Arya Gurukul : इंडियन सेंटर फॉर प्लास्टिक इन द एनवोर्मेन्ट (ICPE ) आयोजित
शुंकला ऑर्गनाइज फॉर सस्टेंनेबल डेव्हलपमेंट यांच्या सहकार्याने पूस्मा आणि आर्य ग्लोबल यांच्या पुढाकाराने Arya Gurukul नांदीवली येथे
प्लास्टिक रिसायकल वॉरियर कॉन्टेस्ट बक्षीस वितरण सोहळा 2024 पार पडला.

पुस्मा आणि आर्य ग्लोबल तर्फे 3 फेब्रुवारी ते 3 मार्च 2024 पर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये कल्याण डोंबिवली अंबरनाथ मधील 35 शाळांनी नोंदी करून 20 शाळांनी सक्रीय सहभाग घेऊन प्लास्टिक गोळा करून, प्लास्टिक रिसायकलिंगला पाठवून त्या बद्दल जनजागृती केली. जास्तीत जास्त प्लास्टिक ज्या शाळेने जमा करून रिसायकलिंगसाठी पाठवले त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषक देऊन सन्मानित करण्यात आले. यात पाच टॉपर विजेते घोषित करून त्यांना ट्रॉफी देऊन सन्मान चिन्हाने गौरविण्यात आले. त्यासोबतच सहभाग घेतलेल्याल्या शाळांना देखील सन्मान चिन्ह देण्यात आले.

या वेळीस ICPE चे मॅनेजर सिस्टम कम्युनिकेशनचे सुधीर खुराना यांनी सहभागी झालेल्या शाळांचे, विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून प्लास्टिक रिसायकलिंग बद्दल माहिती दिली.
सेंट मेरी हायस्कूल सीईओ आणि प्रोजेक्ट मॅनेजर विंदा भुस्कुटे यांनी या कॉन्टेस्टमध्ये पारितोषक आणि सहभाग घेतलेल्या शाळांचे आभार मानत ही शुंकला आपण अविरत सुरू ठेवत असून पुढील वेळेस प्रत्येक शाळेने तीन शाळा एकत्रित करून मोठ्या प्रमाणात अभियान राबविण्यास जास्तीत जास्त शाळांनी यापुढे सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असिस्टंट मॅनेजर सस्टेनबिलिटी मनोज मिश्रा यांनी प्लास्टिक रिसायकलिंग ची गरज काय आहे ती या देशाच्या भाग्य विधात्यांना समजली पाहिजे यावर भाष्य करत प्लास्टिक रिसायकलिंग करण्यास पाठवलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
आर्य ग्लोबलच्या डायरेक्टर नीलम मलिक यांनी विद्यार्थ्यांना संबोधताना सांगितले की, आपण जे आपल्या मातीकडून घेतो ते आपण त्या मातीला परत देत असतो. हे एक सायकल आहे म्हणून आपण प्लास्टिकचे नक्की काय करायचे यावर विचार आणि कृती करायला हवी.

आर्य ग्लोबलचे चेअरमन भरत मलिक यांनी परदेशात आपल्या देशातील माणूस जेव्हा राहतो तेव्हा तो तेथील रूल्स आणि रेगुलेशन कडक असल्यामुळे त्यांचे पालन करतो. रस्त्यावर कचरा फेकत नाही. आणि तोच व्यक्ती इंडियात आल्यानंतर रस्त्यावर कचरा फेकत असतो. म्हणून आपल्या देशातील कायदे कडक करण्याची गरज असल्याचे यावेळेस बोलून दाखवले.

आर्य गुरुकुल शाळेच्या प्रिन्सिपल राधामनी अय्यर यांनी सांगितले की आपली सिस्टम गावापासून लहाणपणी मी देखील पाहत आले आहे की निसर्गाची कोणतीच वस्तू वेस्ट जात नाही.
या कार्यक्रमादरम्यान प्लास्टिक रिसायकलिंग बाबत अवेअरनेस साठी Arya Gurukul शाळेतील मुलांनी पथनाट्य करून जनजागृती केली. Arya Gurukul स्कूल आनंदमय वातावरणात कथक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळेस Arya Gurukul अंबरनाथ प्रिन्सिपल निलेश राठोर, सेंट मेरीच्या मुख्याध्यापिका दिव्य बोरसे आणि मोठ्या संख्यने शिक्षक आणि पालक वर्ग उपस्थित होता.

ज्या शाळेच्या मुलांनी प्लास्टिक गोळा करून रिसायकलिंग साठी पाठवले त्यांनी आपले अनुभव शेअर करत त्याची गरज सध्याच्या परिस्थितीत किती प्रमाणात आहे याबद्दलचे कथन केले.
Plastic Recycle Warrior Contest Prize Distribution Ceremony held at Arya Gurukul