कल्याण-डोंबिवली घडामोडी

क.डों.म.पा. क्षेत्रात चार दिवसांपासून लसीकरण बंद ; १० दिवस सुरू आहे लसींचा तुटवडा

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील १० दिवसांपासून लसीकरणाचा वेग मंदावला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महापालिका क्षेत्रात शेवटचे लसीकरण २८ जून रोजी झाले होते. व त्यानंतर चार दिवसांपासून लस उपलब्ध न झाल्याने लसीकरण ठप्प झाले आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार नागरीकांना वारंवार लसीकरण करून घेण्यासाठी आवाहन करीत आहे. मात्र प्रत्यक्षात लस उपलब्ध होत नसल्याने कल्याण डोंबिवलीकर वैतागले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लसीकरणाला वेग आला होता. तिसरी लाट येण्यापूर्वी लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रशासनाने म्हटले होते. अस असले तरी प्रत्यक्षात मात्र लसीकरण केंद्र चार दिवसापासून बंद पडली आहेत.

क.डों.म.पा. क्षेत्रात २३ जून पासून लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. २३ जून ते २६ जून या चार दिवसांत आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण व सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली या दोनच ठिकाणी लसीकरण सुरू होते. त्यानंतर २७ जूनला लसीकरण पूर्णपणे बंद झाले. २८ जून रोजी महापालिकेला लस उपलब्ध झाल्याने या दिवशी २५ लसीकरण केंद्रांवर लोकांना लस देण्यात आली. त्यांनंतर २८ जून पासून २ जुलैपर्यंत महापालिकेला शासनाकडून कोणताही लसींचा पुरवठा झाला नाही. परिणामी चार दिवस लसीकरण बंद ठेवावे लागले आहे.

क.डों.म.पा.ला नुकताच कोव्हीड इन्होव्हेशन पुरस्कार भारत सरकारकडून मिळाला असल्याने आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर त्यांनी महापालिका क्षेत्रातील टाटा आमंत्रा हे कोव्हीड सेंटर आता बंद केले आहे. त्यामुळे तिसरी लाट येणार नसल्याचा हा शुभ संकेत असू शकतो असेही ते म्हणाले होते. मात्र असे जरी असले तरी कल्याण डोंबिवली करांचे लसीकरण लवकरात लवकर करून देण्याच्या प्रयत्नात जरी ते असले तरी शासनाकडून काही कारणाअभावी लसींचा पुरवठा उपलब्ध होत नाही ही निराशाजनक बाब म्हणावी लागेल.

-संतोष दिवाडकर

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *