School Election : जिल्हा परिषदेच्या शाळेत झाली निवडणूक; विद्यार्थ्यांमध्ये निवडला मुख्यमंत्री

School Election : विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच नागरिक शास्त्राचे प्रत्यक्ष धडे मिळाले पाहिजेत, लोकशाहीचं प्रत्यक्ष ज्ञान मिळाले पाहिजे या उद्देशाने ही घेतलेली निवडणूक निश्चितच उत्साह वाढवणारी, प्रेरणा देणारी, तसेच शालेय विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारे आहे. सुजाण, सुसंस्कृत नागरिक घडविण्यासाठी शालेय निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत सरपंच राजेंद्र मढवी यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे शालेय विद्यार्थ्यांची निवडणूक पार पडली. त्यावेळी तयार झालेल्या मंत्रिमंडळाला शुभेच्छा देताना राजेंद्र मढवी बोलत होते.

आपल्या गावाचा कारभार ते देशाचा कारभार लोकच चालवत असतात. तसेच आपल्या शाळेचा आपणच कारभार चालवायला पाहिजे, यासाठीच ही शालेय निवडणूक घेतली असे उपक्रमाचे संकल्पना असलेले राहनाळ शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी सांगितले. जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे नुकतीच शालेय विद्यार्थ्यांची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी वोटिंग मशीन या अँड्रॉइडचा वापर करून त्याच्या साह्याने मतदान घेतले. राहनाळ शाळेत एकूण सात पदांसाठी हे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणुकीच्या आदल्या दिवशी अनघा दळवी यांनी मोबाईल ॲपमध्ये नामनिर्देशित उमेदवारांचे फॉर्म भरून घेतले.

या निवडणूक प्रक्रियेत एकूण सात जागांसाठी २२ विद्यार्थी उमेदवार रिंगणात उतरले होते. फॉर्म मागे घेण्याच्या दिवशी दहा मुलांनी माघार घेतली. व बारा उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले. दुपारी जेवणाच्या सुट्टीत मुलांनी प्रचार केला. निवडणूक कर्मचारी एक, दोन, तीन, केंद्राध्यक्ष ही कामे विद्यार्थ्यांनीच केली. त्यासाठी चित्रा पाटील यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कोणीही बोगस मतदान किंवा नोटाचा वापर केला नाही हे विशेष असे रसिका पाटील यांनी सांगितले. इयत्ता तिसरी ते सातवीच्या शंभर मुलांनी यावेळी मतदान केले. मतदानाची वेळ संपल्यावर बटन बंद करून मतदान प्रक्रिया संपल्याचे मतदान अधिकारी तेजस बोटके यांनी निकालासाठी रिझल्ट बटन दाबून स्क्रीनवर दिसणारा निकाल सर्वांच्या उपस्थितीत जाहीर केला.

निवडणूकीत जिंकलेल्या विद्यार्थांनी निकाल लागताच एकच जल्लोष केला. निवडून आलेल्या विद्यार्थ्यांमधूनच मंत्रिमंडळ तयार करण्यात आले. मंत्रिमंडळात मुख्यमंत्री राकेश चौहान,  उपमुख्यमंत्री सुमंत सिंग, शिक्षण मंत्री तन्वी निस्कुळ, सांस्कृतिक मंत्री मीत कडू, आरोग्यमंत्री संस्कृती शिगवण, पर्यावरण मंत्री नेहा झिंझुरडे, क्रीडामंत्री श्रेयस कुंभार यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाचे राहनाळ गावचे सरपंच राजेंद्र मढवी यांनी शाळ व श्रीफळ देऊन सत्कार करत या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. राहनाळ गावातील ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

कुणाल म्हात्रे

School Election: Election was held in Zilla Parishad school; Chief Minister elected among students

Shrikant Shinde : खासदारांच्या दौऱ्यात कल्याण पूर्वेच्या शाखेत राढा? ‘ही’ माहिती आली पुढे

Shrikant Shinde :- शिवसेना कल्याण उपशहर संघटक आशा रसाळ यांनी खासदार श्रीकांत शिंदेच्या कॉलरला धरून शिवसेनेच्या शाखेबाहेर काढले असल्याची एक पोस्ट काल पासून समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. श्रीकांत शिंदे यांनी काल कल्याण पूर्वेचा दौरा केला होता. याचदरम्यान कोळसेवाडी येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेत हा प्रकार घडला असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात होता. व असे कोणतेही कृत्य घडले नसून अज्ञात इसमाने ही पोस्ट व्हायरल केली असल्याचा खुलासा आशा रसाळ यांनी स्वतःच आता पोलिसां समोर केला आहे. पक्षांतर्गत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी तरी करीत असल्याचे सांगत अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोस्ट मागे कोणाचा हात आहे हा तपास सध्या पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती कल्याण परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे.

शिवसैनिकांनी मध्यवर्ती शाखेला टाळे ठोकले होते. यानंतर शिंदे समर्थकांनी कुलूप तोडले असून श्रीकांत शिंदे यांनी आत प्रवेश करू नये म्हणून आशा रसाळ यांनी त्यांना आत जाण्यास प्रतिबंध करीत गदारोळ केला असल्याचे व्हायरल पोस्ट मध्ये नमूद केले आहे. मात्र आता या पोस्ट बाबत त्यांना कसलीही कल्पना नसून अज्ञात इसमाने तेढ निर्माण करण्यासाठी हे केले असावे असा खुलासा त्यांनी स्वतः पोलिसांसमोर केला असल्याची माहिती स्वतः पोलिसांनी दिली आहे. आता यामागे कोण होते ? हा तपास सायबर सेल कडे सुपूर्द करण्यात आलेला आहे.

-संतोष दिवाडकर

Shrikant Shinde: Dispute in Kalyan East branch during MP’s visit? Sensation by viral post

Eknath Shinde : नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी वालधुनी नदी विकासाच्या खेळखंडोब्यास न्याय देण्याची मागणी  

कल्याण : वालधुनी नदी विकासाचा प्रस्ताव हा गेली कित्तेक वर्षे शासन दरबारी अक्षरशः धूळ खात पडलेला आहे. जागृत नागरिकांनी हा मुद्दा मंत्रालय, जिल्हाधिकारी आणि खालील नगरपालिका आणि महानगरपालिकांमधे गेली अनेक वर्षे लावून धरला आहे. तरी वालधुनी नदीच्या ताकास अद्यापि तूर लागलेला नाही. त्यामुळे नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी ( Eknath Shinde ) वालधुनी नदी विकासाच्या खेळखंडोब्यास न्याय देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.  

२००५ च्या प्रलयंकारी महापुरा नंतर मुंबईतील मिठी आणि ठाणे जिल्ह्यातील मलंग गडाच्या पायथ्याशी उगम पाऊन, पुढे अंबरनाथ नगरपालिका, उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातून वाहणारी वालधुनी नदी चर्चेत आली. कारण या नद्यांमुळे या शहरांत महापुरात मोठी जिवित आणि वित्तहानी झाली होती. तत्कालिन सरकारने त्या नंतर लगेच, दोन्ही नद्यांचा विकास करण्याचा प्रस्ताव पारित केला होता. 

यातील मिठी नदी विकासाचे काम एमएमआरडीएकडे सोपवून काही वर्षात पूर्ण करण्यात आले. त्या नंतरच्या काळात मिठी नदीच्या पुरामुळे उद्भवणारी मुंबईतील समस्या सुटली. मात्रं वालधुनी नदी विकासाचे काम जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत स्थानिक प्रशासनाच्या माथी मारण्यात आले. वेग वेगळ्या शहरातील स्थानिक प्रशासनातील समन्वयाच्या व निधीच्या अभावामुळे वालधुनी नदी विकासाचा मुद्दा कळीचा झाला आहे.

येथिल नागरिक मात्रं, पूर आणि प्रदूषणाच्या जीवघेण्या विळख्यात अडकले आहेत. त्यामुळे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कर्मभूमी मधिल जटिल समस्यांचे मार्ग सुकर करावेत अशी मागणी विनोद शिरवाडकर यांनी केली आहे.

-कुणाल म्हात्रे

Newly elected Chief Minister Eknath shinde demands justice for Valdhuni river development

Dombivali Crime : गांजा तस्करी साठी आलेल्या २ गांजा तस्करांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Dombivali Crime : मानपाडा पोलिसांनी ओडिसा वरून २७२ किलो गांज्याची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. फैजल फारुख ठाकूर आणि मोहम्मद आतीफ हाजीजउल्ला अन्सारी अशी या आरोपींची नावे असून या आरोपींकडून २६३ किलो गांजा, ६ मोबाईल, एक इनोवा कार अशाप्रकारे २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा गांजा कोणासाठी व कुठे विक्रीसाठी आणला होता याचा तपास पोलीस करत आहे.

गेल्या काही दिवसांत ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असल्याने पोलीस ऍक्शन मोड वर येत गेले काही दिवसांपासून अनेक ठिकाणी नाकाबंदी व छापे मारून गांजा विकणाऱ्या व गांजाची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या मुस्क्या आवळत आहेत. त्याच प्रकारे मानपाडा पोलीस ठाण्याचे एपीआय अनिल भिसे यांना दोन व्यक्ती उडीसा वरून मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी डोंबिवलीत आणणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून मिळाली होती.

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या आदेशानंतर एक पथक बनवून डोंबिवली मानपाडा परिसरात शोधमोहीम सुरू केली. या शोध मोहीमे दरम्यान डोंबिवली मधील उबार्ली गावात एक संशयित इनोव्हा कार उभी असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्या नंतर मानपाडा पोलीसांनी त्या ठिकाणी जाऊन कार मालकाची विचारपूस सुरू केली. पोलिसांच्या चौकशी दरम्यान ईनोवा कार मधील आरोपीने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी कारची झडती घेत कार मधून 272 किलो गांजा जप्त करत कार मधील या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांना खाकी दाखवत पुन्हा विचारपूस सुरू केली असता त्यांनी हा गांजा ठाणे व ठाण्याजवळील उपनगरामध्ये छोटे-मोठे गांजाच्या व्यापाऱ्यांना तस्करी करून विक्रीसाठी देत असल्याची कबुली दिली.

-संतोष दिवाडकर

Dombivali Crime: Police handcuffed 2 cannabis smugglers who came for cannabis smuggling

Farmer Day व Doctors Day चे औचित्य साधत आंबिवली जैवविविधता उदयान येथे वृक्षारोपण

Farmer Day : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत आंबिवली येथील वन जमिनीवर सुमारे ४० एकर जागेवर वनराई साकारली असून जैवविविधता उदयान उभारले आहे. या उदयानात एकाच ठिकाणी फुलपाखरु उदयान, बॅट पार्क, बी पार्क, नक्षत्र उदयान, मेडीसिनल प्लांट पार्क अनोखे आहेत.

आज कृषी दिन व डॉक्टर्स डे औचित्य साधून या ठिकाणी महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रातील डॉक्टरांच्या विविध संघटना तसेच क्रेडाई-एमसीएचआय आणि कल्याण डोंबिवली युनिट यांचा दौरा व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जैवविविधता पार्कमध्ये आज महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन कार्यक्रम साजरा केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, आयएमए चे डॉ. प्रशांत पाटील, विविध संघटनांचे प्रतिनिधी, एमसीएचआयचे प्रतिनिधी, वृक्ष अधिकारी तथा महापालिका सचिव संजय जाधव, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील व महापालिका शाळांचे विदयार्थी, आय नेचर फाऊंडेशनचे प्रतिनिधी तसेच अनेक वृक्ष प्रेमी उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

Plantation at Ambivali Biodiversity Park on the occasion of Farmer Day and Doctors Day