ओला उबेर सारख्या खाजगी वाहनाने प्रवास सुरक्षित असल्याचा लोकांचा एक समज आहे. मात्र अशा प्रवासी वाहनावरील चालक देखील सुरक्षित नसल्याचे आता एका घटनेतून समोर आले आहे. काही वेळेस प्रवाश्याची हत्या होते तर कधी वाहन चालकाची हत्या होते. त्यामुळे सुकर प्रवास करावा कसा ? असा पेच निर्माण झाला आहे. खाजगी वाहनातून प्रवास करणे धोकादायक बनले असल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.
कल्याण ते धुळे या प्रवासासाठी आरोपींनी उबेर कंपनीची गाडी बुक केली. या गाडीच्या प्रवासा दरम्यानच त्या आरोपी प्रवाशांनी चालकाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह कसारा घाटात फेकून दिला. नंतर त्याची कार चोरून तिथून पोबारा केला. मात्र या हत्येतील दोन आरोपीना महात्मा फुले पोलिसांनी मोठया शिताफीने तपास करीत ताब्यात घेतले आहे. राहुलकुमार गौतम आणि धर्मेंद्रकुमार गौतम या आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. अमृत गावडे असे या दुर्दैवी उबेर चालकाचे नाव असून तो नवी मुंबई मधील दिघा, ऐरोली मधील रहिवासी आहे.

पोलिसांनी या प्रकरणी राहुलकुमार गौतम, धर्मेद्र्कुमार उर्फ वकील गौतम, विशालकुमार गौतम, करणकुमार गौतम, बचई गौतम, अमन गौतम या आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उबेर चालकाच्या हत्येच्या या घटनेने सध्या खळबळ माजली आहे. दरम्यान या घटनेने खासगी प्रवास करणे अधिकच धोकादायक बनले आहे याचा सारासार विचार करण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास असे का म्हणतात ? हे देखील तितकेच अधोरेखित झाले आहे.
-रोशन उबाळे
One thought on “उबेर चालकाची हत्या करून कार केली लंपास; महात्मा फुले पोलिसांकडून दोघांना अटक”