कल्याण-डोंबिवली घडामोडी

मंत्री रवींद्र चव्हाणांना डोंबिवलीतुन तिकीट कन्फर्म ; BJP चा Dombivli बालेकिल्ला अभेद्य राखण्याचा निर्धार

BJP Dombivli : विधानसभा निवडणूका जाहिर झाल्या आहेत. त्याचबरोबर आज मंत्री रवींद्र चव्हाण यांना भाजपने अधिकृतपणे उमेदवारी देखील जाहीर केली आहे. आजपर्यंत पक्षाला विजयश्री मिळवून देण्यासाठी भाजपचे शेकडो पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते, आजी माजी जिल्हाध्यक्ष ज्यांनी कल्याण, डोंबिवलीसह जिल्ह्यात भाजप रुजवला, वाढवला अशा सर्वांचा डोंबिवलीत ब्राह्मण सभा येथे रविवारी मेळावा संपन्न झाला. त्यावेळी डोंबिवली बालेकिल्ला अभेद्य राहील असा निर्धार सर्व ज्येष्ठ मंडळींनी केला.

भाजप हा एकमेव पक्ष असा आहे की, जिथे कार्यकर्त्याचा सन्मान होतो. कै. रामभाऊ म्हाळगी, दिवंगत नायब राज्यपाल राम कापसे, स्व. दिगंबर विशे, स्व.संत, स्व.कांतबाबू आपले माजी मंत्री जगन्नाथ पाटील, संजय केळकर, पद्माकर कुलकर्णी, यांच्यासह के आर जाधव, शशिकांत कांबळे, विद्यमान अध्यक्ष नाना सूर्यवंशी आदींचे पक्षासाठी योगदान खूप मोलाचे असल्याचे यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले. या सगळ्यांनी पक्षाला बळकटी दिली. शून्यातून पक्ष उभा केला. त्यांच्यामुळे आता पक्षाला सुगीचे दिवस आले आहेत, त्यांच्या कष्ट, पक्षाविषयी प्रेम, आदर, आपुलकी, एकीला माझा सॅल्युट अशा शब्दात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ज्येष्ठ मंडळींचे योगदानाबद्दल आदर व्यक्त केला. ज्यावेळी ही सगळी मंडळी झटत होती तो काळ प्रतिकूल परिस्थितीचा होता, हे इतिहास सांगतो. आता बऱ्याच प्रमाणात अनुकूल दिवस आले असून प्रतिकुल परिस्थितीला अनुकूल बनवण्याची ताकद या ज्येष्ठ मंडळींमध्ये आहे. त्यांनी अपार मेहनत घेऊन, एकेक कार्यकर्ता पक्षात कसा टिकून राहील याची काळजी घेतली. त्यांनी लावलेल्या रोपाचा आता वटवृक्ष झाला आहे, त्या सगळ्यांची मेहनत आता कामाला येत आहे असेही चव्हाण म्हणाले.

आयोजित मेळाव्यात पक्षाचे आतापर्यंत झालेले माजी जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. त्यांना पन्नास हुन अधिक वर्ष होऊनही त्यांचे पक्षाबद्दल असलेले अपार प्रेम, आपुलकी पाहून मनाला उभारी मिळते, एकेक ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ता हे ऊर्जा, स्फूर्तिस्थान आहे. आताच्या कार्यकर्त्यांनाही त्यांच्याकडून बरच शिकण्यासारखे आहे. ही ऊर्जा स्थान आहेत म्हणूनच आपण सगळे कार्यरत आहोत, त्या सगळ्यानी मला वेळोवेळी सहकार्य केले आहे त्या सगळ्यांचा मी ऋणी असल्याचे मंत्री चव्हाण म्हणाले. पुन्हा एकदा बालेकिल्ला अभेद्य राखण्यासाठी त्या सगळ्यांनी आशीर्वाद दिले असून शतप्रतिशद भाजप असे सांगून मला बळकटी दिली आहे. ते सगळे त्यांच्या स्तरावरून आत्ताही पूर्णपणे पक्षाचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी आश्वस्थ केले. आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रवींद्र चव्हाण किती ताकदीने मैदानात उतरणार आहेत हे लवकरच समोर येणार आहे.

BJP determined to keep Dombivli stronghold impregnable

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *