कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याणच्या प्रसिद्ध उद्योगपतीने घेतली ‘रॉल्स रॉयस’ कार ; किंमत ऐकून हादराल

कल्याणचे प्रसिद्ध उद्योजक संजय गायकवाड यांनी नुकतीच एक कार खरेदी केल्याने ते चर्चेत आले आहेत. त्याचे कारण ही असेच आहे. कारण ही काही साधी सुधी कार नसून ‘रॉल्स रॉयस’ कंपनीची कार आहे. ही कार अत्यंत दुर्मिळ असून जगात खूप कमी लोकांकडे ही कार आहे. संजय गायकवाड यांनी हीच कार कल्याण या ऐतिहासिक शहरामध्ये आणली आहे.

संजय गायकवाड हे गेली ३० वर्षांपासून उद्योजक म्हणून कल्याण शहरात ओळखले जात आहेत. ‘गौरीविनायक बिल्डर्स एन्ड डेव्हलपर्स’ चे ते मालक असून या शहरात त्यांनी अनेक इमारती उभारल्या आहेत. एक उद्योजक आणि दानशूर व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. २४ मे रोजी त्यांनी ‘रॉल्स रॉयस घोस्ट’ ही कार घरी आणली. मुळात ‘रॉल्स रॉयस’ कार ही प्रत्येकाच्या स्वप्नात असते परंतु ती अत्यंत दुर्मिळ कार असून डोळ्यांना रस्त्यावर दिसली तरी खूप मोठी गोष्ट आहे. संजय गायकवाड यांनी ८ कोटींपेक्षा जास्त किंमत मोजून ही कार कल्याण शहरात आणल्याचे समजते. अर्थातच कार दुर्मिळ असल्याने तिची किंमत देखील तितकीच मोठी आहे. आणि ती आता कल्याणच्या रस्त्यांवर धावताना देखील दिसणार आहे.

भारतात लेम्बॉरगिनी,बुकाटी, टेस्ला,जेगवार अशा गाड्यांचा क्रेज तर आहेच पण ‘रॉल्स रॉयस’ ही कार जगभरातील सर्वात रॉयल कार मानली जाते असं अनेकांच्या तोंडून तुम्ही नक्की ऐकले असेल. या कारचा इतिहास देखील तसाच आहे. तुम्ही इंटरनेट वर अधिक माहिती घेऊन कारचा इतिहास नक्की पहा. परंतु या कार बाबतची भारतातील एक रंजक कथा देखील तितकीच चर्चेत आहे.

राजा जयसिंग आणि ‘रॉल्स रॉयस’

भारतातील एक राजा नाव जयसिंग लंडनमध्ये सकाळी फेरफटका मारीत होता. याचवेळी त्याला ‘रॉल्स रॉयस’ चे शो रूम नजरेस पडले. परंतु अंगावरील कपडे पाहून आणि तेथील कर्मचाऱ्यांनी त्या राजाला तिथून हटकले. त्यानंतर तो राजा हॉटेल वर आला आणि राजेशाही थाटात पुन्हा त्या शो रूम वर आला. त्याला पाहून तेथील कर्मचारी आवक झाले आणि त्यांनी राजा जयसिंग यांचं राजेशाही थाटात स्वागत केलं. राजा जयसिंग यांनी तिथे उभ्या असलेल्या सहा कार खरेदी करून भारतात नेल्या. तेथील नगरपालिकेला या गाड्या त्यांनी दिल्या आणि गाडीतून शहरातील कचरा साफ करण्यास सांगितले. ‘रॉल्स रॉयस’ गाडी भारतात कचरा उचलण्यास वापरली जाते ही बाब जगभरात पसरली आणि या गाडीचा खप कमी झाला. त्यामुळे कंपनीने राजा जयसिंग यांची माफी मागितली आणि सहा गाड्या भेट म्हणून पाठवून दिल्या. माफी मागितल्या नंतर राजा जयसिंग यांनी देखील कचरा उचलणे बंद करण्यास सांगितले. आणि त्यानंतर ‘रॉल्स रॉयस’ आजपर्यंत जगातील नंबर वन कार म्हणून ओळखली जाते. राजा जयसिंग आणि ‘रॉल्स रॉयस’ ही कथा भारतात बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. या गाडीचे चाहते इतके आहेत की एका सरदाराने १ नव्हे १० गाड्या खरेदी केल्या आहेत.

– Santosh Diwadkar 8767948054

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *