कल्याण-डोंबिवली घडामोडी

धक्का लागण्याच्या वादातून टोळक्याकडून दोघांवर प्राणघातक हल्ला; कोळसेवाडी पोलिसांकडून अधिक तपास सुरू

किरकोळ वादातून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून या प्रकरणाचा तपास कोळसेवाडी पोलिस करीत आहेत.

गेल्या काही दिवसापासून कल्याणमध्ये भर रस्त्यात टवाळखोरांकडून दहशत माजविण्याचा प्रयत्न सुरु आहे. पोलिस यंत्रणा या टवाळखोरांना आवरण्यात कमी पडताना दिसून येत आहे. त्यामुळे यांना आवर घालण्यासाठी परिसरात गस्त मारण्याची आवश्यता निर्माण झाली आहे. चौकाचौकात पोलीस दिसल्यास अपराधीक कृती दहशत कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कल्याण पूर्व भागातील काका ढाबा परिसरात काही तरुणानी कापड दुकान चालविणाऱ्या संतोष प्रजापती आणि विजय दुबे या दोघांवर धारदार शस्त्र आणि काठीने प्राणघातक हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विजय आणि संतोष हे दोघे दुकान बंद करुन पानाच्या टपरीवर पान खाण्यासाठी गेले होते. त्याच ठिकाणी काही तरुणांशी धक्का लागण्यावरुन या दोघांचा वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणारीत झाले. टोळक्याकडून झालेल्या हल्ल्यात विजय आणि संतोष हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णलायात उपचार सुरु आहे. या प्रकरणाचा तपास कोळसेवाडी पोलिस करीत आहे.

या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसापासून चक्कीनाका, खडेगोळवली, चिकणीपाडा, काकाचा ढाबा परिसरात टवाळखोर गुंडांची दहशत खूपच वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक करून वाढणाऱ्या घटनांवर आवर घालावे अशी प्रतिक्रिया व्यापारी विजय दुबे दिली आहे.

-रोशन उबाळे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *