घडामोडी

गावातच ११ वी १२ वीचे वर्ग सुरु करण्याची कल्याण तालुक्यातील फळेगाव ग्रामस्थांची मागणी

कल्याण तालुक्यातील फळेगाव, नडगाव, दानबाव, रुंदे, उशीद, हाल, मढ, आंबीवली या गावांतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी गोवेली किंवा कल्याण मधील कॉलेज असे दूर अंतरावर जावे लागते. त्यामुळे येथे जाण्यासाठी  लागणारा वेळ, मुलां-मुलींची सुरक्षितता, पालक वर्गाला बसणारा आर्थिक फटका या सर्व बाबींचा विचार करून नुकतच फळेगाव येथे ११वी आणि १२ वीचे आर्ट्स, कॉमर्स व सायन्सचे वर्ग सरू करण्याबाबत छत्रपती विद्यालय यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी गावातील सरपंच, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना वह्या देखील वाटप करण्यात आल्या. भविष्यात फळेगाव येथे ११ वी, १२ वी चे वर्ग लवकरात लवकर सुरु व्हावेत अशी भावना अनेक पालकानी व्यक्त केली आहे.

-कुणाल म्हात्रे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *