कल्याण-डोंबिवली घडामोडी

नाना पटोलेंच्या वक्तव्यावर राजेश दाखिनकर यांनी व्यक्त केला तीव्र शब्दांत निषेध

कल्याण : नागपूर सभागृहात काही दिवसांपूर्वी कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वाल्मिक कराड यांच्यावर भाष्य करताना अरुण गवळी यांच्या नावाचा उल्लेख केला होता. १९९९ साली विधानभवनात अरुण गवळी यांच्या शेजारी कुणीही बसत नव्हते त्याचप्रमाणे उद्या वाल्मिक कराड आले तर नवीन काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. मात्र त्यांच्या या विधानावर आता अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेने मात्र तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अरुण गवळी हे २००४ साली निवडणुक जिंकून विधानसभा सदस्य झाले होते. चांगल्यासाठी चांगले आणि वाईटासाठी वाईट ही त्यांची खरी ओळख असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. त्यामुळेच लोकांनी त्यांना निवडून दिले होते असेहि ते म्हणतात. नुकतेच नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याचा गवळी समर्थकांनी तसेच त्यांच्या पक्षाने अखिल भारतीय सेनेने निषेध नोंदवला असून नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिले आहे. अरुण गवळी यांच्या पत्नी आशा गवळी यांनीही पटोलेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

अखिल भारतीय सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष राजेश दाखिनकर यांनी देखील नाना पटोले यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. नाना पटोले यांनी स्वतःची पायरी ओळखून अशी वक्तव्य करावीत, डॅडींचं नाव घेऊन राजकारण करू नये, पुन्हा अशी वक्तव्य केल्यास रस्त्यावर उतरून उत्तर देऊ असा ईशारा यावेळी दाखिनकर यांनी दिला आहे. नाना पटोले यांनीच काँग्रेसचे वाटोळे केले आहे असे विधान करीत राजेश दाखिनकर यांनी नाना पटोले यांचा खरपूस समाचार घेतला आहे. अरुण गवळी हे सध्या नागपूर कारागृहात असून नागपूर खंडपीठाने त्यांची २८ दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. त्यामुळे लवकरच ते स्वगृही परतणार आहेत.

Rajesh Dakhinkar strongly condemned Nana Patole’s statement

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *