Baipan Bhari Deva review ; बाईपण भारी देवा चित्रपट का गाजतोय ?

Baipan Bhari Deva review : बाईपण भारी देवा चित्रपट का गाजतोय ? हा अनेकांना पडलेला एक प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अनेकांचे पाय सध्या सिनेमागृहाकडे वळत आहेत. मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी फक्त स्त्रिया गर्दी करीत असून जेमतेम १०% पुरुषच सिनेमागृहात हजेरी लावत आहेत ते ही आपल्या बायकोच्या इच्छेखातर.

केदार शिंदे दिग्दर्शीत हा चित्रपट रितेश देशमुखच्या वेड चित्रपटा नंतर महाराष्ट्रभरात गाजला असून या चित्रपटाने बॉलिवूडची मात्र महाराष्ट्रात चांगलीच वाजली आहे. पाच करोड खर्च करून बनवलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ३२ करोडचा पल्ला पार केला आहे. इतकेच कायतर कधी नव्हे ते सिनेमागृहात फक्त मराठी चित्रपटासाठी स्क्रीन लागत असून बॉलिवूड करिता पुरेश्या स्क्रीन मिळणे आणि चित्रपट चालणे अतिशय अवघड बनल्याचे भासू लागले आहे.

कल्याण मेट्रो मॉल मधील आयनॉक्स सिनेमा मध्ये या रविवारी हिंदी चित्रपटाला जेमतेम स्क्रीन मिळाल्या असून ‘बाई पण भारी देवा’ या मराठी चित्रपटाला तब्बल १६ स्क्रीन दिल्या असून ही अभिमानाची बाब आहे. याबद्दल प्रेक्षकांनाही तितकेच धन्यवाद द्यायला हवे.

चित्रपटाला फक्त महिलांची उपस्थितीच का ?

चित्रपटाच्या नावाप्रमाणेच हा चित्रपट महिलांचाच आहे अशी या चित्रपटाची ओळख पडली आहे. मुळात चित्रपटाचे कथानकच महिलांच्या जीवनातील रोजच्या संघर्षावर आधारित आहे. त्यामुळे चित्रपट पहायला येणारी प्रत्येक महिला स्वतःला कुठे ना कुठे त्या चित्रपटात पाहत आहे. असे असल्याने हा चित्रपट गाजत असून त्याची चर्चा महिलांमध्ये सुरू असते. म्हणून महिला एकत्रितपणे येऊन ग्रुप बनवून चित्रपट पाहत आहेत. काही महिलांच्या ग्रुपने तर संपूर्ण स्क्रीनच बुक केले आहे.

महिला आपल्या जीवनात कोणत्या खडतर वाटचालीतुन जात असतात? त्या कसा संघर्ष करीत असतात? त्यांची सुख त्यांची दुःख हे खर तर पुरुषांनाही समजणे तितकेच गरजेचे आहे. म्हणून हा चित्रपट केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांनी देखील पाहणे तितकेच गरजेचे आहे. हा चित्रपट सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत एक संघर्ष दाखवतो. ज्यात हसण्यासाठी कॉमेडी देखील समाविष्ट आहे. मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात जाणारी स्त्री आणि सिनेमागृहातून बाहेर पडणारी स्त्री ही काहीशी वेगळी असते. सिनेमा पाहिल्या नंतर महिलांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास येत असल्याचे पाहायला मिळत असून ही सकारात्मक बाब महिलांच्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी फायद्याची ठरू शकते.

संतोष दिवाडकर

Baipan Bhari Deva review ; Why is the movie Baipan Bhari Deva popular?

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणूक ‘या’ महिन्यांत होण्याची शक्यता

महानगरपालिका निवडणूक : महाराष्ट्रातील लांबणीवर पडलेल्या महानगरपालिका निवडणुक केव्हा होणार असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. राज्यातील चार महानगरपालिका वगळता सर्व महानगरपालिकांचा कार्यकाळ संपून त्या ठिकाणी प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र आता राज्यातील सत्ता संघर्षानंतर हालचालींना वेग आला असून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून असे संकेत देण्यात आले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आल्याने सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणूकांचा धुरळा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित काढण्यात येत असल्याचा देखील उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे अडीच वर्षे लांबलेल्या निवडणुका आता लवकरच पार पडण्याची शक्यता आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे संकेत दिले होते.

मागील वर्षी २०२२ पर्यंत २७ पैकी २३ महानगरपालिकांचा कार्यकाळ पूर्ण झाला. तर त्याअगोदरच २०२० साली कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि आणखीन तीन मनपाचा कार्यकाळ संपला होता. राज्यातील राजकारणात मागील पाच वर्षांत प्रचंड उलथापालथ झाल्याने आता महानगरपालिका निवडणूकीत कोणता पक्ष याचा फायदा घेईल हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेना भाजपाची युती तुटणे, पुढे महाविकास आघाडी तयार होणे, पुन्हा शिवसेना व राष्ट्रवादीचे विभाजन होऊन भाजप सोबत सत्तेत जाणे या सर्व गोष्टींचे पडसाद महापालिका निवडणुकीत उमटणार आहेत.

संतोष दिवाडकर

Municipal elections in Maharashtra are likely to be held in these months

महाराष्ट्राच्या राजकारणाची झाली भेळ; दिव्यात तरुण शिरले मनसेच्या ताफ्यात

दिवा : महाराष्ट्रातील राजकारणात मागील पाच वर्षांपासून अनेक राजकीय भूकंप होत असल्याचे जनतेने पाहिले आहे. मात्र या सतत होणाऱ्या राजकीय बदलांना आता जनता कंटाळली आहे की काय असे चित्र पहायला मिळू लागले आहे. हेच कारण पुढे करीत दिव्यात आज असंख्य तरुणांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत मनसे मध्ये प्रवेश केला आहे. येत्या काळात हेच चित्र महाराष्ट्रभर सुरू राहील असे यावेळी मनसेच्या पदाधिकार्यांकडून सांगण्यात आले.

शंभरहुन अधिक आमदार असलेल्या भाजप पक्षाने सुरुवातीलाच अजित पवारांना सोबत घेऊन पहाटेचा शपथविधी आटोपला होता. मात्र यानंतर पुन्हा राजकीय भूकंप होऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने अडीच वर्षे महाविकास आघाडीत सरकार चालवले. मात्र यानंतर एकनाथ शिंदेंनी केलेला मोठा बंड पाहता हे सरकार कोसळले आणि शिंदे भाजप सरकार सत्तेत आले. वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन भाग होऊन अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्रातील जनता मात्र चांगलीच संभ्रमात पडली आहे.

राज ठाकरेंचा मनसे पक्ष हा कोणत्याही युती आघाड्यांमध्ये नसून वेळोवेळी राज ठाकरे चालू स्तिथीवर भाष्य देखील करीत आहेत. मनसे हा सत्ता संघर्षापासून अलिप्त असलेला पक्ष असल्याने जनमानसात आमची एक वेगळी ओळख निर्माण होत असल्याचे सांगत कार्यकर्ते समाज माध्यमांवर व्यक्त होऊ लागले आहेत. त्याचबरोबर मनसे आणि राज ठाकरे हाच एकमेव उरलेला पर्याय असल्याचा पोस्ट समाज माध्यमांवर पहायला मिळत आहेत. याच विचारांतून मनसेत इनकमिंग सुरू असल्याचा दावा आता मनसे पदाधिकारी करू लागले आहेत.

संतोष दिवाडकर

In the presence of Raju Patil, the youth entered the MNS party

आर्य गुरुकुल शाळेत जागतिक योग दिवस साजरा

कल्याण : एज्युकेशन टुडे फाउंडेशन द्वारा संचालित नांदिवली स्थित आर्या गुरुकुल शाळेत २१ जून २०२३ रोजी योग सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पालक, शिक्षक, योगप्रशिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम बुधवारी सकाळी ठीक ७:४५ ते १०:०० या वेळेत संपन्न झाला. सीबीएससी ने पुरवलेल्या प्रोटोकॉल नुसार प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. पालकांना व विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याची संधी यात दिली गेली.

