विशाल गवळी : मागील काही दिवसांपूर्वी कल्याण मध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनं राज्यात खळबळ माजली आहे. विशाल गवळी नावाच्या विकृतीने कल्याण पूर्वेतील एका नाबालीके चे अपहरण करून तिची हत्या केली. मुलीवर अत्याचार केले गेल्याचे सांगत शहरात निदर्शने देखील करण्यात आली. सदर आरोपीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र याच विशाल गवळीवरून आता या प्रकरणाला राजकीय रंग आला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार असलेले महेश गायकवाड यांनी हा आरोपी व त्याचे कुटुंबीय भाजपचा कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी काही फोटो व्हिडिओ देखील पुरावे म्हणून माध्यमांसमोर सादर केले. मात्र भाजपने या सर्व आरोपांचे खंडन करून हा आमचा कार्यकर्ता नव्हता असे स्पष्टपणे सांगितले असून त्यांनी हा आरोपी महेश गायकवाड यांचाच असल्याचा पलटवार करीत एका फेसबुक पोस्टचा स्क्रीनशॉट माध्यमांसमोर दाखवला आहे. मात्र याच स्क्रीनशॉटवर आता नानाविध सवाल उपस्थित केले जात आहेत.

भाजपने सादर केलेला स्क्रीनशॉट हा विशाल गवळीने निवडणुकीत केलेली पोस्ट असल्याचा दावा केला आहे. या पोस्टमध्ये महेश गायकवाड यांना आमदार करा असे आवाहन गवळी याने केल्याचे दिसत आहे. मात्र त्याचबरोबर या पोस्टचा स्क्रीनशॉट 13 मिनिटानंतर घेतल्याचे देखील स्क्रीनशॉट मध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे हा स्क्रीनशॉट लगेचच 13 व्या मिनिटाला कशासाठी घेण्यात आला? सदर पोस्ट ही नेमकी कधी केली गेली आहे? सदर व्यक्तीचे प्रोफाईल आयडी काय आहे? याबाबत मात्र कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे सदर पोस्टचा स्क्रीनशॉट चर्चेत आला असून तो खरा की बनावट यासाठी सदर पोस्टची तपासणी करावी लागणार आहे.
विशाल गवळी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर गंभीर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे स्थानिक आमदार सुलभा गायकवाड यांनी म्हटले आहे. तर तो भाजपचा कार्यकर्ता आहे त्याच्यावर कोणतीही कठोर कारवाई होईल याची शाश्वती नसल्याचे महेश गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यामुळे सध्या तरी विशाल गवळी कुणाचा माणूस? यावर शहरात राजकीय ढकलफेक सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घडलेली घटना अत्यंत गंभीर असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली जावी अशी आशा मात्र कल्याणकरांना लागून आहे.
Vishal Gawli in the torture case of which party?
गुन्हेगार हे ” विकृत मनोवृत्तीचं ” लेबल आहे पक्षीय लेबल. चिटकवणे योग्य नव्हे . सध्याच्या परिस्थितीत व्यक्ती स्थलांतर करतो पण वृत्ती नाही. समाजविरोधी कृती ही मानवी मनाची आकृती , पुसने फार गरजेचे आहे .