Navbharat Saksharta Abhiyan : कल्याण डोंबिवलीत निरक्षरांचे झाले सर्वेक्षण; शिक्षकांची झाली पुरती दमछाक

Navbharat Saksharta Abhiyan : महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षण विभागाचे उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या अधिपत्याखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये “नवभारत साक्षरता अभियान उपक्रम २०२२ -२७ अंतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याचे काम दि. १७.०८.२०१३ ते ३१.०८.२०२३ या कालावधीत करण्यात आले. महापालिका क्षेत्रातील ४४६ शाळांतील २३०६ शिक्षकांमार्फत सर्व वार्डातील सर्व कुटूंबाचे सर्वेक्षण यातून करण्यात आले.

शिक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणाद्वारे निरक्षरांचे नाव, लिंग, संवर्गनिहाय माहिती संकलीत करण्यात आली. सर्व प्रभागातील लोकांचे सर्वेक्षण करून निरक्षरांची संख्या निश्चित करून त्यांना ऑनलाईन व ऑफलाईन पदधतीने साक्षर करणे हा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. निरक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण दि. १७.०८. २०२३ ते ३१.०८.२०२३ या कालावधीत शिक्षक सर्वेक्षक, म्हणून आपल्या कुटुबांचे सर्वेक्षण करून निरक्षरांची संख्या निश्चित करणार आहेत.

या कालावधित वय वर्ष १५ ते ३५ आणि ३५ वर्षाच्या पुढील सर्व स्त्री आणि पुरूष दिव्यांग आणि पारलिंगी यांचे सर्वेक्षण करून विगतवारी करून निरक्षर संख्या निश्चित करावयाची आहे. तसेच शाळाबाहय मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल केले जाणार आहे. या सर्वेक्षण उपक्रम अंतर्गत जिल्हास्तर, तालुकास्तर, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, सिआरसी प्रमुख यांना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र शाळाबाहय व निरक्षर मुक्त करण्यासाठी प्रशासन अधिकारी रंजना राव यांनी सहकार्य करणेकामी महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना आवाहन केले होते. मात्र हे सर्वेक्षण करण्याचे काम शाळेतील शिक्षकांना देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना शिकवण्या बरोबरच घरोघरी फिरून शिक्षकांची चांगलीच दमछाक झाल्याचं दिसून आले. त्याचबरोबर सर्वेक्षणापूर्वी नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देतानाच शिक्षकांच्या नाकी नऊ आले होते.

संतोष दिवाडकर

Navbharat Saksharta Abhiyan : A survey of illiterates was conducted in Kalyan Dombivli

Kolsewadi Police यांचा अमली पदार्थांच्या अड्ड्यांवर छापा; तस्करासह आठ नशेडी ताब्यात

Kolsewadi Police : कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एका अंमली पदार्थ तस्कराला अटक केली असून ८ नशा करणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले आहे. नानिकराम मंगलानी असे अटक करण्यात आलेल्या अमली पदार्थ विकणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव असून तो खडेगोळवली येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी कोळसेवाडी पोलिस ठाण्यावर दोन खून आणि एक विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी सर्वपक्षीय जागृक नागरीकांनी मोर्चा काढला होता. कारण खून आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात सहभागी तरुणांनी अंमली पदार्थांचे सेवन केले होते. कल्याण-डोंबिवलीत अमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यानंतर डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एक स्कॉट तयार करण्यात आले आहे. जो प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रग्ज तस्करांवर लक्ष ठेवून आहे.

कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांनी या बाबत सांगितले की, सोमवारी कल्याण पूर्वेतील अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले, ज्यामध्ये एका ड्रग्ज तस्करासह आठ नशेबाजांनाही अटक करण्यात आली आहे. पकडण्यात आलेले नशा करणारे हे चांगल्या घरातील असले तरी ते नशेच्या आहारी गेले असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईने अमली पदार्थांचे सप्लाय करणाऱ्यांमध्ये घाबराहटीचे वातावरण पसरले असून पोलिसांना माहिती मिळताच त्यांच्याही मुसक्या आवळल्या जाणार आहेत. दोन दिवसांपूर्वी तस्करांसह ५०-६० किलो गांजा अंबरनाथ बदलापूर मध्ये जप्त करण्यात आला असल्याची देखील माहिती आहे.

संतोष दिवाडकर

Kolsewadi Police raids drug dens

Kalyan Crime : रक्षाबंधनापूर्वी भाऊ बहीण लॉकअप मध्ये; कल्याण पूर्वेतुन पुन्हा खळबळजनक घटना समोर

Kalyan Crime : रक्षाबंधनापूर्वीच कल्याण पूर्वेत आणखी एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. भाऊ बहिणीने परिसरात राहणाऱ्या बारा वर्षीय अल्पवयीन मुली सोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाऊ पीडित मुलीसोबत अश्लील चाळे करत असताना चक्क बहिणीनेच मोबाईल वर व्हिडिओ बनवला. पीडित मुलीने हि बाब घरी सांगताच तिच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या दोन्ही भाऊ-बहिणी विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेडया ठोकल्या आहेत.

सदर बारा वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी कुटुंबासह कल्याण पूर्व परिसरात राहते. ही अल्पवयीन मुलगी घराच्या परिसरात खेळत असताना याच परिसरात राहणारे अजय थापा व सपना थापा या बहीण भावांची नजर तिच्यावर पडली. यात भाऊ अजयने या मुली सोबत अश्लील चाळे केले. आणि त्याची बहीण सपना हिने हा किळसवाना प्रकार मोबाईल कॅमेरात कैद केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडीतेने हकीकत घरी कुटुंबीयांना सांगितली. पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी अजय थापा व सपना थापा या दोघांविरोधात गुन्हा दाखल करत या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

कल्याण पूर्व भागात मुलींवर अत्याचार होण्याच्या घटना आता वारंवार समोर येऊ लागल्या असून पालकवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. कल्याण पूर्वेतील वाढलेली लोकसंख्या, क्षेत्रफळ आणि अपुरे पोलीस कुमक पाहता एकट्या कोळसेवाडी पोलीस स्थानकावर याचा मोठा ताण पडत आहे. मात्र असे असूनही पोलिसांनी प्रत्येक गंभीर गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना गजाआड केले आहे. त्यामुळे आणखीन एक पोलीस ठाणे केव्हा होणार असा सवाल वारंवार उपस्थित केला जात आहे.

संतोष दिवाडकर

Kalyan Crime : Obscene video made by brother and sister

Kalyan Suicide : कल्याण पूर्वेत आणखी एक आत्महत्या

Kalyan Suicide : कल्याण पूर्वेतील गणेशवाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या एका तरुणाने आज सकाळी राहत्या घरी आत्महत्या केली असल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पवन धनराज आगडे (२८) असं या तरुणाचे नाव असून गळफास घेऊन त्याने स्वतःचे जीवन संपवले आहे.

मागील काही दिवसांपासून कल्याण पूर्वेत अनेक गुन्हे घडत असून आत्महत्याच्या घटनाही समोर येत आहेत. सहाय्यक लोको पायलट आत्महत्या प्रकरण ताजे असताना आता आणखीन एका तरुणाने आत्महत्या केल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घरात कोणी नसल्याचे पाहून सदर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवून दिला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या हवाली करीत त्याच्या मूळगावी पाठवून देण्यात आला.

