Kalyan Murder : नशेसाठी पैसे न दिल्याने आईची हत्या करून लटकवले फासावर

Kalyan Murder : नशेच्या अतिरेकामुळे जन्मदात्या आईवडिलांची हत्या करण्यास धजावत आहेत याचा प्रत्यय कल्याण पूर्वेतील आला आहे. नशेबाज मुलाने आईकडून पैसे मागितले. आई पैसे देण्यास नकार दिला. मुलाने गळा आवळून आईची हत्या केली. ही हत्या नाही तर आत्महत्या आहे हे दाखविण्यासाठी त्याने आईचा मृतदेह घरात लटकवून ठेवला. पोस्टमार्टम रिपोर्टच्या खुलाशानंतर कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी आईची हत्या करणारा मुलगा रवी पुमणी याला अटक केली आहे.

कल्याण पूर्व भागात हनुमाननगर परिसरात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी दिगंबर पवार यांना एक माहिती मिळाली. या माहितीनुसार हनुमाननगर परिसरात एका घरात एका ६४वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी दिगंबर पवार आणि महिला पोलीस अधिकारी निशा चव्हाण यांनी या आत्महत्येच्या घटनेचा तपास सुरु केला. मृत महिलेचे नाव सरोजा पुमणी होते. पोलिसांनी सरोजा यांचा मृतदेह पोस्र्टमार्टमसाठी पाठविला.

घरात सरोजा व त्यांचा ३४ वर्षीय मुलगा रवी पुमणी राहत होते. पोस्टमार्टमनंतर डॉक्टरांनी दिलेला अहवाल पाहून पोलिस हैराण झाले. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. पोलिसांनी तात्काळ मुलगा रवी याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्यानंतर जे वास्तव समोर आले ते धक्कादायक होते. मुलगा रवी हा नशेबाज आहे. नशा करण्यासाठी आईकडून वारंवार पैसे मागायचा. त्यासाठी आईसोबत तो भांडण करायचा. सोमवारी रात्री आई मुलात जोरदार भांडण झाले. या रवीला दुखापत झाली. रवीने गळा आवळून आईची हत्या केली. ते लपविण्यासाठी रवीने आईचा मृतदेह घरात लटकविला. आईने आत्महत्या केल्याचे भासविले. मात्र कोळसेवाडी पोलिसांच्या सखोल तपासाअंती ही हत्या उघडकीस आली आहे.

-रोशन उबाळे

Kalyan Murder : Mother was killed and hanged for not paying for drugs

Arya Gurukul : आर्यग्लोबलने शिक्षक दिनी ‘सेल्फ-केअर’ वर केले लक्ष केंद्रित

Arya Gurukul : आर्य गुरुकुल अंबरनाथ येथे २ वर्षांच्या ऑनलाइन कार्यक्रमांनंतर आयोजित केलेल्या अनोख्या शिक्षक दिनाच्या सोहळ्याने शिक्षकांना त्यांच्या बाह्य स्वरूपाची काळजी घेण्यासाठी आणि संपूर्ण शारीरिक आरोग्य राखण्यासाठी अंतर्दृष्टीपूर्ण माहिती दिली. या कार्यक्रमाला आर्य गुरुकुल अंबरनाथ, नांदिवली, सेंट मेरीज हायस्कूल कल्याण आणि लिटल आर्यन प्री.के. यांचा समावेश होता.

शिक्षक दिवसाला अर्थपूर्ण बनवण्यासाठी आर्यग्लोबलने नेत्रदीपक सत्र आयोजित केले होते. वैष्णवी शूर, प्रतिमा सल्लागार. तिने शिक्षकांना त्यांचे स्वतःचे व्यक्तिमत्व उंचावण्यासाठी योग्य टिप्स दिल्या. “शिक्षक हे समाजाचा चेहरा आहेत आणि मुलांसाठी आदर्श आहेत, म्हणून त्यांनी स्वतःची वेषभूषा आणि स्वतःचे आचरण यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. मुलांनी त्यांच्या शिक्षकांना सुंदर पोशाख केलेले पाहणे आणि आत्मविश्वासाने दिसणे महत्वाचे आहे जेणेकरून ते त्यांचे अनुकरण करू शकतील असे मिस शूर म्हणाल्या. पुढे आपल्या महत्वाच्या माहिती भाषणात डॉ. फिजिओथेरपिस्ट लीना धांडे यांनी शारीरिक मुद्रा चांगली ठेवण्याबाबत माहिती दिली.

