Shilim Village : गावखेड्यांचा कायापालट; अर्थात हरवलेलं गावपन

Shilim Village भारत देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागला आणि देशातील गावखेडी वेगानं विकसित होऊ लागली. शहर आडवी उभी पसरली तर गावांनी हळूहळू शहरात रूपांतर व्हायला सुरुवात केली. पण यात एक गोष्ट मात्र हरवत चालली आहे. ते म्हणजे गावाचं गावपन. भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना गाव म्हणजे काय असतं ? हे देखील कळणे कठीणच. जसं पूर्वी शहरात असे म्हटले जाई की ज्याला गाव आहे तो खरंच भाग्यवान. पण भविष्यात गाव उरतील का ? असा संभ्रम तयार झाला आहे.

गावाचे आधुनिकीकरण होत गेले की त्या गावाला शहर म्हटले जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एखाद्या शहराच्या अथवा परिसराच्या नावात गाव शब्द असणे. उदा. तळेगाव, गोरेगाव, तिसगाव. आता यांच्या नावातच गाव आहे. याचे मूळ कारण म्हणजे कधी एके काळी हे खरोखरच एक गाव होते. मात्र बदलत्या काळानुसार आज यांना शहर म्हणून बघितले जाते. जसे की तळेगाव शहर, गोरेगाव शहर. बदलाचे हे एक उत्तम उदाहरण आहे पण हा बदल पाहणारी पिढी म्हणजे आपल्या आजी आजोबांची. आता जो बदल मी पाहतोय त्या बद्दल मला सांगावेसे वाटेल. इथून पुढे मी बालपणापासूनच्या काही आठवणी आणि बदलांना उजाळा देणार आहे.

जन्मा पासून कल्याण मध्ये राहत असलो तरी माझे मूळ गाव म्हणजे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शिळीम हे गाव. लहानपणा पासून गावा बद्दल एक वेगळंच आकर्षण असे. शहरी गजबजलेल्या भागातून शांत निसर्गाच्या सानिध्यात जाणे हे म्हणजे स्वर्ग सुखापेक्षा मोठे नाही. त्यामुळे गणपती आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आतुरतेने वाट आम्ही पाहत असे.

उन्हाळ्याचा दाह आणि शाळेची वार्षिक परीक्षा संपायची वेळ आली की चाहूल लागायची गावाची. शेवटचा पेपर लिहता लिहता गावाला जाण्याबाबत अगोदरच आतुरता लागलेली असायची. कारण बऱ्याच महिन्यानंतर आता गावाची मजा येणार होती. हा काळ असेल साधारणपणे २००३ चा.

ज्या दिवशी गावाला जायचे असते त्याच्या काही दिवसांपूर्वी मी तर नुसते दिवसच मोजत असे. मग गावाला काय काय न्यायचे ? काय काय करायचे ? कुणाला काय काय सांगायचे ? हे सर्व आगोदर ठरलेले असे. मुळात मोबाईल नावाचा प्रकार नसल्याने तिकडे काय काय चालू आहे ? याची कल्पना नसल्याने बरेच काही नवीन ऐकावयास मिळणार हेही माहीत असायचे. त्यामुळे गप्पा मारण्यासाठी पुरेसे विषय जवळ असायचे.

गावाला जाण्याच्या दिवशी सकाळी भल्या पहाटे आपोआपच जाग येई. अंघोळ आवरून तयारी करून घराला कुलूप लावून आम्ही निघे. पप्पा जवळ भल्या मोठ्या बेगी असत. आईकडे एखादी कमी वजनाची बेग आणि आम्ही दोघे बहीण भाऊ मोकळे. रिक्षातून एसटी स्टॅन्ड आणि त्यानंतर एसटी मध्ये चढून आरक्षण केलेल्या सीटवर जाऊन खिडकीत बसणे. एसटी मधली विंडो सीट आम्ही बहीण भाऊ एक एक स्थानकानंतर बदलत असे. आमचा हा क्रम कामशेत येई पर्यंत चालत असे.

कामशेतला आल्या नंतर जुन्या एसटी स्टॅंडवर बराच वेळ बसावे लागे. खूप सारे गावकरी तिथे एसटीची वाट बघत असे. “१२ ची एसटी कव्हा यायची ?” अशा चर्चा तिथे सुरू असत. धोतर, कोपरी अथवा पांढरा शर्ट किंवा सदरा आणि डोक्यावर टोपी घातलेली मंडळी तिथे जास्त असत. आणि मग एसटी आली की चढायची घाई. मग पुन्हा विंडो सीट. आणि मग काही वेळाने सुरू होई माझ्या गावाला पोहोचवणार्या एसटी मधील प्रवास.

कामशेत च्या मुख्य चौकातून एसटी रस्ता पार करून शिळीमच्या मार्गावर लागे. आता या चौकात काही वर्षांपूर्वी फ्लाय ओव्हर बनला आहे. जो त्या काळी नव्हता. त्याकाळी वाहतूक फारशी नसल्याने एसटी आरामशीर रस्ता पार करीत होती. आता इथून पुढे जो रस्ता असे तो एकदम लहान एकेरी आणि पूर्णपणे मोकळा. एसटी व्यतिरिक्त या मार्गावर दुसरे कोणतेही खाजगी वाहन नजरेस पडत नव्हते. क्वचित एखादी जीप गाडी, टेम्पो असे खाजगी वाहन नजरेस पडत असे. आणि राहिला विषय दुचाकीचा तर या काळात बोटावर मोजण्या इतक्याच दुचाक्या या भागात होत्या. त्यामुळे रस्त्यावर लालपरी सोडली तरी सगळा रस्ता सामसूम. आजूबाजूला दिसणारे डोंगर, पिवळी सुकलेली गवत, गावची मोकळी हवा, पवना धरणाचं विहंगम दृश्य हे सर्व नजरेस पडे.

कामशेत नंतर आमची एसटी पवनानगरला येऊन थांबायची. त्या काळी पवनानगर वगैरे असे काही नाव कोणी उच्चारत नसे. ‘कॉलनी आली’ बस एवढंच. आताही कॉलनीच म्हणतात पण तेव्हा फक्त तेवढंच होत. कॉलनीला आल्यानंतर काहीशी दुकान नजरेला पडत. एखाद दोन हॉटेल, काही भाज्यांची दुकानं, आणि काही लोकांची गर्दी इथे नजरेस पडे. यानंतर मात्र पुढील कोणत्याही गावात गजबजाट दिसणार नाही. पुढे जवण गावात फक्त एकच दुकान. एसटी येताच झाडाच्या सावलीत पारावर बसलेली माणसं एसटीत चढून बसत. आणि मग हळूहळू गाव जवळ येई. गावाजवळ एसटी आली की मग रस्त्यावर देवळा शेजारी एसटी उभी राही. एसटीतुन उतरलो की घरातील कोणी तरी घ्यायला येई.

एसटी मधून उतरल्यावर सर्व शुकशुकाट असे. जेमतेम एखाद दोन माणस नजरेस पडत. रस्त्याच्या कडेला लागूनच भैरवनाथाचे मंदिर. एका कडेला मारुती रायाचे मंदिर आणि रस्त्याला फक्त फणसाच्या झाडाची सावली. गावात एक मारवाडीचे दुकान, एक बबन बुवाची टपरी आणि दुसरी भाऊची टपरी. आणि टपरी समोर एक छोटंसं दुकान. बस एवढंच काय ते होत.

आम्ही मंदिरात जाऊन नारळ फोडून हार वगैरे घालून दर्शन घेत. आणि मग जे कोणी घ्यायला येईल त्यांना पप्पा भाऊच्या टपरीतून काहीतरी गोळ्या घेऊन देत. तसं भाऊ आणि पप्पा चांगले गप्पा करायचे. पण ते भाऊ आता कोण होते ? मला काय आठवत नाही. त्यांच्या दुकानात पार्लेच बिस्कीट, पेपरमिंट, हत्ती चिमण्यांच्या गोळ्या, भिंगरीच्या गोळ्या, पिठासारख्या दिसणाऱ्या रंगबेरंगी गोळ्या, ऑरेंज लेमनगोळ्या, सुपारी, बडीशोप असं काही काही मिळत होत. आणि २ रुपयांना जाळीत झाकून ठेवलेला वडापाव. जो त्या काळी महाग वाटत होता. आठण्याच्या आठ गोळ्यांनी खिसा भरून गेला की आम्ही घराकडे निघायचो.

आता त्या काळात शॉर्ट कट म्हणजे भैरीच्या देवळा कडून चिंचेच्या झाडा पासून दोन चार शेत ओलांडून ओसाड पडलेला ओढा ओलांडून एका पांधीतुन वाट काढत आमच्या वाडीत जावे लागायचे. पायी खुपाटा उडवत, एखाद्या करवंदाच्या जाळीच करवंद तोडून हा पायी प्रवास सुखावणारा होता. इथून पुढे आलो की आता सध्या पोल्ट्री लागते. मात्र त्या काळात तिथे असं काही नव्हतं. गावात शिरताना पहिले घर लागायचे ते म्हणजे राऊत यांचं आणि पुढे मारणे. या व्यतिरिक्त तिथे घरं नव्हती. आणि मग पुढे डावीकडे खंडू तात्या शिंदेंच. संपूर्ण गाव शांत वाटत होता. शेमडी बोळातून दोन्ही बाजूला झाडी होती. आणि त्या कमानीतून कृष्णाच्या देवळा पर्यंत चालण्यास वेगळाच फील मिळत होता. मग घरी जाण्या अगोदर कृष्णाच्या देवळात हार घालून पाया पडायचो. त्यावेळी मंदिर आणि पुढील परिसर एकदम रिकामा होता. ना कुठला शेड ना कुठले गेट. मंदिरा समोर फक्त झाडी आणि एका कडेला भेंडीचे झाड बसायला सावली देत होते.

देवाच्या पाया पडून झालं की घराकडे जायला निघत. तेव्हा तिथे कोपरी घालून खंडू शिंदे म्हणजेच गुरुजी सपत्नीक दिसे. मग विचारपूस होत असे. आणखी पुढे आलो की खडकाळ भाग लागत असे. जिथे खडक आणि त्याला गोल गोल असे चार पाच खड्डे. तिथे इंदू आजी असायचा. “आलं दात पडक कोल्ह” असे म्हणत ते मला चिडवायचा. आणि मग त्यांचा नातू विक्रम जो सतत त्यांच्या सोबत असायचा तो ही हसायचा.
“मला आता दात आलेत” असे म्हणून मी उत्तर पण द्यायचो. पण दरवेळी हा ठरलेला प्रश्न आणि उत्तर.

यानंतर मग एका छोट्याशा उंचवट्यावर आमचे मोठे घर वसलेले होते. आता पुढे काय होत असे ? नक्की वाचा पुढच्या भागात.

टीप :- जर संपूर्ण लेख तुम्ही वाचला असेल तर तुम्हालाही तुमच्या भावना आणि आठवणी सांगायची इच्छा नक्की झाली असेल. तुम्हाला वाचून काय वाटलं ? हे मला नक्की सांगा. तुम्ही मला ओळखत असू अथवा नसू. पण मला तुमचे म्हणणे ऐकायला नक्की आवडेल आणि मलाही कळेल की कोणी कोणी वाचले आहे. व्हॉट्सऍप मसेज किंवा कॉल जमेल त्यावर आपले म्हणणे मांडा.

  • संतोष दिवाडकर
    (युवा पत्रकार 8767948054 )

Shilim Village the lost of rurality

श्री कृष्ण मंदिर, शिंदेवाडीचा साधारणपणे ९० च्या दशकातील एक छायाचित्र. हस्तांदोलन राजू दिवाडकर, ताशा वादक नामदेव शिंदे, उजव्या बाजूला खंडू शिंदे आणि इतर काही ग्रामस्थ
आर्यग्लोबल शाळांमध्ये भव्य स्वरूपात प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्न

कल्याण : एक भारत ,श्रेष्ठ भारत!! अभियानांतर्गत
आर्यग्लोबल ग्रुप ऑफ स्कूलने त्यांच्या CBSE बोर्ड, नांदिवली आणि अंबरनाथ येथील आर्य गुरुकुल शाळा आणि कल्याणमधील सेंट मेरी हायस्कूल, त्यांच्या एसएससी बोर्ड स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन 2023 मोठ्या उत्साहात साजरा केला.

विद्यार्थ्यांनी एकतेच्या भावनेचा गौरव आणि उत्सव साजरा करण्यात मोठा अभिमान बाळगला. तीनही शाळांमधील सुमारे १५०० विद्यार्थी आणि सुमारे ३०० शिक्षक, पालक शाळेच्या मैदानावर जमून आनंदोत्सवात सहभागी झाले होते.

संपूर्ण देशभक्तीने भारतीय राष्ट्रध्वज फडकवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. नेव्हल एनसीसी, एअर एनसीसी, स्काऊट आणि गाईड आणि मल्हार ग्रुप, हिंडोल ग्रुप, भैरव ग्रुप आणि मलकौंस ग्रुप या चार हाऊसने एकत्रित मार्च पास्टद्वारे उत्कृष्ट टीम वर्क सादर केले.

राष्ट्रा प्रती तीव्र अभिमान व्यक्त करण्यात आला. प्रेरक भाषणे आणि आपल्या देशाच्या समृद्धीचे विस्मयकारक नृत्य आणि गाण्यांद्वारे दर्शन घडवणाऱ्या शानदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सव पूर्णत्वास नेला.

आणखी एका चित्तथरारक कामगिरीमध्ये, विद्यार्थ्यांनी फॉर्मेशन्सच्या अप्रतिम प्रदर्शनाद्वारे भारताचा नकाशा पुन्हा तयार केला. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय उत्सव बनवण्याबद्दल विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्साह आणि समर्पण दिसून आले. शाळांमधील प्रमुख पाहुण्यांनी आपल्या देशातील लोक आपल्या देशाला एक चांगले स्थान बनवण्यासाठी कसे पुढाकार घेऊ शकतात यावर झलक दिली.

आर्य गुरुकुल अंबरनाथ येथे आलेले विंग कमांडर घनश्याम गुप्ता यांनी सांगितले की, आपल्या देशातील तरुण हेच आपल्या देशाला अभिमानाने पुढे नेतील.

आर्य गुरुकुल, नांदिवली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ. देवयानी आवाडे या भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक सहयोगी आहेत आणि डॉ. प्रकाश आवाडे हे व्यवसाय व्यवस्थापनात पीएच.डी./मेकॅनिकलमधील अभियांत्रिकी पदवी आणि एम.बी.ए. विपणन ज्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रोत्साहित भाषणाने प्रेरित केले.

कृती शब्दांपेक्षा मोठ्याने बोलतात आणि सेंट मेरी हायस्कूलच्या प्रमुख पाहुण्या डॉ रुपिंदर कौर हे याचे आदर्श उदाहरण आहे. डॉ. कौर यांनी सोलेस इंडिया ऑनलाइनच्या राष्ट्रीय संयोजक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या आणि कार्यकर्त्याच्या अनेक हॅट्स घातल्या आहेत. ती बेटी बचाओ बेटी पढाओ आणि स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग आहे ज्यासाठी ती KDMC ची ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे.

आदिवासी भागात त्यांनी केलेले काम आवर्जून नमूद करण्यासारखे आहे. त्यांनी त्यांचे शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता, स्त्री भ्रूणहत्या, कुपोषण, लैंगिक असमानता इत्यादी टाळण्यासाठी जनजागृती करण्यासाठी योगदान दिले आहे.
आर्यग्लोबल ग्रुप ऑफ स्कूल ही एक चिन्मय व्हिजन स्कूल आहे जी भारतीय संस्कृती आणि परंपरांना महत्त्व देते आणि विद्यार्थ्यांना जागतिक दृष्टीकोन मिळवून देते. हे सुनिश्चित करते की मुले त्यांच्या देशात रुजलेली आहेत तरीही प्रगतीच्या मार्गावर चालतात.

संतोष दिवाडकर

Republic Day celebrations were held in a grand manner in AryaGlobal Schools

अनावश्यक हॉर्न वाजवू नका; अंबरनाथ आर्य गुरुकुल विद्यार्थ्यांचा वाहनचालकांना रस्त्यावर उतरून संदेश

अंबरनाथ : महाराष्ट्र पोलिसांच्या 33 व्या रस्ता सुरक्षा महाराष्ट्र अभियान त्याच सोबत पोलीस रेसिंग दिवसानिमित्त आर्य गुरुकुल अंबरनाथच्या विद्यार्थ्यांनी उल्हासनगर आणि अंबरनाथ ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीने हिराली फाऊंडेशनच्या समर्थ मार्गदर्शनाने ‘नो हॉन्किंग’ उपक्रमाची सुरुवात केली.

21 जानेवारी 2023 रोजी आर्या गुरुकुल अंबरनाथ व मटका चौक अंबरनाथ येथे कार्यक्रम करण्यात आला. शहरातील वाढते ध्वनी प्रदूषण लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेण्यात आला. या मोहिमेसाठी आर्य ग्लोबल स्कूलचे अध्यक्ष भरत मलिक, प्रिन्सिपल नीलेश राठोड आणि डॉ विन्दा भुसकुटे, हिराली फॉउंडेशन चे संस्थापक पुरुषोत्तम खानचंदाणी व वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील , सरिता खानचंदाणी यांच्यासह आर्या गुरुकुल अंबरनाथच्या हजारो विद्यार्थ्यांनी हातमिळवणी केली.

आर्य गुरुकुल शाळा अंबरनाथ येथे सकाळी ‘नो होँकिंग कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. आर्य ग्लोबल स्कूल्सचे अध्यक्ष भरत मलिक, डॉ विंदा भुसकुटे तसेच मुख्याध्यापक आर्य गुरुकुल नीलेश राठोड, हिराली फाऊंडेशनचे संस्थापक सरिता खानचंदानी यांनी विद्यार्थ्यांना वाहनांच्या हॉर्निंगचे तोटे आणि त्यावर नियंत्रण कसे हवे याविषयी प्रबोधन केले.

यानंतर आर्य गुरुकुल अंबरनाथ येथील विविध शाळांच्या माननीय मुख्याध्यापकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुढे हुतात्मा चौक येथून आर्य गुरुकुल शाळा अंबरनाथच्या विद्यार्थ्यांनी वाहतूक पोलीस, एनसीसी आणि आर्य गुरुकुल स्वयंसेवक यांच्या सहकार्याने मिरवणूक काढली. मिरवणुकीत सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी वाहनधारकांना तर्कशुद्ध हॉर्न वाजवणे किती घातक आहे याची जाणीव करून दिली. तसेच मटका चौकात वाहन चालकांना ध्वनी प्रदूषण न करण्याचा शांति पूर्वक संदेश दिला. यावेळेस वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी वाहन चालकांना वाहतूक नियम नियमांचे पालन करण्याचे आवाहन केलं.

विनाकारण हॉर्न वाजवणे टाळावे! अशाप्रकारे हा कार्यक्रम यशस्वी झाला. आर्य गुरुकुल अंबरनाथ ने घेतलेला एक अप्रतिम सराव. असेच कार्यक्रम आर्य गुरुकुल शाळा नेहमी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात ज्ञान आणि समाजहितकारक उपक्रमात उस्फुर्तरित्या सहभाग घेत असते.

संतोष दिवाडकर

Don’t honk unnecessarily; Message of Ambernath Arya Gurukul students to the drivers on the road

Arya Gurukul अंबरनाथने ठाणे जिल्हा जंप रोप स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक

Arya Gurukul : जंपिंग रोप ही एक क्रिया आहे जी संपूर्ण शरीराला मजबूत करते. हे डोक्यापासून पायापर्यंत स्ट्रेंथ देते ,संपूर्ण वेळ जंपिंग रोप समन्वयापासून स्फोटक शक्ती ते चपळते पर्यंत अनेक सकारात्मक ऍथलेटिक फायदे प्रदान करू शकते.

14 जानेवारी 2023 रोजी जंप रोप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा आर्य गुरुकुल अंबरनाथ येथे झाली. या स्पर्धेत विविध शाळांतील सुमारे 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

स्कूलचे भाग्य हे की अतिथी रुपात डॉ. रुपिंदर कौर, एक बहुकार्य व्‍यक्‍तीमत्‍व, एक वैद्यकिय डॉक्‍टर, सामाजिक कार्यकर्ती, उद्योजिका, काळजी घेणारी आई आणि आगामी लेखिका, त्‍याने आपल्या परोपकारी स्वभावाने अतुलनीय समाधान व अर्थ दिला आहे, आणि अनेक जीवनांना स्पर्श केला आहे. सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे. खेळाडूंना संबोधित करताना त्यांनी असे नमूद केले की “मला वाटते ज्यांना ऐकू येत नाही त्यांना आवाजाची गरज आहे. सामाजिक कार्यातील माझ्या सहभागाचा प्रत्येक क्षण मला प्रचंड समाधानाने भरतो की मी वेगवेगळ्या लोकांच्या आयुष्यात हसू आणत आहे.” या सकारात्मक दृष्टीकोनाने आणि मानवतावादाच्या दिशेने काम करण्याची तीव्र इच्छा, डॉ. रुपिंदर कौर यांनी अतुलनीय समाधान आणि अर्थ दिला आणि अनेकांची मने जिंकली.

आमचे व्यवस्थापन डॉ. नीलम मलिक (शैक्षणिक संचालक, आर्य ग्लोबल) आणि भरत मलिक (चेअरमन आर्य ग्लोबल) यांसारख्या महान व्यक्तींनी दाखवलेल्या मार्गावर चालण्यानेच ही कामगिरी शक्य आहे. आमचे क्रीडा संचालक दीपक वर्मा हे दुसरे स्थान आहे जे प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनाला एका मोठ्या स्तरावर नेण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. तसेच, प्राचार्य नीलेश राठोर यांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्याचा हा परिणाम आहे, ज्यांनी 2023 पर्यंत विविध खेळांमध्ये यशस्वी क्रीडा कारकीर्द घडवणाऱ्या त्यांच्या विचारांना पोषक आहार देऊन विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना दिली.

एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचे कठोर प्रशिक्षण आणि सराव त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केल्याने दिसून आले.

आर्य गुरुकुल अंबरनाथच्या खेळ मेळ्याच्या मेगा इव्हेंटनंतर हा कार्यक्रम घडल्याने, या स्पर्धेने शाळेची जिद्द दाखवली आणि विकासासाठी खेळ हा अविभाज्य भाग आहे हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत आहे. मुलांचे शाळा, ठाणे जंप रोप असोसिएशनच्या सहकार्याने, जंप रोप फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली 19 वी ज्युनियर जंप रोप राष्ट्रीय स्पर्धा 2022 आणि 18 वी सब ज्युनियर फेडरेशन चषक 2022 चे आणखी आयोजन करण्यासाठी सज्ज आहे.

“प्रवासावर लक्ष केंद्रित करा, गंतव्यस्थानावर नाही. आनंद एखादे काम पूर्ण करण्यात नाही तर ते करण्यात सापडतो.” या सुंदर संदेशाने तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गीताने करण्यात आली.

संतोष दिवाडकर

Arya Gurukul Ambernath won first place in Thane District Jump Rope Competition

सेंट मेरीज शाळेचा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसा निमित्ताने शांती वार्ता उत्सव

कल्याण : कल्याण पूर्वेतील सेंट मेरीज हाईस्कूलने आयोजित केलेला शांती उत्सव या कार्यक्रमाकरिता उपस्थित मान्यवरांचे हिंदू संस्कृतीप्रमाणे कपाळी चंदन टिळा लावून स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. सेंट मेरीज शाळेच्या ऍडमिन सी. इ. ओ. श्रीमती डॉ. विंदा भुस्कुटे मॅडम यांनी व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे, यंगिस्तान फाउंडेशनचे अध्यक्ष वकील श्री. पुरुषोत्तम खानचंदानी, कोळशेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र देशमुख , श्री. वाघ,हिराली संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सरिता खानचंदानी, यंगिस्तान संस्थेचे संस्थापक आणि संयोजक श्री. मिथीलेश झा, आर्य ग्लोबल संस्थेचे संस्थापक श्री भरत मलिक सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

सेंट मेरीज हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती दिव्या बोरसे मॅडम यांनी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची ओळख आणि त्यांच्या कार्याविषयी माहिती आपल्या स्वागतपर भाषणांमधून करून दिली.

शांतिवार्ता याविषयी आपले मनोगत व्यक्त करताना श्रीमती डॉ. विंदा भुस्कुटे यांनी ध्वनी प्रदूषणाविषयी माहिती आणि मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या भाषणातून आवश्यक नसताना सुद्धा हॉर्न वाजवणाऱ्या चालकांना हॉर्न न वाजवता सुरक्षित गाडी चालवू शकतो याबाबत मार्गदर्शन दिले.

अपघातांचे मुख्य कारण ध्वनी प्रदूषण आहे . अपघाती मृत्यू हेडफोन्स घालून वाहन चालवणारे वाहन चालक व हेडफोन्स घालून रस्त्यावर चालणारे प्रवासी यांच्या निष्काळजीपणामुळे होतात.ज्या गोष्टी आपल्या हातात असतात त्या आपण सतर्कपणे आणि काळजीपूर्वक पाळल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले.

कोळशेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र देशमुख सर यांनी सांगितले की, जितक्या पटीने रेल्वे ट्रॅकवर आणि कॅन्सरने मृत्यू होतात तितक्याच पटीने अपघाती मृत्यू देखील होतात आणि याचे एकमेव कारण कानामध्ये हेडफोन घालून चालणे आणि दिलेल्या सूचनांचे पालन न करणे हे होय. तसेच वाहतुकीच्या नियमांची माहिती करून दिली.

हॉर्न न वाजवता इतर वाहतुकीच्या नियमांद्वारे रस्त्यावरील वाहनांची नागरिकांना लक्षवेधी सूचना देता येईल, तसेच सुरक्षित वाहन चालवता येईल याबाबत मार्गदर्शन केले. पोलीस उप निरीक्षक श्री. धनराज वाघ यांच्याबरोबर ध्वनी प्रदूषण करणार नाही अशी शपथ सर्वानी घेतली.

हिराली फाउंडेशनचे संस्थापक आणि संयोजक वकील श्री. पुरुषोत्तम खानचंदानी यांनी आपल्या भाषणातून सेंट मेरीज शाळेच्या शांती वार्ता कार्यक्रमाचे कौतुक व प्रशंसा केली तसेच विभागातील नागरिकांकरिता शाळा वाहन कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.

हिराली फाउंडेशनचा अध्यक्षा श्रीमती सरिता खानचंदानी यांनी शाळेच्या विविध कार्यक्रमाद्वारे हिराली फाउंडेशन आणि सेंट मेरीज शाळा यांच्यामध्ये समन्वय साधला.आर्य ग्लोबल संस्थेचे संस्थापक श्री भरत मलिक सर यांनी मार्गदर्शनपर भाषणात फोन मुळे डोळ्यांचे व कानांचे किती मोठे नुकसान होते हे मुलांना पटवून दिले. येणाऱ्या पुढील समस्यांमध्ये सर्वात मोठी समस्या ही मोबाईलची असेल असे देखील त्यांनी वक्तव्य केले. 

त्यानंतर सेंट मेरीज हायस्कूल ते चक्की नाका ८०० विद्यार्थी आणि ३० हून अधिक शिक्षक घेऊन तसेच शाळेतील मावशी व दादा यांना सोबत घेऊन जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात आली

या फेरीतून नको तेथे नको तेव्हा हॉर्न वाजूवून डोके भंडावून सोडणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांसह सामाजिक कार्यकर्ते आणि सेंट मेरीज हायस्कूल कल्याण पूर्व च्या विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे धडे दिले.

कर्णकर्कश हॉर्न वाजवणे हे असभ्यवर्तन असून त्याद्वारे इतरांना त्रास देऊ नका असे आव्हान करण्यात आले म्हणून नो हॉर्न हा कार्यक्रम राबवण्यात आला.

हॉर्नचा कर्णकर्कश आवाजाचे दुष्परिणाम दर्शविणारे फलक मुलांनी हाती धरले होते. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

आर्य स्पोर्ट्स अकादमी मार्फत कल्याणमध्ये बॉक्सिंग बाउट नवीन वर्षात रंगली

कल्याण : ‘फर्स्ट डे फर्स्ट बाउट’ ही बॉक्सिंग स्पर्धा नवीन वर्षाचे जोरदार स्वागत करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे आयोजन ठाणे बॉक्सिंग असोसिएशनने आर्य स्पोर्ट्स अकादमीने आर्यगुरुकुल, नांदिवली येथे केले होते.

युवा खेळाडूंमध्ये ‘नेव्हर गिव्ह अप’ वृत्तीला प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या आवडीच्या खेळासाठी शिस्त आणि वचनबद्धता निर्माण व्हावी, ही या कार्यक्रमामागील संकल्पना होती. तसेच खेळाडूंनी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी सराव आणि सराव सुरू ठेवण्याची आठवण करून दिली, दिवस किंवा प्रसंग काहीही असो. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर पाहुणे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष व सावरकर मेमोरियल दादरचे अध्यक्ष रणजीत व्ही. सावरकर, महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, मुरबाडचे विश्वस्त उपस्थित होते.

रणजीत व्ही. सावरकर हे स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर यांचे नातू आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही होती. प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार ठाणे, रायगड आणि पालघर हे तीन जिल्हे हाताळणारे रोड सेफ्टी पेट्रोल (RSP) चे कमांडर श्री मणिलाल शिंपी हे होते.

सोबत डॉ. रुपिंदर कौर या सामाजिक कार्यकर्त्या आणि कार्यकर्त्या आहेत, त्या पर्यावरणाच्या समस्यांसाठी KDMC सोबत मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. तसेच मीलन वैद्य, अध्यक्ष, ठाणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन आणि दीपक वर्मा, आर्य गुरुकुल आणि आर्य स्पोर्ट्स अकादमीचे संचालक (क्रीडा) उपस्थित होते.

या खेळातील महत्त्वाकांक्षी बॉक्सर्सचे समर्पण दाखवणारे असे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल उपस्थित सर्वांनी त्यांचे कौतुक केले. ज्या वेळी तरुण आपले दिवस फालतू कामांमध्ये न घालवतात, अशा प्रसंगांमुळे ते आपली ऊर्जा कशी वापरतात आणि आपल्या वेळेचा सदुपयोग कसा करतात याची आठवण उपस्थित मान्यवरांनी करून दिली.

तसेच, सर्व पाहुण्यांनी आर्यगुरुकुल आणि आर्य स्पोर्ट्स अकादमीने खेळासाठी सदैव साथ दिल्याबद्दल आणि खेळाच्या प्रचारासाठी सर्व क्रीडा मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. कालच्या बॉक्सिंग स्पर्धा आर्यगुरुकुल शाळेत उपलब्ध असलेल्या व्यावसायिक बॉक्सिंग रिंगमध्ये घेण्यात आल्या.

सुमारे 40 बॉक्सर्सने अंदाजे 15 बॉक्सिंग बाउट्समध्ये भाग घेतला आणि प्रत्येकाला त्यांच्या प्रयत्नांची आणि सहभागाची ओळख म्हणून प्रमाणपत्र मिळाले. खरंच, नवीन वर्षात रिंग करण्याचा हा एक चांगला मार्ग होता. आर्य स्पोर्ट्स अकादमी आणि ठाणे बॉक्सिंग असोसिएशनतर्फे सर्वांना नवीन वर्ष २०२३ च्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.

संतोष दिवाडकर

A boxing bout was staged in Kalyan on New Year through Arya Sports Academy