सदर तरुण आपल्या आई वडिलांसह राहत होता. मागील काही काळापासून तो मानसिक तणावाखाली वावरत होता. व याच नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असून मित्र परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संतोष दिवाडकर

Kalyan Suicide: Another suicide in Kalyan East

Kalyan Murder : कल्याण पूर्वेत आणखी एक हत्या; टोळक्याच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Kalyan Murder : कल्याण पूर्व भागातील वाढती गुन्हेगारी शहरवासीयांसाठी चिंतेची बाब बनली असताना आता आणखीन एका हत्येची बातमी समोर येत आहे. खडेगोळवली येथे वास्तव्यास असलेल्या एका मुलाची हत्या झाली असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून सदर मुलाला काही जणांच्या टोळक्याने अमानुष मारहाण केल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

समीर लोखंडे असं मृत मुलाचे नाव असून तो काल सायंकाळी कैलाशनगर परिसरात गेला होता. तेथे जुन्या वादातून एका टोळक्याने त्याला घेराव घालून अमानुषपणे मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिसांना पाहताच टोळक्याने तेथून पोबारा केला. त्या टोळक्यातील एका आरोपीला पोलिसांनी पकडले तसेच जखमी समीरला उपचारार्थ रुग्णालयात हलवले. मात्र आज पहाटेच्या दरम्यान समीरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली. सध्या काही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून मुकेश आणि नीरज दास अशी त्यापैकी दोघांची नावे आहेत.

कल्याण पूर्व भागात सध्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढत असून शहरवासीयांसाठी ही चिंतेची बाब बनली आहे. तिसगावातील अल्पवयीन मुलीचे हत्या प्रकरण ताजे असताना आणखी एका मुलाच्या हत्येने आता पूर्व भागात खळबळ माजली आहे. स्थानिक आमदार तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख यांनी नुकतेच आणखी एक पोलीस स्थानक तसेच पोलीस कुमक वाढवण्याची मागणी केली आहे. कल्याण पूर्वेतील लोकसंख्या, क्षेत्रफळ, फोफावलेली गुन्हेगारी आणि एकट्या कोळसेवाडी पोलीस स्थानकावरील ताण लक्षात घेता आता गृहखात्याने गांभीर्याने विचार करून आणखी एक पोलीस स्थानक निर्माण करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे.

शहरातील तरुणाईला गांचाचा नाद ?

अलिकडल्या काळातील तरुणाई ही गांजाच्या अधीन गेली असून शहरात ठिकठिकाणी गल्ली बोळात घोळका करून गांजा सेवन केले जाते. खडेगोळवली भागातील असंख्य अल्पवयीन मुलं या नशेच्या आहारी गेली असल्याचे स्थानिकांमार्फत सांगण्यात येत आहे. या अगोदर मानापाडा पोलिसांनी अनेकदा गांजा पकडला होता. मात्र तरी देखील शहरात तरुणांना गांजा कुठून मिळतो? गांजा विक्रेते कोण आहेत? हा गांजा कुठून सप्लाय होतो? याचा शोध घेऊन तरुणाईला वाचवणे ही देखील येणाऱ्या काळाची गरज बनली आहे.

संतोष दिवाडकर

Kalyan Murder : A minor boy died in a gang attack in Kalyan East

Maval News : कामशेत मध्ये राहून ठाण्यातील लोकांची फसवणूक करणाऱ्या दांपत्याला कल्याण पोलिसांनी केली अटक

Maval News : ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व शहरातील चक्कीनाका परिसरात एका सायकल मार्टचे मालक भावेश चौधरी यांची संजय आचरे आणि कविता आचरे या पती पत्नीने सायकल विकत घेण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांत तक्रार केल्यानंतर कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात जाऊन कामशेत येथून या नवरा बायकोला अटक केली आहे.

