कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना हाय स्कॉर रेकॉर्ड बनवत आहे आणि दुसऱ्या दिवशी मोडत आहे. क.डों.म.पा. क्षेत्रात आज दि.२५ मार्च २०२१ रोजी ९८७ नवे रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. आणि आता हा नवा उच्चांक बनला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक वाढताना दिसत आहे. एकीकडे सचिन वाझे प्रकरण तर दुसरीकडे कोरोनाचे वाढते आकडे याच चर्चा योगायोगाने महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनत आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत लाखोंच्या सभा पाहायला मिळतात. मात्र कोरोना महाराष्ट्रातच आहे का ? असा संतप्त सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता. देशातील टॉप १० कोरोना हॉटस्पॉट शहरांच्या यादीत महाराष्ट्रातीलच ९ शहरे समाविष्ट आहेत. यातील पुणे शहर देशात पहिल्या स्थानावर आहे.
कल्याण डोंबिवलीत वाढत्या कोरोनाच्या अकड्यामुळे होळी सणावर देखील निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे अनेकांमध्ये नाराजी देखील आहे. शिवाय वाढत्या बेसुमार आकड्यांवर देखील नागरिक सवाल तसेच शंका उपस्थित करीत आहेत.
“मागच्या वर्षी सरकारने लावलेलं लोकडाऊन सर्वसामान्य जनतेनं मान्य केलं होतं. आताचे आकडे पाहता नक्की कोरोना आहे का ? हाच मोठा प्रश्न पडतो. बिल्डिंगमध्ये एखादा पोजिटिव्ह सापडला तर त्याच्या आजूबाजेचे देखील पकडले जातात. आणि त्यांनाही कोरोना निष्पन्न होतो. मुळात कोविड टेस्ट यंत्रणा आहे का ? हे कफ काऊंट करत आहेत का ? म्हणजे बॉडी मध्ये थोडा जरी कफ असल्यास तो पोजिटिव्ह येतोय. वाढणाऱ्या आकड्यांमुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक बाबीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. लोकांना आता कोविड सोबत जगायची सवय लागली आहे त्यामुळे लोकडाऊन लावण्याला अर्थ नाही. वाढत्या आकड्यांतच मुळात संभ्रम आहे. ते नक्की खरे आहे की खोटे हे काही खात्रीशीर सांगता येत नाही.”
– प्रथमेश सावंत
(अध्यक्ष, जाणीव सामाजिक संस्था)