क.डों.म.पा. ने १ एप्रिल ते २० एप्रिल या २० दिवसांत मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांकडून लाखोंचा दंड वसूल केला आहे. २० दिवसांच्या या कालावधीत २४१३ लोकांवर ही कारवाई झाली आणि या लोकांकडून महानगरपालिका प्रशासनाला रु.१२,०६,५००/- रुपयांचा दंड प्राप्त झाला आहे.
कोरोनाची साथ नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने महापालिका दररोज विना मास्क फिरणा-या लोकांवर कारवाई करत आहे. असे असताना अजूनही काही नागरिक रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फिरतांना अगदी बेजबाबदारपणे मास्क न घालता फिरत असल्याचे दिसून येत आहे. काल दिवसभरात देखिल एकुण १२६ व्यक्तीकडून रु.६३,०००/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी घराबाहेर, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना न चुकता मास्क परिधान करण्याची दक्षता घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.