सायकल खरेदी करताना दुसऱ्या व्यक्तीच्या नावे फेक चेक देऊन, आपण डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक असल्याचं महिलेने सांगून, माझ्या गाडीत माझी पर्स राहिली आहे त्यामुळे आता मला डायरेक्ट पोलीस स्टेशनला जायचं आहे तेव्हा मला दहा हजार रुपये द्या नंतर मी संध्याकाळी तुम्हाला ते परत करते असे तिने सांगितले. व त्या नंतर पुन्हा अडीच हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. यानंतर दोघेही नवरा बायको पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायकल मार्टच्या मालकाने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

दिलेल्या तक्रारीनुसार फसवणूक करणाऱ्या आचरे दांपत्याचा कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पीएसआय एपी सुरवडे आणि त्यांच्या टीम ने तपास करून त्यांना आता कामशेत येथून अटक केली आहे. कामशेत मध्ये राहून ठाणे जिल्हयातील लोकांची फसवणूक करण्याचा त्यांचा हा धंदा असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. कल्याण एसीपी कल्याणजी घेटे आणि कोळसेवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत असल्याचे क्राईम पी आय सुनील गवळी यांनी सांगितले आहे.

संतोष दिवाडकर

Maval News : Kalyan police arrested a couple who cheated the people of Thane by living in Kamshet

आयडीएट प्रोटो प्रकार श्रेणीतील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन Arya Gurukul अंबरनाथने पटकावले

Arya Gurukul : अंबरनाथ Arya Gurukul स्कूल आयोजित मंथन फेस्टिवल सफल झाला. दोन दिवसीय लेख, क्राफ्ट आणि सायन्स प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक मॉडेल बनवून आपली प्रतिभा दाखवली. एग्जीबिशनमध्ये सर्वोत्तम प्रकल्प तयार करणारे विद्यार्थ्‍यांना स्‍कूल मॅनमेंट तर्फे बक्षीस देऊन सन्मानित केले गेले.

कार्यक्रमात कल्याण पश्चिमचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, रेल्वे मंत्रालयाचे अधिकारी अजित दुबे, डॉ. सुजीत नायर, अजुकेशन टुडे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.नीलम मलिक आणि सचिव भरत मलिक यांनी विद्यार्थी ट्रॉफीकर उत्साही मनोबल वाढवला. एजुकेशन टुडे फाउंडेशन द्वारा संचालित अंबरनाथ आर्य गुरुकुल स्कूल मध्ये 12 आणि 13 ऑगस्ट ला मंथन फेस्टिवल संपन्न झाला. चार स्कूल्स ने यात भाग घेतला होता.

प्रदर्शन थीम या वर्षी होणारी जी-२० शिखर परिषदेवर आधारित होती. प्रदर्शनातील विद्यार्थ्यांनी मॉडेल च्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. यात रोलिंग ट्रॉफी कल्याण पूर्वच्या सेंट मेरिज हाई स्कूल आणि लिटल आर्यन्स ने जिंकली तर प्रोटो प्रकार श्रेणीमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन आर्य गुरुकुल स्कूल अंबरनाथ ने पटकावला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मंथन फेस्टिवल पाहिल्यानंतर भरत मलिक आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. पवार यांनी सांगितले की मी कार्यक्रमाचा पाहुणा नसून आर्य गुरुकुल परिवाराचा एक सदस्य म्हणून येथे आलो आहे . पवार यांनी पुढे बोलताना सांगितले की प्रत्येक पालकाला आपलं मुल यांनी आर्य गुरुकुल मध्ये शिक्षा घ्यावी असं वाटत आहे.

या मंथन फेस्टिवल कार्यक्रमात अमरनाथ आर्य गुरुकुल चे प्रिंसिपल नीलेश राठौड़, गीता नायर, आर्य गुरुकुल कल्याणच्या प्रिंसिपल राधामनी अय्यर, सेंट मेरिज स्कूल कल्याणच्या प्रिंसिपल दिव्या बोरसे सहित तमाम टीचर्सचे महत्त्वपूर्ण योगदान होते.

संतोष दिवाडकर

Arya Gurukul Ambernath won the Best Exhibit in the IDET Prototype category

Watch Exhibition Video
क.डों.म.पा. क्षेत्रातील पदपथांवर सर्रास अतिक्रमणे; पत्रकार धमकी प्रकरणी तहसीलदारां मार्फत राष्ट्रपतींना निवेदन

कल्याण : शहराच्या पूर्व भागातील पूना लिंक रोडवर असलेल्या पदपथावर एका बांधकाम विकासकाने आपले काही सामान मांडून ठेवले होते. याबाबत पत्रकार आनंद गायकवाड यांनी वृत्त प्रकाशित केले होते. यामुळे सदर विकासकांनी त्यांना धमकी दिली असल्याची तक्रार आनंद गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात दिली. यानंतर पत्रकार सुरक्षा कायदा २०१९ अंतर्गत कोळसेवाडी पोलिसांनी संबंधित विकासकांवर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास थेट सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे हे स्वतः करीत आहेत.

विकासकाने फुटपाथवर बांधकामाचे सामान ठेवल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर महानगरपालिकेने विकासकाला दंड ठोठावला होता. मात्र दंडात्मक कारवाई नंतरही पदपथ मोकळा न झाल्याने पत्रकार आनंद गायकवाड यांनी पुन्हा चित्रीकरण केले. याचदरम्यान विकासकांकडून धमकी दिली गेली असल्याचे आनंद गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष दिल्या नंतर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

देशभरात पत्रकारांवर होणारे हल्ले पाहता या घटनांना आळा घालण्यासाठी पत्रकार संघटना पुढे येत असतात. आता या प्रकरणी देखील पत्रकार संघटनेने कल्याण तहसीलदार यांच्या मार्फत थेट राष्ट्रपती व राज्यपाल यांना निवेदन दिले आहे. महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष दिले असते तर हा गुन्हा दाखल झाला नसता अशा भावना पत्रकार आनंद गायकवाड यांनी व्यक्त केल्या.

शहरातील पदपथांवर व्यापाऱ्यांचा ताबा?

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पादचाऱ्यांना चालण्यासाठी असलेले पदपथ हे जवळपास गायब झाले असल्याचे चित्र आहे. पूना लिंक रोड सारख्या मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर असलेल्या पदपथावर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केल्याचे चित्र संपूर्ण शहरभरात दिसत आहे. मग हे पदपथ नक्की नागरिकांना चालण्यासाठी आहेत? दिखाव्यासाठी आहेत? की व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी दिलेत? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

पदपथावर अतिक्रमण केल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावर उतरून चालावे लागते. यामुळे वाहतूक कोंडी तसेच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि या अगोदर असे अपघात झालेही आहेत. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन पदपथावर होणारी अतिक्रमणे रोखणार का? की फक्त दंडात्मक कारवाई करून पुढे परिस्थिती जैसे थे असणार? असा केविलवाणा सवाल आता स्मार्ट सिटीतील नागरिकांना पडला आहे.

संतोष दिवाडकर

Statement to Kalyan Tehsildar of Journalist Association

तहसीलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिक्रिया

Maval News : चौदा वर्षीय मुलगा शंभू ठाकर हरवल्याने तालुक्यात उडाली होती खळबळ

Maval News : मावळ तालुक्यात आज दिवसभर एक व्हॉट्सऍप स्टेटस पहायला मिळत होता. तो म्हणजे शंभू ठाकर हरवला आहे सापडल्यास संपर्क करावा. जवळपास संपूर्ण तालुक्यात या स्टेटसने शंभूला व्हायरल केले होते. चिंतेत असलेल्या मावळ तालुक्याने संध्याकाळी मोकळा श्वास घेतला तो म्हणजे शंभू पुन्हा सुखरूप घरी परतल्याच्या बातमीने.

मावळ तालुक्यातील येळसे गावातील शंभू गणेश ठाकर हा नववीत शिकणारा १४ वर्षीय मुलगा सकाळीच रागाने घर सोडून निघून गेला होता. अभ्यासावरून वडिलांनी खडसावले म्हणून शंभूने हे पाऊल उचलल्याचे समजते. शंभूला रागावून त्याचे वडील गणेश ठाकर हे एका विधी कार्यासाठी घरातून बाहेर पडले. आणि त्यापाठोपाठच एक दुचाकी वाहन घेऊन शंभू देखील बाहेर पडला. ही माहिती समजल्यानंतर शंभूचे कुटुंबीय, नातेवाईक आणि गावकरी चिंतेत आले आणि लगोलग शोधमोहीम सुरू झाली.

तळेगाव मध्ये शाळेत शिकत असलेला शंभू दुचाकी घेऊन मुंबईच्या दिशेने निघाला असल्याचे लोणावळा येथील वर्सोली टोलनाक्यावर असलेल्या सीसीटीव्ही मध्ये दिसून आले होते. यानंतर मात्र संपूर्ण तालुक्यात समाज माध्यमांच्या माध्यमातून शंभूची शोधमोहीम सुरू झाली होती. सकाळी पावणे दहा वाजता तो टोलनाका सोडून पुढे गेला असल्याने तो कदाचित कल्याण, ठाणे, मुंबई, नवी मुंबई भागात जाऊ शकतो असा अंदाज वर्तविण्यात आला होता.

दुपार नंतर सदर माहिती मुंबई भागात देखील पोहोचू लागली होती. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी बराच शोध घेतल्यानंतर तो त्यांना लोणावळा येथे मिळून आला. त्याच्याकडे विचारणा केली असता तो लोणावळ्यातच फिरत असल्याचे त्याने सांगितले. यानंतर मात्र शंभूला सुखरूपपणे घरी आणले आणि त्याच्या कुटुंबियांसह संपूर्ण तालुक्याने समाधानकारक निश्वास टाकला.

संतोष दिवाडकर

Maval News : Concern spread in Maval due to the missing of fourteen-year-old boy Shambhu Thakar

नांदीवली Aarya Gurukul School मध्ये गायत्री हवन

Aarya Gurukul School : दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी, नांदिवली येथील सर्वोत्कृष्ट CBSE शाळा असलेल्या आर्य गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या कॅम्पसमध्ये गायत्री हवन केले. विद्यार्थी, शिक्षक आणि आर्य गुरुकुलच्या व्यवस्थापन संघाने एकत्रितपणे हवन केले.

गायत्री हवनाचे महत्त्व असे आहे की गायत्री, सावित्री आणि सरस्वती या तीन देवतांचे प्रतीक असलेल्या देवी गायत्रीचे स्मरण केले जाते. गायत्री ही इंद्रियाची स्वामी आहे, सावित्री ही थ्रुथ आणि सरस्वती ही वाणीची देवी आहे.

गायत्री मंत्र हा आपल्या सर्व इंद्रियांना पोषण आणि बळकट करणारा सर्वसमावेशक मंत्र आहे. आपली बुद्धी तीक्ष्ण करणे हे अंतिम उद्दिष्ट आहे. गायत्री हवनाच्या वेळी होम (अग्नी) समोर गायत्री मंत्राचा जप केला जातो. शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेला गायत्री हवन हा एक सुंदर क्षण पाहण्याजोगा होता. विद्यार्थ्यांनी मंत्राचा उच्चार करून शाळेचे वातावरण बदलून टाकले.

शाळा व्यवस्थापनाचे समर्पण दिसून आले आणि त्यांनी मनापासून हवन केल्याबद्दल विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले. गायत्री हवन आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्व पैलूंकडे आपली उर्जा प्रवाहित करते – बुद्धिमत्ता, सौंदर्य, वाणी, आरोग्य जे आपल्या व्यक्तिमत्त्वात संपूर्ण कल्याणाची भावना निर्माण करण्यासाठी प्रतिबिंबित करते.

आर्य गुरुकुल ही चिन्मय मिशन शाळा आहे आणि आपल्या परंपरेचे ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात सतत विचारपूर्वक कार्यक्रम आणि उत्सवांद्वारे प्रबळ करते.

संतोष दिवाडकर

Gayatri Havan at Nandivali Aarya Gurukul School