Kalyan East : कल्याण पूर्व विधानसभेसाठी प्रथम दावा भाजपचाच असेल – मंत्री रवींद्र चव्हाण

Kalyan East : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी आघाडीवर जाणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र असे असले तरी सध्या युती आघाड्यांमध्ये आपसातच रस्सीखेच सुरू झाली आहे. लोकसभेला चर्चेत असलेली कल्याणची जागा आता विधानसभेला देखील चर्चेचा विषय बनली आहे. येथील आमदार कोण असेल? त्यापूर्वी ही जागा नेमकं लढणार कोण? हा पेच आता वाढू लागला आहे. मात्र कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याण पूर्वेची जागा ही भाजपच लढवेल असे आता म्हटले आहे.

अंबरनाथ गोळीबार प्रकरणानंतर तुरुंगात असलेले गणपत गायकवाड हे कल्याण पूर्वेचे स्थानिक आमदार असून मागील १५ वर्षे ३ टर्म त्यांनी या विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व केले आहे. गोळीबार प्रकरणा नंतर ते तुरुंगात असल्यानंतर आता कल्याण पूर्वेत सत्तापालट होणार का? अशा चर्चा सुरू होत अनेकांची नावे पुढे येऊ लागली. त्यानंतर हा विधानसभा क्षेत्र शिवसेनेला देऊन कल्याण पश्चिमचा भाजपला दिला जाईल असेही बोलले जात होते. मात्र मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही जागा भाजपचे लढवेल असे सांगितल्यानंतर आता कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

गणपत गायकवाड हे वर्षानुवर्षे या भागाचे नेतृत्व करीत आलेले आहेत. ते सातत्याने निवडूनही येतात. त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीतही त्यांनी मतदान केले आहे. ते येथील विद्यमान आमदार असल्याने महायुतीत या ठिकाणी प्रथम दावा हा भाजपचाच असेल. निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणे हे गैर नाही त्याचप्रमाणे दावे करणे देखील बरोबरच आहे असे यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले. कल्याण पूर्वेत भाजप कार्यकारिणीच्या बैठकीनंतर माध्यमांशी ते बोलत होते.

Kalyan East : BJP’s first claim for Kalyan East Assembly will be – Minister Ravindra Chavan

ऑटोग्राफ मिळवण्यासाठी लहानग्यांनी रोखला आमदारांचा ताफा

कल्याण : मुलं म्हणजे देवा घरची फुलं असं आपण म्हणतो. त्याचबरोबर लहान मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मोठ्यांना देखील भाग पडावे लागते. आज कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad)आपल्या मतदार संघातील अशोक नगर, मिलिंद नगर भागात पाहणी दौरा करीत होते. हा दौरा संपवून ते गाडीतून निघाले असता परिसरातील लहानग्यांनी त्यांच्या गाडीजवळ येऊन ऑटोग्राफ साठी हट्ट धरला. यावेळी आमदारांना देखील या विलक्षण मागणीवर हसू आले. यानंतर प्रत्येक मुलाच्या हातावर त्यांनी ऑटोग्राफ देत त्यांचा हट्ट पूर्ण केला.

कल्याण पूर्वेतील अशोक नगर आणि मिलिंद नगर भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी विशेष पाहणी दौरा केला होता. या दरम्यान स्थानिक नागरिकांशी बोलून त्यांनी विविध समस्येवर चर्चा केली आणि तेथील परिस्थिती जाणून घेतली.

याच परिसरातील लहानग्यांनी त्यांच्या पुढे ऑटोग्राफ देण्यासाठी हट्ट केला होता. मुळात आजचा काळ हा फोटोग्राफीचा असल्याने ऑटोग्राफ देणे ही एक दुर्मिळ बाब बनली आहे. मात्र अश्या प्रकारची मागणी आणि लहान मुलांचा उत्साह पाहून मला ऑटोग्राफ देण्याचा मोह आवरता आला नसल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या समाज माध्यमावर पोस्ट करताना लिहले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

-संतोष दिवाडकर

The youngsters stopped the convoy of MLAs to get autographs

video
कल्याण-डोंबिवलीत रेमडेसिवीरचा काळाबाजार ? आमदार गणपत गायकवाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनावर परिणामकारक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर शहरात तुटवडा जाणवत आहे. यामुळेच हे औषध मूळ किंमती पेक्षा तीन चार पटींने अधिक किंमतीत काळ्या बाजारात विकले जात आहे. असे पत्र कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी रेमडेसिवीरच्या तुटवड्या बाबतची धक्कादायक बाब समोर आली होती. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतल्यानंतर रातोरात औषधांचा पुरवठा करण्यात आला. मात्र सध्या कल्याण डोंबिवली व उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात काही माफिया हे इंजेक्शन मूळ किमती पेक्षा तीन चार पटीने विकून त्याचा काळाबाजार करीत आहेत. आपल्या माणसांचा जीव वाचवण्यासाठी लोक किंमत मोजायला तयार होतात व औषध विकत घेतात. अश्या प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

कोरोना काळात उधोगधंदे ठप्प झाल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे अगोदरच आर्थिक संकटात पिचलेल्यानी काय करावं ? असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे. शिवाय रेमडेसिवीर सहज उपलब्ध होत नसल्याने त्यासाठी नातेवाईकांना लांब लांबचे अंतर भर उन्हात कापावे लागत आहे. तरी रेमडेसिवीरचा पुरेसा साठा मेडिकल मध्ये उपलब्ध करून द्यावा व काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार गायकवाड यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.

ठाणे जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. अशातच कोरोना बाधित रुग्णांसाठी परिणामकारक असलेल्या रेमडेसिवीर या औषधाचा ठाणे जिल्ह्यात विशेषतः कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असुन या औषधाचा मुबलकसाठा उपलब्ध करून देण्याबाबत तसेच या औषधाचा काळाबाजार करून मुळ किमती पेक्षा तीन ते चार पट वाढीव दराने विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याबाबतची मागणी मुख्यमंत्री मा. ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.ना.श्री.राजेशजी टोपे साहेब, मा.श्री.राजेशजी नार्वेकर साहेब जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे केली.

गणपत गायकवाड (आमदार,कल्याण पूर्व)