कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोनाने एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मागील आठवड्यात हाच मृत्युदर दिवसाला २० च्या वर गेला होता. मात्र आता हाच दर शुन्या पर्यन्त आला आहे. दुसऱ्या लाटेनंतर प्रथमच असे घडले आहे.
मागील दिड वर्षांपासून क.डों.म.पा. हद्दीत कोरोनाचा उद्रेक सुरू होता. रणरणत्या उन्हाळ्यात कोरोनाची दुसरी लाट आली आणि लोकांना हॉस्पिटल मध्ये बेड मिळणे कठीण होऊन बसले. बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन या सर्वांचाच तुटवडा आणि त्यात लॉकडाऊनने सामान्य नागरिकांचे कंबरडे कोरोनाने पार मोडून टाकले. अलीकडे लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काहीशी शिथिलता आली असून कोरोना रुग्ण संख्या देखील आटोक्यात येताना दिसत आहे. यातच इतक्या महिन्यानंतर प्रथमच क.डों.म.पा. क्षेत्रात शून्य कोरोना रुग्ण नोंदवले गेले आहेत.
आज महानगरपालिका क्षेत्रात १२७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचबरोबर ७९ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. या बेरीज वजाबाकीच्या आकडेवारीसह आता महापालिका क्षेत्रात १३९९ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. महापालिका क्षेत्रात आतापर्यंत २२०० हुन अधिक लोकांनी कोरोनाने जीव गमावला असून १ लाख ३१ हजार ३४३ रुग्ण बरे झाले आहेत.
-संतोष दिवाडकर