वर्ल्डकपच्या भारतीय संघात मुंबई इंडियन्सचे सहा खेळाडू; तर चेन्नई बेंगलोरच्या फक्त एकालाच स्थान

आयपीएल स्पर्धेचा गतविजेता संघ मुंबई इंडियन्स सध्या स्पर्धेतून बाद झाल्याने समाज माध्यमांवर मिम्सचा पाऊस विरोधी संघाच्या चाहत्यांनी सुरू केला आहे. मात्र मुंबई संघाचे फेन्स देखील त्यांच्या या टीकेला तोडीस तोड अशी उत्तरे देताना दिसत आहेत. मुंबईच्या संघाने 1552 बस पकडून घरी जावे असे मुंबईचे विरोधी फेन्स म्हणत आहेत तर आमची अर्धी टीम वर्ल्डकप साठी खेळणार आहे तेव्हा तुमच्याच खेळाडूंना आयपीएल नंतर बॅगा भरायला लावा असे उत्तर मुंबई समर्थक देत आहेत. पण नक्की काय आहे या उत्तरा मागील गमक ? ज्यामुळे चेन्नई आणि बेंगलोरच्या समर्थकांना काहीसा कमीपणा घ्यावा लागतो हे जाणून घेऊयात.

आयपीएल २०२०, आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांतील खेळाच्या परफॉर्मन्सनुसार बीसीसीआयने भारताच्या संघाची टी20 वर्ल्डकप 2021 साठी निवड केली आहे. यात 15 खेळाडूंची नावे आहेत. तसे पाहता आयपीएल संपल्यानंतर सर्व खेळाडू हे आपल्या देशासाठी एका रंगात खेळत असतात. यात कोणत्याही आयपीएल संघाचा कसलाही संबंध नसतो. मात्र सध्या आयपीएल मधून बाद झाल्या नंतर चेन्नई बेंगलोरच्या फेन्सने मुंबईसाठी ‘घरी जा’ असे मिम्स बनवल्याने मुंबईचे समर्थक त्यांना समर्पक उत्तर देताना दिसत आहेत.

आयपीएल संघा नुसार पहायचे झाले तर भारतीय संघात निवड झालेल्या 15 खेळाडूंपैकी 6 खेळाडू हे सध्याच्या मुंबई इंडियन्स संघासाठी खेळलेल्या पैकी आहेत. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, सुर्यकुमार यादव, ईशन किशन, राहुल चहर हे ते सहा खेळाडू. याउलट चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांचा प्रत्येकी एक-एकच खेळाडू वर्ल्डकप साठी निवडण्यात आला आहे. ते म्हणजे रवींद्र जडेजा आणि कर्णधार विराट कोहली. पंजाब किंग्स चे केएल राहुल, मोहम्मद शमी. दिल्ली कॅपिटल्सचा ऋषभ पंत, आर अश्विन, अक्षर पटेल. कोलकाता नाईट रायडर्सचा वरुण चक्रवर्ती आणि सनरायजर्स हैदराबादचा भुवनेश्वर कुमार अशी आयपीएल नुसार विगतवारी करता येईल. दुर्दैव म्हणजे राजस्थान रॉयल्स ही एकच टीम अशी आहे ज्याचा एकही खेळाडू वर्ल्डकपच्या भारतीय संघात नाही.

15 ऑक्टोबरला आयपीएल संपताच 17 ऑक्टोबर पासून ओमन येथून वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. तर 24 ऑक्टोबर रोजी भारताचा संघ पाकिस्तान विरुद्ध आपला पहिला सामना खेळताना दिसणार आहे. या दिवशी संपूर्ण आयपीएल समर्थक भारतीय संघाला समर्थन करताना दिसतील. मात्र तोपर्यंत हा मिम्स वोर असाच सुरू राहणार यात काही शंका नाही.

-संतोष दिवाडकर

क.डों.म.पा. प्रसृती रुग्णालयासमोर महिलेची तासनतास प्रतीक्षा; आरोग्य यंत्रणा कुचकामी ?

कल्याण :- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रसुतीगृह रुग्णालयासमोर एका गरोदर महिलेला तासनतास बसून ठेवल्याचा केविलवाणा प्रकार समोर आला आहे. यंत्रणेचे कारण देत या महिलेस इतर ठिकाणी जाण्याचे सांगितल्याने आरोग्य सुविधांचा वानवा आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.


कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे वायले नगर येथे प्रसूतिगृह आहे. या प्रसूती गृहामध्ये दूध नाका परिसरामध्ये राहणारी इरफाना शेख या महिलेला प्रसूतीसाठी आणले असता तिची प्रसूती न करताच तिला रुग्णालयाच्या बाहेरच बसून ठेवण्यात आले होते. तुमचा शुगर वाढलेला आहे आमच्याकडे डॉक्टर नाहीत, आय सी यु नाही असे थातुरमातुर कारण सांगून या गरोदर महिलेला ठाणे मुंबईला जाण्याचा अजब सल्ला रुग्णालयाकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान कोरोना काळात आधीच मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना आता आरोग्य सेवा घेताना कुचंबणा केली जात आहे. त्यामुळे महिला आरोग्य विभागात गंभीर कुचंबणा करणाऱ्या डॉक्टरांवर आणि संबंधितांवर कारवाई होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

-रोशन उबाळे

पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोड्यासह बलात्कार; कल्याण लोहमार्ग पोलिसांचा तपास सुरू

कल्याण :- इगतपुरी ते कसारा दरम्यान मेल एक्सप्रेसमध्ये लुट आणि बलात्काराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. धावत्या पुष्पक एक्सप्रेस मध्ये सात ते आठ दरोडेखोरांनी १६ प्रवाशांना लुटण्यासह एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना काल (शुक्रवारी) सायंकाळच्या सुमारास इगतपुरी ते कसारा दरम्यान घडली आहे.

कसारा रेल्वे स्थानकावर उतरून आरोपी पसार झाले मात्र याच दरम्यान दोन आरोपीना प्रवाशानी मोठ्या धाडसाने पकडलं. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करत दोन जणांना अटक केली असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या आठ आरोपीमधील सात जण घोटी परिसरात राहतात तर एक आरोपी मुंबई येथे राहणारा आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रवास ही सुरक्षित राहिला नसल्याचे या घटनेवरून समोर येते आहे.

शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने निघाली असताना आठ जण एक्स्प्रेस मध्ये चढले . एक्स्प्रेस ने इगतपुरी स्टेशन सोडताच या आठ जणांनी धाक दाखवून प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. १६ प्रवाशांना या दरोडेखोरांनी लुटले ६ जणांचे पैसे रोकड आणि १० जणांचे मोबाईल व इतर वस्तू हिसकावून घेतल्या. दरोडेखोर इथेच थांबले नाही तर त्यांनी एका प्रवाशा सोबत प्रवास करणाऱ्या त्याच्या २० वर्षीय प्रवासी पत्नीची छेड काढत तिच्यावर बलात्कार केला. तब्बल तासभर दरोडेखोरांचा हा थरार सुरू होता.

कसारा रेल्वे स्थानक येताच या दरोडेखोरांनी उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामधील सहा आरोपी निसटले मात्र याच दरम्यान काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. ट्रेन कल्याण स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना आपल्या ताब्यात घेतले. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपीना अटक करण्यात आली आहे. प्रकाश पारधी व अर्षद शेख अस या आरोपींच नाव आहे. हे आठ आरोपी एकमेकांचे मित्र असून यामधील सात जण घोटी मध्ये राहतात तर एक जण मुंबई येथे राहण्यास आहे. नशेच्या अमलाखालि त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसाची पथके फरार आरोपींचा शोध घेत आहेत. विविध पथक कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करीत आहे.

मध्य रेल्वे डीसीपी मनोज पाटील यांनी घटना घडल्यानंतर आम्ही घटना स्थळ न पाहता कल्याण जीआर मध्ये गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. महिलेची प्रकृती स्थिर आहे. आठ पैकी सात आरोपी घोटीचे राहणार आहेत. तर एक आरोपी मुंबईचा आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे मनोज पाटील (रेल्वे डीसीपी) यांनी सांगितले आहे. आमचा तपास योग्य दिशेने सुरू असून उर्वरित आरोपींच्या लवकरच मुसक्या आवळण्यात येतील. अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

-रोशन उबाळे

‘या’ निमित्ताने कल्याण पूर्वेत आमदार खासदार दिसले एकत्र

कल्याण : कल्याण पूर्वेत ‘अंतर्राष्ट्रीय अग्रहरि वैश्य’ समाजाच्या वतीने महाराजा ‘श्री अग्रसेन’ यांची ५१४५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि साध्वी सरस्वती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे जवळपास दोन वर्षांनी खासदार शिंदे आणि आमदार गायकवाड हे एकाच मंचावर उपस्थित होते.

       यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महाराजा अग्रसेन यांच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख करत सांगितले कि, जे महाराजा अग्रसेन यांनी ५१४५ वर्षे आधी सांगितले होते त्या गोष्टी आज देखील समाजामध्ये लागू होतात. संस्थेचे राष्ट्रीय वरिष्ठ अध्यक्ष योगेश अग्रहरी (के. एस. गुप्ता) यांनी सांगितले कि, आम्ही अग्रहरी समाजाचे लोकं महाराजा श्री अग्रसेन यांचे वंशज असून आज त्यांच्या जयंती समारोहात त्यांच्या आठवणींना उजाळा देत समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काय काय करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,  आमदार गणपत गायकवाड यांच्यासह कथा वाचक साध्वी सरस्वती, शिवसेना कल्याण पूर्व संपर्क प्रमुख शरद पाटिल, अंतराष्ट्रीय अग्रहरि समाचाचे मुकेश अग्रहरि, दिनेश अग्रहरि आदींसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

खडकपाडा गोदरेज हिल परिसरात युवकाची हत्या; शुल्लक कारणाची बाचाबाची ठरली जीवघेणी

कल्याण :- कल्याण पश्चिम खडकपाडा परिसरातील गोदरेज हिल भागात क्षुल्लक कारणाने एका तरुणाची हत्या झाली आहे. तीक्ष्ण हत्याराने भोकसल्याने खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान सदर तरुण मयत झाला. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

खडक पाडा परिसरातील गोदरेज हिल भागात गुरुवारी रात्री १२ ते १ च्या सुमारास दोंघांची रस्त्यात बाचाबाची झाली. शब्दाला शब्द वाढत गेले आणि या बाचाबाचीचे परिवर्तन हाणामारीत झाले. या दरम्यान शेख खान या आरोपीने तीक्ष्ण हत्याराने वार केले. वार जिव्हारी लागल्याने खाजगी रुग्णालयात मुकेश देसाई या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी शेख खान या इसमावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. खडकपाडा पोलिसांनी घटनेची माहिती घेऊन कसोशीने पुढील तपास सुरू केला आहे.

-रोशन उबाळे

ठाकुर्लीतील खंबाळपाड्यात एकाची हत्या तर दुसरा गंभीर जखमी

ठाकुर्ली :- खंबाळपाडा ९० फुटी रस्त्यावर रात्री १ च्या सुमारास रिक्षा अडवून लुटण्याचा बहाण्याने तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. यात एका इसमाचा मृत्यू झाला असून डोंबिवलीच्या टिळकनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही हत्या कशी घडली याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू झाला आहे.

खंबाळपाडा मधील ९० फुटी रस्त्यावर काल मध्यरात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञातांनी रिक्षामधून खाली उतरवून दोन प्रवाशांना बेदम मारहाण केली. लुटीच्या इराद्याने मारहाण केली असल्याचं बबलू चव्हाण या जखमी इसमाने पोलिसांना सांगितले आहे. याचं घटनेत बेचलप्रसाद चव्हाण यांचा गळा कापून त्यांना रेल्वे ट्रॅक वर फेकले. तर जखमी बबलू चव्हाण यांनी झाडीमध्ये लपून स्वतःचा जीव वाचवला अशी माहिती त्याने दिली आहे. या हल्ल्यात तो ही गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान लुटीच्या इराद्याने एकाची हत्या झाल्याच्या माहितीने परिसरात खळबळ माजली आहे .

पंचनामा आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे डोंबिवली रेल्वे पोलीस व टिळक नगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यात आणखी कोणत्या बाजू असू शकतात का ? याचा कसोशीने शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

-रोशन उबाळे

सामाजिक क्षेत्रातील हसरा चेहरा निखळला; अरुण दिघेंच्या निधनानं कल्याण पूर्वेवर शोककळा

कल्याण :– कल्याण पूर्वेतील सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे सरचिटणीस अरुण दिघे यांचे आज हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले आहे. त्यांच्या अचानकपणे जाण्याने त्यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण कल्याण पूर्वेतील सामाजिक तसेच राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अरुण दिघे हे कारने आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. मात्र त्यांना प्रवासा दरम्यानच हृदय विकाराचा तीव्र झटका आला होता. यानंतर त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आलं. मात्र इस्पितळात त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सामाजिक तसेच राजकिय क्षेत्रातील नेत्यांनी,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इस्पितळाकडे धाव घेतली. त्यांच्या निधनाच्या बातमी नंतर कल्याण पूर्वेत शोककळा पसरली आहे.

अरुण दिघे हे पूर्वापार सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. याचबरोबर ते राजकीय पक्षाचे देखील पदाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत होते. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांनी असंख्य गरजूंना मदत केली आहे. यासाठी अनेकदा त्यांनी पक्ष बाजूला ठेवून समाजकार्य केल्याचे देखील बोलले जाते. काही मंडळ,संस्था यांच्याशी देखील ते संलग्न होते. तर क्रीडा क्षेत्रासाठी देखील त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान लाभले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ते भारतीय जनता पार्टी असा एक त्यांचा राजकिय प्रवास. मात्र असे असतानाही पक्ष बाजूला ठेवून त्यांनी हितसंबंध जोपासले होते. कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड आणि माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. सर्वांना एकत्रित बांधून सलोख्याचे संबंध त्यांनी निर्माण केले होते. म्हणूनच इतर राजकीय पक्षांत देखील त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पक्षाची कोणतीही आंदोलने, मेळावे, कार्यक्रम यात ते हिरहिरीने पुढाकार घेत. याचबरोबर सार्वजनिक जयंती, उत्सव, शिबिरे आणि विविध उपक्रमात त्यांचा पुढाकार असे.

समर्थक आणि विरोधक या दोघांनाही हसऱ्या चेहऱ्याने उत्तर देण्याची त्यांची एक कला होती ज्यातून त्यांनी असंख्य मनांवर अधिराज्य केले होते. मात्र कल्याण पूर्वेचा हाच उमदा आणि हसरा चेहरा निखळल्याने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे असे त्यांचे निकटवर्तीय आता म्हणू लागले आहेत. अश्या या व्यक्तीमत्वास ‘एम एच मराठी’ कडून ‘भावपूर्ण श्रद्धांजली’.

-संतोष दिवाडकर

कल्याणमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि वाढत्या गुन्हेगारीने माजवले स्तोम; आमदार गणपत गायकवाड यांची आक्रमक पवित्रा

छाया – कुणाल म्हात्रे

कल्याण : कल्याण मधील वाढत्या अमली पदार्थांच्या विक्री व सेवना पाठोपाठ वाढणाऱ्या गुन्हेगारी बाबत शासन तसेच पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथे आंदोलन केले.

कल्याण शहरातील पूर्व भागात वारंवार होणारी गुन्हेगारी व दहशतीचे वातावरण नुकत्याच वयात आलेल्या मुलांना व्यसनाच्या आधीन लावणारे व त्या अनुषंगाने होणारी अंमली पदार्थाची विक्री व सेवन ही चिंताजनक बाब बनली आहे. या सर्वांना वाचा फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टी आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी कल्याण मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्या नियोजनात आंदोलन छेडून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

मागील काही काळापासून कल्याण पूर्वेत अश्या अनेक घटना समोर येत आहेत. रातोरात लोकांच्या गाड्या फोडणे, चोऱ्या माऱ्या, लुटमार, मारहाण, टोळके करून रस्त्यांवर धिंगाणा घालणे अशा घटना वारंवार पुढे येत आहेत. या घटनेत प्रामुख्याने घरच्यांनी मोकाट सोडलेली ऐन विशीतील नुकतेच मिसरुट फुटलेल्या नवतरुणांचा सर्वाधिक समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्थानकात अश्या अनेक तक्रारी देखील प्राप्त होऊ लागल्या आहेत. आणि आणखीन धक्कादायक बाब म्हणजे याच गुन्हेगारांच्या पाठीमागे काही राजकीय नेतेमंडळी देखील हस्तक्षेप करीत असतात. त्यामुळे कुणाच्याही दबावाला न जुमानता गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी शक्य तितकी कठोर पावलं उचलावी आणि संबंधित गुन्हेगारांना अद्दल घडवावी अशी अपेक्षा भाजपा कल्याण पूर्व कडून केली जात आहे. तर पालकांनी देखील आपला पाल्य घराबाहेर काय करतो ? कुठे जातो ? याचाही सुगावा आताच लावलेला बरा. अन्यथा भविष्यात पश्चाताप करायची वेळ येऊ नये म्हणजे मिळवलं.

-संतोष दिवाडकर

‘केडीएमसी’च्या ताफ्यात ‘सीएनजी’वर धावणाऱ्या नवीन घंटागाड्या

कल्याण :- कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा संकलनासाठी वापरत असणाऱ्या घंटागाडीच्या ताफ्यात आता सीएनजीवर धावणाऱ्या घंटागाड्या येणार आहेत. कल्याण डोंबिवली मनपाच्या ताफ्यात डिझेलवर धावणाऱ्या मनपाच्या ११३, खाजगी ५७ घंटागाड्या असुन १२२ प्रभागातील ओला, सुका कचरा सकंलनासाठी त्यांचा वापर होत आहे. सोमवारी नवीन सीएनजी वर धावणाऱी पहिली घंटागाडी मनपाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. 

मनपाच्या ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या नवीन २५ घंटागाड्या येणार असल्याने कचरा संकलनाचे काम आणखी जलद गतीने करता येईल तसेच दोन गँस् सिलेडर क्षमता असलेल्या एका सीएनजी सिलेंडर मध्ये २००किमी. चालणार असुन इंधनाची बचत होणार आहे. अगामी काळात प्रत्येक आठवड्याला ६ सीएनजीवर चालणाऱ्या घंटागाड्या अशा एकुण २५ घंटागाड्या पालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. पर्यावरण पूरक असल्याने  प्रदूषण कमी होण्यास मदत होईल तसेच भारतात पहिल्यांदा सीएनजीवर धावणाऱ्या घंटागाड्या कल्याण डोंबिवली मनपात येत असल्याचे उप आयुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

डॉ.आनंद कासवेकर यांना आंतरराष्ट्रीय महात्मा गांधी शांति पुरस्कार; ऑल इंडिया काँग्रेस सोशल ऑर्गनायझेशन तर्फे सन्मान

ऑल इंडिया काँग्रेस सोशल ऑर्गनायझेशन ने या वर्षी आंतरराष्ट्रीय पीस अवार्ड चे आयोजन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त दिल्ली येथील संविधान सभा (कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडिया ) येथे २ ऑक्टोबर रोजी केले होते. देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथील एका विशेष कार्यक्रमात टिटवाळयातील युवा उद्योजक डॉ.आनंद कासवेकर यांना मान्यवरांच्या हस्ते “महात्मा गांधी शांती पुरस्कार २०२१” देऊन गौरविण्यात आले.

टिटवाळा येथील जय भवानी इंटरप्राइजेस व जे बी ग्रुप कंपनीचे डायरेक्टर डॉ. आनंद कासवेकर यांनी ‘रियल इस्टेट डेव्हलपर्स’ क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले. युवकांना त्यांनी रोजगार प्राप्त करून देऊन त्यांना रिअल इस्टेट बद्दल मार्गदर्शन करून स्वयंसिद्ध केले. कोरोना काळात बरेच लोकउपयोगी कार्य त्यांनी केले.

हा पुरस्कार संपूर्ण भारतातील सामान्य जीवन ते त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय प्रवास करणाऱ्या मान्य वरांना दिला जातो. अशा मान्यवरांना ऑल इंडिया काँग्रेस सोशल ऑर्गनायझेशन हि संस्था त्यांना पुढिल उंतुग प्रवासा साठि कौतुकाची थाप म्हणुन पुरस्कार देऊन सन्मानित करतात. हि संस्था २००८ पासुन विविध क्षेत्रातील मान्यवरांचे पुरस्कार देऊन दर वर्षी २आॉक्टबर रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.

डॉ. आनंद कासवेकर हे गेली २००८ पासुन रिअल इस्टेट & डेव्हलपर या क्षेत्रात काम करत आहे.
२००८ मध्ये एक रिअल इस्टेट एजंट म्हणुन मुंबई मध्ये काम चालू केले ते २०१४ पर्यंत ते पुर्ण महाराष्ट्रभर काम करु लागले. महाराष्ट्रात कुठे ही एखाद्या ग्राहकाला जमीन /घर खरेदी करायचे असेल तर त्याची आपण उपलब्धता करुन देतो. तसेच घर,बंगला,फार्म हाऊस यांचे ही बांधकाम त्यांची कंपनी करते. २०१४ नंतर त्यांनी महाराष्ट्र बाहेर ही कामे करायला सुरुवात केली. आता संपूर्ण भारतात मी माझ्या सर्व सामान्य ग्राहक ते श्रीमंत यांना सेवा देण्याचे काम करत आहे. विशेष म्हणजे मी सर्व सामान्य ग्राहकांना त्यांच्या बजेट नुसार घरांची उपलब्धता करुन देतो. असे त्यांनी या वेळी सांगितले. घनःश्याम कोळंबे (एम्पॉवर ट्रेनर प्रा. लि.), सुरट माटे (ट्रेडिंग सर्विसेस), डॉ राज काले (इंटरनेशनल ट्रेनर), राजेश वारणकर यांची विशेष साथ त्यांना मिळाली.

-जैनेन्द्र सैतवाल