मुद्रा-प्रेरित वेदना आणि वेदनांची तक्रार आणि शिक्षकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. ते बरेच तास बसले होते आणि अनेकदा चुकीच्या पवित्रा किंवा अस्वस्थ आसनांचा वापर करत होते. डॉ. धांडे यांनी ‘एर्गोनॉमिक्स’कडे लक्ष देण्यावर अत्यंत आवश्यक प्रकाश टाकला आणि काही सोप्या व्यायामाचे प्रात्यक्षिक दाखवले जे ते दिवसा करू शकतात.

“आत्मविश्वास दिसण्यासाठी आरोग्य आणि निरोगीपणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. चांगली मुद्रा ठेवल्याने केवळ आत्मविश्वासच दिसत नाही तर शारीरिक व्याधींपासून दूर राहण्याची खात्रीही मिळते”, डॉ. धांडे यांनी पुढे जाऊन आश्वासन दिले आहे की पालक आणि मुले दोघांसाठीही समान कार्यशाळा आयोजित केली जाऊ शकते, कारण ते देखील साथीच्या आजाराने ग्रस्त आहेत.

कार्यक्रमासाठी निमंत्रित विशेष पाहुणे डॉ. हरिपाल सोनवत, माजी शास्त्रज्ञ, टीआयएफआर; डॉ. रीता सोनवत, माजी डीन आणि एचओडी मानव विकास, एसएनडीटी महिला विद्यापीठ; स्वामिनी निष्कलानंद, आचार्य चिन्मय मिशन, कल्याण. एज्युकेशन टुडे फाउंडेशनचे अध्यक्ष भरत मलिक, निलेश राठोर मुख्याध्यापक आर्य गुरुकुल अंबरनाथ, राधामणी अय्यर प्राचार्य आर्य गुरुकुल नांदिवली, दिव्या बोरसे प्राचार्य सेंट मेरीज हायस्कूल आणि लिटल आर्यनचे केंद्रप्रमुख प्री-के.

हा कार्यक्रम शिक्षकांनी शिक्षकांसाठी आयोजित केला होता. नृत्य आणि संगीत विभागांच्या तर्फे विनोदी सादरीकरण झाले. एका विशेष स्किटमध्ये शिक्षकाच्या जीवनातील अनेक पैलूंचे चित्रण करण्यात आले होते. मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात असे व्यक्त केले की शिकवणे हे व्यवसायापेक्षा बरेच काही आहे आणि याचा अर्थ जीवन जोपासणे, विश्वास निर्माण करणे आणि आयुष्यभर शिकत राहणे.

ईटीएफचे अध्यक्ष भरत मलिक म्हणाले, “आमच्या प्रणालीतील सर्वात महत्त्वाचे भागधारक हे मुले, पालक आणि गुरु आहेत. गुरू हे असे आहेत जे मुलाच्या मनावर खूप प्रभाव पाडतात आणि म्हणूनच त्यांनी मुलावर लक्ष केंद्रित करून स्वतःवर कार्य केले पाहिजे.” ‘हॅपी चाइल्ड हॅपी नेशन’ हे शाळेचे ब्रीदवाक्य आणि ‘हॅपी चाइल्ड’ तयार करण्यात शिक्षकांची भूमिका त्यांनी सांगितली. त्यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांनाही श्रद्धांजली वाहिली, ज्यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

आर्यग्लोबलचा विश्वास आहे की त्यांचे शिक्षक भविष्यातील मनांना आकार देण्यासाठी सक्षम आणि सुसज्ज असले पाहिजेत. म्हणून, ते शिक्षकांसाठी वर्षभर अनेक कार्यक्रम आयोजित करतात. जसे की शिक्षक शिक्षण सत्र, प्रशिक्षण कार्यक्रम, कौशल्य विकास आणि सक्षमता निर्माण कार्यक्रम, वार्षिक पुनरावलोकन आणि नियोजन बैठक. यामुळे शिक्षकांना प्रोत्साहन मिळते आणि शिक्षणातील नवीनतम माहिती मिळते. सध्या, आर्याग्लोबल ग्रुप ऑफ स्कूल्सचे सर्व शिक्षक मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर प्रमाणित आहेत आणि शिकवताना तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये तज्ञ आहेत.

जे भविष्याची मने घडवतात, जीवनाचे महत्त्वाचे धडे देतात आणि मुलांना यशस्वी जीवन जगण्यासाठी ज्ञानाने सुसज्ज करतात ते नक्कीच कौतुकास पात्र आहेत. शिक्षक दिन हा असाच एक प्रसंग. आर्याग्लोबल ग्रुप ऑफ स्कूल्सने त्यांच्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी त्यांच्या शिक्षकांसाठी आनंद, आणि स्वत: ची काळजी यांनी भरलेल्या निवांत दिवसाचा आनंद घेण्यासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करून घेतली. या कार्यक्रमाची सांगता शिक्षकांना देण्यात आलेल्या या दिवसाचा आनंद लुटणार्‍या शिक्षकांसाठी देण्यात आलेल्या मनमुराद भोजनाने झाली.

-संतोष दिवाडकर

Arya Gurukul : AryaGlobal focuses on ‘Self-Care’ on Teachers’ Day

Kalyan Dombivli : खड्डे बुजवण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर

Kalyan Dombivli : कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा केला आहे. पावसाने उसंती देत नसल्याने खड्डे भरण्याचे कामाला अडथळा ठरला आहे का असा प्रश्न उपस्थित होऊन शहरातील रस्त्यावरील खड्डे पाहता हा दावा आता संशोधनाचा विषय ठरला आहे. शहरातून जाणाऱ्या एमएसआरडीसी पीडब्ल्यूडी अंतर्गत असलेल्या रस्त्यावर देखील खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. एकंदरीतच संबधित यंत्रणांकडून खड्डे बुजवण्याचे काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. त्यामुळे वाहतुकीस अडचण आणि परिणामी होणारी वाहनाची संथ गती आता खड्डे भरण्यासाठी वाहतूक पोलीसच सरसावले आहेत.

नागरिक खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहेत. तर दुसरीकडे वाहतूक पोलिसांची वाहतूक कोंडी सोडवता सोडवता दमछाक होतेय. त्यामुळे आता कल्याण डोंबिवली शहरात वाहतूक पोलिसांनी खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.

डोंबिवली पूर्वकडील टिळक चौक ते शेलार नाक्यापर्यत पडलेले खड्डे बुजवन्यासाठी पुन्हा वाहतूक पोलीसच सरसवल्याचे आज दिसून आले. वाहतूक व्यवस्थेबरोबर रस्त्यावर अपघात होऊ नये याकरता वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर खडी टाकून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवून वाहनचालकांना थोडा का होईना पण दिलासा देत प्रशासनाला शिकवण दिली आहे.

-रोशन उबाळे

Kalyan Dombivli : Traffic police on roads to plug potholes

Barvi Dam : बारवी धरण झाले ओव्हरफ्लो

कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या शहरी तसेच ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण आज रात्री आठच्या दरम्यान ओव्हरफ्लो झाले आहे. धरणातील क्षमते पेक्षा जास्त पाणी होत असल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असल्याची माहिती आहे.

जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने जोरदार बरसात केल्याने बारवी धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली होती. मात्र नंतर पावसाने उसंत घेतल्याने धरणातील पाणीसाठ्यात होणारी वाढ थांबली होती. यानंतर मागील काही दिवसांपासून पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने थांबलेली वाढ पुन्हा सुरू झाली. यानंतर धरण आता पूर्ण क्षमतेने भरले आहे.

बारवी धरण उप अभियंते संजय माने यांच्या कडून मिळालेल्या माहिती नुसार बारवी धरण १००% भरले असुन धरणात ७२.६० घन मिटर इतका पाणीसाठा झालेला आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्याने सतर्क रहावे लागणार आहे. मात्र असे असले तरी पावसाने उसंत घेतला असून पूरपरिस्थिती ओढवण्याची शक्यता नसून कोणत्याही प्रकारच्या अफवांवर मात्र विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासना कडून केले जात आहे. सध्या धरणाच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

-संतोष दिवाडकर

Barvi Dam : Barvi Dam overflowed

Maratha Morcha : मंगळवारी कल्याण मध्ये मराठा जनआक्रोश मोर्चा

Maratha Morcha : मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी कल्याणमध्ये सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संदर्भात कल्याणच्या शासकीय विश्राम गृहात नुकतीच बैठक पार पडली. मंगळवारी सकाळी १० वाजता कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे.

या मोर्चाच्या माध्यमातून ५० टक्क्यांच्या आतील मराठा आरक्षण ओबीसी मधून, इडब्ल्यूएस आरक्षण, शासकीय सेवेमधील विद्यार्थ्यांना नियुक्तीचा अडचणीबाबत, सारथी संस्थेमधील विद्यार्थ्यांचे प्रश्न, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचा प्रश्‍न व इतर मागण्यांसाठी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, दिवा, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी, कर्जत, कसारा, मुरबाडसह  संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील सर्व मराठा समाजातील नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

Maratha Morcha: Maratha Janakrosh Morcha in Kalyan on Tuesday

School Election : जिल्हा परिषदेच्या शाळेत झाली निवडणूक; विद्यार्थ्यांमध्ये निवडला मुख्यमंत्री

School Election : विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच नागरिक शास्त्राचे प्रत्यक्ष धडे मिळाले पाहिजेत, लोकशाहीचं प्रत्यक्ष ज्ञान मिळाले पाहिजे या उद्देशाने ही घेतलेली निवडणूक निश्चितच उत्साह वाढवणारी, प्रेरणा देणारी, तसेच शालेय विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारे आहे. सुजाण, सुसंस्कृत नागरिक घडविण्यासाठी शालेय निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत सरपंच राजेंद्र मढवी यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे शालेय विद्यार्थ्यांची निवडणूक पार पडली. त्यावेळी तयार झालेल्या मंत्रिमंडळाला शुभेच्छा देताना राजेंद्र मढवी बोलत होते.

आपल्या गावाचा कारभार ते देशाचा कारभार लोकच चालवत असतात. तसेच आपल्या शाळेचा आपणच कारभार चालवायला पाहिजे, यासाठीच ही शालेय निवडणूक घेतली असे उपक्रमाचे संकल्पना असलेले राहनाळ शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी सांगितले. जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे नुकतीच शालेय विद्यार्थ्यांची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी वोटिंग मशीन या अँड्रॉइडचा वापर करून त्याच्या साह्याने मतदान घेतले. राहनाळ शाळेत एकूण सात पदांसाठी हे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणुकीच्या आदल्या दिवशी अनघा दळवी यांनी मोबाईल ॲपमध्ये नामनिर्देशित उमेदवारांचे फॉर्म भरून घेतले.

या निवडणूक प्रक्रियेत एकूण सात जागांसाठी २२ विद्यार्थी उमेदवार रिंगणात उतरले होते. फॉर्म मागे घेण्याच्या दिवशी दहा मुलांनी माघार घेतली. व बारा उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले. दुपारी जेवणाच्या सुट्टीत मुलांनी प्रचार केला. निवडणूक कर्मचारी एक, दोन, तीन, केंद्राध्यक्ष ही कामे विद्यार्थ्यांनीच केली. त्यासाठी चित्रा पाटील यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कोणीही बोगस मतदान किंवा नोटाचा वापर केला नाही हे विशेष असे रसिका पाटील यांनी सांगितले. इयत्ता तिसरी ते सातवीच्या शंभर मुलांनी यावेळी मतदान केले. मतदानाची वेळ संपल्यावर बटन बंद करून मतदान प्रक्रिया संपल्याचे मतदान अधिकारी तेजस बोटके यांनी निकालासाठी रिझल्ट बटन दाबून स्क्रीनवर दिसणारा निकाल सर्वांच्या उपस्थितीत जाहीर केला.

निवडणूकीत जिंकलेल्या विद्यार्थांनी निकाल लागताच एकच जल्लोष केला. निवडून आलेल्या विद्यार्थ्यांमधूनच मंत्रिमंडळ तयार करण्यात आले. मंत्रिमंडळात मुख्यमंत्री राकेश चौहान,  उपमुख्यमंत्री सुमंत सिंग, शिक्षण मंत्री तन्वी निस्कुळ, सांस्कृतिक मंत्री मीत कडू, आरोग्यमंत्री संस्कृती शिगवण, पर्यावरण मंत्री नेहा झिंझुरडे, क्रीडामंत्री श्रेयस कुंभार यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाचे राहनाळ गावचे सरपंच राजेंद्र मढवी यांनी शाळ व श्रीफळ देऊन सत्कार करत या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. राहनाळ गावातील ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

कुणाल म्हात्रे

School Election: Election was held in Zilla Parishad school; Chief Minister elected among students

Shrikant Shinde : खासदारांच्या दौऱ्यात कल्याण पूर्वेच्या शाखेत राढा? ‘ही’ माहिती आली पुढे

Shrikant Shinde :- शिवसेना कल्याण उपशहर संघटक आशा रसाळ यांनी खासदार श्रीकांत शिंदेच्या कॉलरला धरून शिवसेनेच्या शाखेबाहेर काढले असल्याची एक पोस्ट काल पासून समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. श्रीकांत शिंदे यांनी काल कल्याण पूर्वेचा दौरा केला होता. याचदरम्यान कोळसेवाडी येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेत हा प्रकार घडला असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात होता. व असे कोणतेही कृत्य घडले नसून अज्ञात इसमाने ही पोस्ट व्हायरल केली असल्याचा खुलासा आशा रसाळ यांनी स्वतःच आता पोलिसां समोर केला आहे. पक्षांतर्गत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी तरी करीत असल्याचे सांगत अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोस्ट मागे कोणाचा हात आहे हा तपास सध्या पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती कल्याण परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे.

शिवसैनिकांनी मध्यवर्ती शाखेला टाळे ठोकले होते. यानंतर शिंदे समर्थकांनी कुलूप तोडले असून श्रीकांत शिंदे यांनी आत प्रवेश करू नये म्हणून आशा रसाळ यांनी त्यांना आत जाण्यास प्रतिबंध करीत गदारोळ केला असल्याचे व्हायरल पोस्ट मध्ये नमूद केले आहे. मात्र आता या पोस्ट बाबत त्यांना कसलीही कल्पना नसून अज्ञात इसमाने तेढ निर्माण करण्यासाठी हे केले असावे असा खुलासा त्यांनी स्वतः पोलिसांसमोर केला असल्याची माहिती स्वतः पोलिसांनी दिली आहे. आता यामागे कोण होते ? हा तपास सायबर सेल कडे सुपूर्द करण्यात आलेला आहे.

-संतोष दिवाडकर

Shrikant Shinde: Dispute in Kalyan East branch during MP’s visit? Sensation by viral post

Eknath Shinde : नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी वालधुनी नदी विकासाच्या खेळखंडोब्यास न्याय देण्याची मागणी  

कल्याण : वालधुनी नदी विकासाचा प्रस्ताव हा गेली कित्तेक वर्षे शासन दरबारी अक्षरशः धूळ खात पडलेला आहे. जागृत नागरिकांनी हा मुद्दा मंत्रालय, जिल्हाधिकारी आणि खालील नगरपालिका आणि महानगरपालिकांमधे गेली अनेक वर्षे लावून धरला आहे. तरी वालधुनी नदीच्या ताकास अद्यापि तूर लागलेला नाही. त्यामुळे नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी ( Eknath Shinde ) वालधुनी नदी विकासाच्या खेळखंडोब्यास न्याय देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.  

२००५ च्या प्रलयंकारी महापुरा नंतर मुंबईतील मिठी आणि ठाणे जिल्ह्यातील मलंग गडाच्या पायथ्याशी उगम पाऊन, पुढे अंबरनाथ नगरपालिका, उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातून वाहणारी वालधुनी नदी चर्चेत आली. कारण या नद्यांमुळे या शहरांत महापुरात मोठी जिवित आणि वित्तहानी झाली होती. तत्कालिन सरकारने त्या नंतर लगेच, दोन्ही नद्यांचा विकास करण्याचा प्रस्ताव पारित केला होता. 

यातील मिठी नदी विकासाचे काम एमएमआरडीएकडे सोपवून काही वर्षात पूर्ण करण्यात आले. त्या नंतरच्या काळात मिठी नदीच्या पुरामुळे उद्भवणारी मुंबईतील समस्या सुटली. मात्रं वालधुनी नदी विकासाचे काम जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत स्थानिक प्रशासनाच्या माथी मारण्यात आले. वेग वेगळ्या शहरातील स्थानिक प्रशासनातील समन्वयाच्या व निधीच्या अभावामुळे वालधुनी नदी विकासाचा मुद्दा कळीचा झाला आहे.

येथिल नागरिक मात्रं, पूर आणि प्रदूषणाच्या जीवघेण्या विळख्यात अडकले आहेत. त्यामुळे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कर्मभूमी मधिल जटिल समस्यांचे मार्ग सुकर करावेत अशी मागणी विनोद शिरवाडकर यांनी केली आहे.

-कुणाल म्हात्रे

Newly elected Chief Minister Eknath shinde demands justice for Valdhuni river development

Dombivali Crime : गांजा तस्करी साठी आलेल्या २ गांजा तस्करांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Dombivali Crime : मानपाडा पोलिसांनी ओडिसा वरून २७२ किलो गांज्याची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. फैजल फारुख ठाकूर आणि मोहम्मद आतीफ हाजीजउल्ला अन्सारी अशी या आरोपींची नावे असून या आरोपींकडून २६३ किलो गांजा, ६ मोबाईल, एक इनोवा कार अशाप्रकारे २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा गांजा कोणासाठी व कुठे विक्रीसाठी आणला होता याचा तपास पोलीस करत आहे.

गेल्या काही दिवसांत ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असल्याने पोलीस ऍक्शन मोड वर येत गेले काही दिवसांपासून अनेक ठिकाणी नाकाबंदी व छापे मारून गांजा विकणाऱ्या व गांजाची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या मुस्क्या आवळत आहेत. त्याच प्रकारे मानपाडा पोलीस ठाण्याचे एपीआय अनिल भिसे यांना दोन व्यक्ती उडीसा वरून मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी डोंबिवलीत आणणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून मिळाली होती.

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या आदेशानंतर एक पथक बनवून डोंबिवली मानपाडा परिसरात शोधमोहीम सुरू केली. या शोध मोहीमे दरम्यान डोंबिवली मधील उबार्ली गावात एक संशयित इनोव्हा कार उभी असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्या नंतर मानपाडा पोलीसांनी त्या ठिकाणी जाऊन कार मालकाची विचारपूस सुरू केली. पोलिसांच्या चौकशी दरम्यान ईनोवा कार मधील आरोपीने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी कारची झडती घेत कार मधून 272 किलो गांजा जप्त करत कार मधील या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांना खाकी दाखवत पुन्हा विचारपूस सुरू केली असता त्यांनी हा गांजा ठाणे व ठाण्याजवळील उपनगरामध्ये छोटे-मोठे गांजाच्या व्यापाऱ्यांना तस्करी करून विक्रीसाठी देत असल्याची कबुली दिली.

-संतोष दिवाडकर

Dombivali Crime: Police handcuffed 2 cannabis smugglers who came for cannabis smuggling

Farmer Day व Doctors Day चे औचित्य साधत आंबिवली जैवविविधता उदयान येथे वृक्षारोपण

Farmer Day : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत आंबिवली येथील वन जमिनीवर सुमारे ४० एकर जागेवर वनराई साकारली असून जैवविविधता उदयान उभारले आहे. या उदयानात एकाच ठिकाणी फुलपाखरु उदयान, बॅट पार्क, बी पार्क, नक्षत्र उदयान, मेडीसिनल प्लांट पार्क अनोखे आहेत.

आज कृषी दिन व डॉक्टर्स डे औचित्य साधून या ठिकाणी महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रातील डॉक्टरांच्या विविध संघटना तसेच क्रेडाई-एमसीएचआय आणि कल्याण डोंबिवली युनिट यांचा दौरा व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जैवविविधता पार्कमध्ये आज महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन कार्यक्रम साजरा केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, आयएमए चे डॉ. प्रशांत पाटील, विविध संघटनांचे प्रतिनिधी, एमसीएचआयचे प्रतिनिधी, वृक्ष अधिकारी तथा महापालिका सचिव संजय जाधव, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील व महापालिका शाळांचे विदयार्थी, आय नेचर फाऊंडेशनचे प्रतिनिधी तसेच अनेक वृक्ष प्रेमी उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

Plantation at Ambivali Biodiversity Park on the occasion of Farmer Day and Doctors Day