कल्याण-डोंबिवली घडामोडी

मृत्यू दर वाढण्याला ‘या’ दोन गोष्टी कारणीभूत; भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली क.डों.म.पा. आयुक्तांची भेट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज क.डों.म.पा. क्षेत्रातील काही रुग्णालयांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्या नंतर त्यांनी महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मृत्यू दर वाढण्याबाबत कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत ते सांगितले. त्याचबरोबर राज्यसरकारवर टीकास्त्र डागले.

क.डों.म.पा. क्षेत्रात कडक निर्बंधांनंतर कोरोना काहीसा आटोक्यात येत असल्याचे आकडे सांगत आहेत. मात्र मागील महिन्याभरा पासून मृत्यू दर हा काहीसा वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. महापालिका क्षेत्रात रुग्णांना जाणवणाऱ्या समस्यां बद्दल त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली. रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा होत नसल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. सध्या ऑक्सिजनचा पुरवठा ५०% होत आहे आणि रेमडेसिवीरचा पुरवठा २५% होत आहे. ही दोन कारने मृत्यू दर वाढण्याला जबाबदार आहेत असे किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.

क.डों.म.पा. क्षेत्रात आज (दि.२९ एप्रिल २१) रोजी १० रुग्ण दगावले आहेत. तर ८३५ नवे कोरोना रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. याच बरोबर १५४६ रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. या आकडेवारी नुसार सध्या महापालिका क्षेत्रात एकूण १२७३४ संक्रमित रुग्ण उपचार घेत आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *