जयदीप आपटे : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या दुर्घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून विरोधकांनी देखील सरकारला धारेवर धरले आहे. या घटनेनंतर कल्याण येथील या मूर्तीचे निर्माते जयदीप आपटे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांच्या समवेत केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण देखील उपस्थित होते. हा पुतळा भारतीय नौदलाने उभरला असून तो बनविण्याची जबाबदारी जयदीप आपटे यांच्याकडे देण्यात आली होती.
जयदीप आपटे हा कल्याणमधील अंदाजे २५ वर्षीय तरुण असून त्याने राजकोट किल्ल्यावर २८ फूट उंच ब्राँझचा पुतळा तयार केला होता. या पुतळ्याच्या बांधकामाला सुमारे 3 वर्षे लागली, जयदीपने एका मुलाखतीत सांगितले की, पुतळ्याचे निर्माण जून 2023 मध्ये सुरू झाले आणि डिसेंबर 2023 पर्यंत म्हणजे केवळ सात महिन्यांत पूर्ण झाले होते. पोलिसांनी आता जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे संपूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट केले नसून केवळ पुतळ्यासाठी बांधलेल्या व्यासपीठाची रचना केली होती, असे सांगत चेतन पाटील यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
समाज माध्यमांवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार जयदीप आपटे यांनी जे जे स्कुल ऑफ आर्ट्स व एल एस रहेजा आर्ट्स स्कुलमध्ये शिक्षण घेतले आहे. जयदीप आपटे हे खरेतर एक उत्तम मूर्तिकार असून त्यांनी अनेक मुर्त्या घडविल्या आहेत. त्यांनी बनवलेल्या मुर्त्या ह्या जिवंत असल्याचा भास होतो. यामुळेच त्यांना हे काम दिले असावे असा कयास बांधला जात आहे. मात्र एक भव्य दिव्य मूर्तीची उभारणी करण्यात ते अयशस्वी ठरले असून त्यांच्यावर टिकांचा वर्षाव होत असून ते कायद्याच्या कचाट्यातही सापडले आहेत. या घटनेनंतर जयदीप यांच्या आजवरच्या कामावर पाणी फेरलं गेलंय. मात्र संपुर्ण विश्वास नसेल तर इतके मोठं काम स्वीकारायला नको होते असेही काही जाणकार म्हणत आहेत.
A case has been registered against the sculptor of Kalyan in the case of Shivaraya idol accident in Malvan
जयदीप आपटे यांनी बनविलेल्या काही मुर्त्या :-


२५ वर्षीय आपटे यांचे कोणते अनुभव पाहून काम दीले होते मुळात आपटे यांची काही चूक नसून त्यांच्यावर असलेला दबाव अनी उद्घटनची घाई