कल्याण-डोंबिवली घडामोडी

नवा नियम ; सकाळी ११ नंतर जीवनावश्यक सेवांची दुकान बंद !

महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असलेली दिसत आहे. यासाठीच राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले होते. मात्र या बरोबर हे निर्बंध आता आणखीनच कठोर करावे लागले आहेत. जीवनावश्यक सेवांची दुकाने आता सकाळी ११ पर्यंतच सुरू राहणार राहणार असून त्यानंतर सर्व काही बंद असणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत या निकषावर चर्चा करण्यात आली. किराणा खरेदीच्या नावाखाली लोक बिनधास्तपणे बाहेर फिरतात व त्यामुळे कोरोना आटोक्यात येण्यात अडचण होत आहे असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. ‘ब्रेक द चेन’ या मिशन नुसार राज्य सरकारने आता निर्बंध आणखी कडक केले आहेत.

सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत जीवनावश्यक सेवांची दुकाने जसे की किराणा, दूध डेअरी, चिकन-मटण, मासे अशी सर्व दुकाने फक्त चार तास खुली ठेवण्याची परवानगी दिली गेली होती. मात्र आता हीच वेळ सकाळी ७ ते ११ अशी करण्यात आली असून ४ तासांतच खरेदी विक्री करता येणार आहे. तर रात्री ८ वाजेपर्यंत होम डिलिव्हरीला परवानगी असणार आहे.

नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन बाबतही विचार करण्यात आला आहे. यानुसार काही तासांत राज्यभरात कडक लॉकडाऊन होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *