्याण पश्चिम
3राजू पाटील, सुभाष भोईर१४४, कल्याण ग्रामीण
4दीपेश म्हात्रे१४३, डोंबिवली
5सुभाष पवार१३९, मुरबाड
6पांडुरंग बरोरा १३५, शहापूर
7राजन विचारे१४८, ठाणे
8केदार दिघे१४७, कोपरी पाचपाखाडी
9मनोहर मढवी१५०, ऐरोली
10संदीप नाईक१५१, बेलापूर

शिवसेना उबाठा पक्षाचे डोंबिवली विधानसभा क्षेत्राचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे काय म्हणाले? पहा खालील लिंकवर

https://www.facebook.com/share/r/1N1rML3Fub

Checking of EVM machines in Assembly elections in Thane district will be start from February 10

Ganesh Vidya Mandir शाळेतील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लंगडी संघात निवड

Ganesh Vidya Mandir : शिर्डी व कोपरगाव येथे नुकत्याच राज्यस्तरीय लंगडी स्पर्धा पार पडल्या. शिर्डी येथे १८ वर्षे वयोगटा खालील तर कोपरगाव येथे १४ वर्षाखालील मुलांची स्पर्धा पार पडली. या स्पर्धांमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेंतर्गत १४ वर्षाखालील मुलांचा संघ उपविजेता ठरला. यानंतर आता १८ वर्षाखालील मुलांची राष्ट्रीय लंगडी स्पर्धा आंध्र प्रदेश येथे व १४ वर्षाखालील मुलांची राष्ट्रीय लंगडी स्पर्धा तामिळनाडू येथे होणार आहे. या दोन्ही वयोगटात होणाऱ्या स्पर्धेत कल्याणच्या गणेश विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळाले असून ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे.

महाराष्ट्राच्या १८ वयोगटा खालील संघात गितेश काकडे व लवेश क्षेत्री तर १४ वर्षाखालील संघात साईराज मळेकर यांची निवड करण्यात आली आहे. नागरीक सेवा मंडळ संचलित गणेश विद्यामंदिर या शाळेत शिक्षणासह त्यांचे कला,गुण व खेळाला महत्त्व दिले जाते. त्यामुळेच शाळेतील विद्यार्थी मोठी मजल मारतात अशा भावना यावेळी शाळेचे शिक्षक मिलिंद धंबा यांनी व्यक्त केल्या. सदर विद्यार्थ्यांना त्यांनी लंगडी खेळ तसेच स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले असून ते स्वतः लंगडीचे राज्य पंच आहेत.

शाळेच्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगवान बोरसे, सेक्रेटरी दीपक पाटील, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका स्मिता मराठे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पुष्पांजली शेनवी यांच्यासह प्राथमिक विभागाच्या व माध्यमिक विभागाच्या सर्व शिक्षकांनी महाराष्ट्र संघात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली लंगडी असोसिएशनचे सचिव प्रवीण खाडे, कार्याध्यक्ष अविनाश नलावडे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन करीत पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या संघात निवड झालेले गितेश काकडे, लवेश क्षेत्री, साईराज मळेकर व मार्गदर्शक शिक्षक मिलिंद धंबा यांचे शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Selection of students from Ganesh Vidya Mandir School in Maharashtra Langdi team

MSRTC Union : रापम ठाणे विभागात एकनाथ शिंदेंच्या कामगार संघटनेचा झंझावात

MSRTC Union : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातील ठाणे १, ठाणे २, कल्याण, विठ्ठलवाडी व वाडा आगारानंतर मुरबाड व शहापूर आगारात एकनाथ शिंदेंच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेने जोरदार संघटना बांधणी केली आहे. किरण पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली एसटी महामंडळामध्ये सध्या सर्व महाराष्ट्रामध्ये सभासद वाढ होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. नव्यानेच मुरबाड शहापूर आगारातील ५० हून अधिक कामगारांनी राष्ट्रीय कर्मचारी सेनेमध्ये प्रवेश केला आहे.

मुरबाड आगारात एकनाथ शांताराम मोरे, जितेंद्र भराडे, रामचंद्र खुडके, संतोष हेमाडे, जिवन कापडी, अमोल देशमुख व अशोक पालवे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रीय कर्मचारी सेनेत जाहीर प्रवेश केला. तर शहापूर आगारात रमेश कुडव, राजेंद्र विशे, रोहिदास भालके, राहुल पडवळ, रविंद्र जागले, शशिकांत धापटे, जब्बार पठाण, प्रविण पाटोळे, राजेश पाटील, ज्ञानेश्वर लोहकरे, विजय घुडे, बाबुराव मोजे, दिनेश भोजणे आदींनी प्रवेश केला.

संघटना प्रवेशदरम्यान पंकज वालावलकर, दत्ता अडागळे, स्वप्नील गुरव, योगेंद्र कदम, गणेश तावडे, नितीन खंडागळे, प्रभाकर कानगुले व बाळू शरणागत यांनी मुरबाड व शहापूर आगारात दौऱ्या दरम्यान भेट दिली. आगारातील कामगाराच्या समस्या, अडचणी ऐकून घेतल्या व त्याबाबत कामगारांना योग्य मार्गदर्शन करून त्याच्या शंका दूर करण्यात आल्या. त्याच बरोबर राष्ट्रीय कर्मचारी सेनेची ध्येय धोरणे सांगितली असल्याची माहिती यावेळी संघटनेचे पदाधिकारी योगेंद्र कदम यांनी एमएच मराठीशी बोलताना दिली.

Eknath Shinde’s workers’ Union clash in MSRTC Thane division

Thakurli bridge : ठाकुर्ली उड्डाणपूलाच्या उर्वरित कामाचा मार्ग मोकळा

Thakurli bridge : डोंबिवलीचे आमदार व भाजप प्रदेश कार्यध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी महानगर पालिका प्रशासनास डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणाऱ्या स.वा. जोशी शाळेसमोरील उड्डाणपुलाच्या म्हासोबा चौकापर्यंतच्या विस्ताराचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पुलामुळे बाधित ६० रहिवाशांना पर्यायी घरांची वाटप पत्रे (अलॉटमेंट लेटर) वितरित करण्याचा कार्यक्रम कल्याण डोंबिवली महानगर प्रशासनाने आज दुपारी तीन वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित केलेला आहे.

सदर पुलामुळे विस्थापीत होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे सदर उड्डाणपुलाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता काम वेगाने पूढे जाईल असे चव्हाण म्हणाले.

Clear the way for remaining work of Thakurli bridge

लग्न समारंभासाठी कल्याणहुन गावी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; पती पत्नीसह चिमुरडीचा अपघात

कल्याण : शहराच्या पूर्व भागातील नांदीवली येथे वास्तव्यास असणाऱ्या घुघे परिवाराचा सोमवारी दि.२० जानेवारी रोजी दुर्दैवी अपघात झाला. अमोल घुघे (वय २५) हे आपली पत्नी प्रतीक्षा घुघे (वय २२) व आपली मुलगी स्वरा घुघे (वय ४) यांच्या समवेत कल्याणहून आपल्या गावी जायला निघाले होते. त्यांनी नुकतीच नवीन रिक्षा घेतली होती व त्याच रिक्षाने ते गावी निघाले होते. याचदरम्यान नाशिक जिल्ह्यातील घोटी सिन्नर महामार्गावर त्यांचा भीषण अपघात झाला.

नाशिक जिल्ह्यातील स्थानिक वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार घुघे परिवार व त्यांच्या समवेत त्यांचे सासरे मार्तंड आव्हाड (वय ६०), सासू कलावती आव्हाड (वय ५८) रिक्षाने प्रवास करीत होते. याचदरम्यान ओव्हरटेक करताना रिक्षाचालक अमोल यांना समोरून येणारा कंटेनर न दिसल्याने हा अपघात घडला. या अपघातात अमोल घुघे यांच्या सह त्यांची मुलगी स्वरा व त्यांचे सासरे मार्तंड आव्हाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर पत्नी प्रतीक्षा घुघे व सासू कलावती आव्हाड या मायलेकी गंभीर जखमी असून त्यांच्यावर तेथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर कंटेनर चालक राहुल कुमार प्रजापती (वय २८, झारखंड) हा सध्या वाडीवऱ्हे पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस या अपघाताचा सखोल तपास करीत आहेत. मात्र झालेल्या अपघातानंतर घुघे व आव्हाड या दोन्ही कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. अमोल हे एका नामांकित वित्तसंस्थेत इलेक्ट्रिशियन म्हणून काम करीत होते. कुटुंबाच्या भवितव्यासाठी त्यांनी नुकतीच १ जानेवारीला नवी रिक्षा खरेदी केली होती व याच रिक्षाने ते प्रवास करीत होते. दुर्दैवाने याच रिक्षाने त्यांच्या जीवन प्रवासाचाही शेवट ठरला. या दुर्घटनेमुळे नातेवाईक, शेजारीपाजारी व ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

A family traveling from Kalyan to Nashik died in an accident on the highway

वाडा एसटी आगारातील कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय कर्मचारी सेना मध्ये जाहीर प्रवेश

राष्ट्रीय कर्मचारी सेना : ठाणे विभागातील वाडा आगारातील संपूर्ण कष्टकरी जनसंघ संघटना कार्यकारणी बरखास्त करून सर्व कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली किरण पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या संघटना सध्या एसटी महामंडळामध्ये विश्वासास पात्र ठरली असून सभासद वाढीमध्ये धुमाकूळ घालणारी संघटना बनली आहे. ठाणे जिल्ह्यातील स्वाभिमानी कष्टकऱ्यांना हा एक चांगला आदर्श घालून दिला असल्याचे यावेळी संघटनेचे पदाधिकारी योगेंद्र कदम म्हणाले.

याप्रसंगी पंकज वालावलकर, दत्ता अडागळे, सचिन पवार, स्वप्नील गुरव, हेमंत घुले, योगेंद्र कदम या पदाधिकाऱ्यांनी वाडा आगारात भेट दिली. आगारातील कामगारांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या व त्याबाबत कामगारांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या शंका दूर करण्यात आल्या. त्याच बरोबर राष्ट्रीय कर्मचारी सेनेची ध्येय धोरणे देखील समजावून सांगितली. राष्ट्रीय कर्मचारी सेनेत आल्यानंतर मोठा आधार मिळाला असल्याच्या भावना यावेळी कामगारांनी व्यक्त केल्या.

Wada ST Depot employees into Rashtriya Karmchari Sena
Kalyan Development Plan : कल्याण लोकसभा क्षेत्रातील वाहतुकीचा बदलणार चेहरामोहरा; MMRDA मुख्यालयात झाली आढावा बैठक

Kalyan Development Plan : कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या भागात वाहतूक आणि दळणवळणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी कल्याण रिंग रोड, मेट्रो मार्ग १४ चा सविस्तर प्रकल्प आराखडा, मेट्रो ५ आणि मेट्रो १२ ची प्रगती, ठाणे फ्री वे तसेच उल्हासनगर, अंबरनाथ आणि कल्याण-डोंबिवली परिसरात सुरू असलेल्या अनेक विकासकामांचा आढावा घेतला.

कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सर्व प्रकल्पांचा आढावा घेत त्यांच्या पूर्णत्वासाठी योग्य त्या सूचना दिल्या. तसेच या प्रकल्प उभारणीतील अडचणींवर तोडगा काढत हे प्रकल्प नियोजित वेळेत मार्गी लावण्यास सांगितले. महत्वाचे प्रकल्प आणि त्यासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण, कामांची पूर्तता आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी येत असलेल्या अडचणी या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. प्रकल्पांना गती द्यायची असेल तर लवकरात लवकर जमीन अधिग्रहण करा, अशी सूचनाही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना खासदार शिंदे यांनी केल्या.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व भागातील ‘यू टाईप’ रस्त्यांना गती देण्याच्या सूचना केल्या. महापालिकेच्या हद्दीतील ३८० कोटी रुपये खर्चातून उभारण्यात येत असलेल्या इतर रस्त्यांच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील वर्दळीच्या शहाड उड्डाणपूल रुंदीकरणाची निविदा जाहीर करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक जागेचे अधिग्रहण तातडीने करण्याच्या सूचना उल्हासनगर मनपा आयुक्तांना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिल्या. तसेच मनपा क्षेत्रातील प्रमुख ७ रस्त्यांच्या कामाचा आढावाही घेण्यात आला.

बदलापूर – कांजुरमार्ग मेट्रो मार्ग १४ चा फायदा अधिकाधिक भागाला कसा होईल, त्यासाठी मार्गाच्या आरेखनात बदल करता येईल का? याची चाचपणी करण्याची सूचना केली. तसेच कल्याण फाटा उड्डाणपूल आणि ऐरोली काटई फ्री वे या प्रकल्पांसाठी वेगाने जागा अधिग्रहीत करण्याची खासदार शिंदे यांनी सूचना केली.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त मुद्गल, अतिरिक्त महानगर आयुक्त मनुज जिंदाल, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, उल्हासनगर महापालिका आयुक्त जमीर लेंग्रेकर, ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे तसेच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख प्रशांत काळे, शहरप्रमुख निलेश शिंदे, माजी नगरसेवक नवीन गवळी, अरुण आशान, राजेंद्र चौधरी, वामन म्हात्रे आदी पदाधिकारीही उपस्थित होते.

मागील काही काळापासून शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यादृष्टीने येथील वाहतुकीवर मोठा ताण आलेला आहे. शिवाय शहरातील वाहतुकीत जर बदल झाले नाहीत तर येत्या काळात रस्त्यांवर वाहने चालवणे अशक्य होऊन बसेल. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी असे बरेच महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी कंबर कसली असून आढावा बैठकीत त्यांनी कामाला वेग मिळण्याकरिता अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या आहेत. अशी माहिती शिवसेनेचे कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख प्रशांत काळे यांनी दिली आहे.

Kalyan Development Plan : The face of traffic in Kalyan Lok Sabha area will change; A review meeting was held at MMRDA headquarters

New District in Maharashtra : राज्यात नव्याने होणार २१ नवे जिल्हे?

New District in Maharashtra : महाराष्ट्र राज्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथील यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण होत आहे. याकरिता राज्यात २१ नवे जिल्हे बनविणार असल्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या यादीत ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्याचा देखील समावेश असून आता लवकरच कल्याण हा नवा जिल्हा होण्याची शक्यता आहे. याबाबत २६ जानेवारी रोजी अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजते. त्यामुळे २६ जानेवारी नंतर राज्यातील जिल्ह्यांची संख्या ३६ हुन ५७ पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ असे चार तालुके कल्याण तालुक्याला जोडलेले असून, कल्याण शहर हा सगळ्यांचा केंद्रबिंदू आहे. शिवाय आरटीओ, प्रांताधिकारी, न्यायालय, प्रादेशिक पोलिस विभाग अशी अनेक सरकारी कार्यालये कल्याण शहरात आहेत. त्यामुळे सगळ्याच दृष्टीने कल्याण सोयीस्कर पडत असून, कल्याण हा स्वतंत्र जिल्हा झाल्यास त्याचा लाखो लोकांना फायदा होणार आहे.

ठाणे जिल्ह्याचे या अगोदरही विभाजन होऊन पालघर जिल्हा वेगळा झाला होता. त्याच पालघर मधून जव्हार देखील अलिप्त होण्याचा प्रस्ताव आता ठेवण्यात आला आहे. तसेच ठाण्यातून कल्याण व मीरा भाईंदर देखील वेगळे होण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याचे मागील काही वर्षांत पाच भागांत विभाजन होत असल्याचे पहायला मिळत आहे. कल्याण सह आणखीन २० नव्या जिल्ह्यांचे प्रस्ताव असून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अशी शक्यता दरवर्षी वर्तवण्यात येते परंतु प्रत्यक्षात घोषणा मात्र केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

प्रस्तावित २१ नवे जिल्हे:-
कल्याण (ठाणे), मीरा भाईंदर (ठाणे), जव्हार (पालघर), महाड (रायगड), बारामती (पुणे), मंडणगड (महाड), माणदेश (सांगली,सातारा,कोल्हापूर), मालेगाव (नाशिक), कळवण (नाशिक), भुसावळ (जळगाव), उदगीर (लातूर), अंबेजोगाई (बीड), किनवट (नांदेड), खामगाव (बुलडाणा), पुसद (यवतमाळ), अचलपूर (अमरावती), साकोली (भंडारा), शिर्डी (अहमदनगर), संगमनेर (अहमदनगर), श्रीरामपूर (अहमदनगर), अहेरी (गडचिरोली).

New District in Maharashtra : Will there be 21 new districts in the state?