आर्या गुरुकुलच्या एक महाराष्ट्र नवनिर्मित व एक एयर एस क्यू एन, एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तसेच ऑनलाइन योगाचे आठ दिवसाचे शिबिर घेण्यात आले. व ऑनलाईन पद्धतीने पालकांचे व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन योगासन शिबिर घेण्यात आले.

इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी सुद्धा योगासने केली व योगसनाची कृती फायदे व लाभ सांगितले. तसेच योग या विषयावर आधारित विद्यार्थ्यांनी पोस्टर मेकिंग सुद्धा बनवलेले आहेत. शिक्षक व पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन योग दिवस अगदी यशस्वी पद्धतीने साजरा केला गेला.

या प्रसंगी विद्यार्थी पालक व शिक्षकांनी संकल्प केला की मी स्वतः एक स्वास्थ शांतिप्रिय आनंद पूर्ण मनुष्य बनवण्याची संकल्पना करतो. माझ्या प्रत्येक कार्यातून विचारही बाजूंना शांती व स्नेहपूर्ण वातावरण बनवण्याचा व पूर्ण जगाला आपल्या समाविष्ट करण्याचा प्रयत्न करीन. आर्या गुरुकुलचे संस्थापक श्रीयुत भरत मलिक सर म्हटले आमचा विश्वास आहे की योगा हे जीवनासाठी महत्त्वपूर्ण आहे. याद्वारे आपण सर्व भेद व सीमा विसरून पूर्ण जग एकत्र करू शकतो .या कार्यक्रमादरम्यान आर्या गुरुकुलच्या चिन्मय सरगम द्वारा रचित व गायलेले गीतेची ध्वनी चालू होती या कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने झाली.

संतोष दिवाडकर

World Yoga Day celebrated at Arya Gurukul School

St. Mary’s High School कल्याणचा एसएससीमध्ये १००% निकाल

St. Mary’s High School :- दहावी बोर्ड परीक्षेत सेंट मेरी हायस्कूल, कल्याणचे विद्यार्थी उत्तुंग यश संपादन करून आले आहेत. एसएससी बोर्ड परीक्षामध्ये 100℅ निकाल मिळविण्याची परंपरा कायम ठेवत, शाळेतील ssc च्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळेचा झेंडा फडकवत ठेवला आहे.

या वर्षी १९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ज्यात 24 विद्यार्थ्यांनी 90℅ आणि त्यावरील 107
विद्यार्थ्यांनी 75℅ गुण मिळवले आहेत. यात टॉपर्स आहेत साक्षी तांबे 95.60℅, श्रेया वंजारी.
95% आणि आर्यन साहू 94℅.

सेंट मेरीज हायस्कूलच्या प्राचार्या दिव्या बोरसे यांनी उत्कृष्ट निकालाबद्दल शाळेचे विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, “मला माझ्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांनी सर्वोत्तम प्रयत्न केल्याबद्दल मला खरोखर अभिमान आहे. हे सर्व त्यांचेच आहे परिश्रम आणि समर्पण ज्याचे फळ मिळाले. आर्य ग्लोबलचे चेअरमन भरत मलिक, नीलम मलिक, बिस्कुटे मॅडम यांनी सेंट मेरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

संतोष दिवाडकर

St. Mary’s High School Kalyan 100% Result in SSC

आर्य गुरुकुल, कल्याण शाळेच्या एन.सी.सी.नेवल विंग छात्र सैनिकांचा CATC कॅम्प मध्ये डंका

कल्याण : आर्य गुरुकुल शाळेच्या एन.सी.सी. नेवल विंग छात्रसैनिकांचा वार्षिक प्रशिक्षण शिबीर क्रं ५३८ कॅम्प डी.ए.वि पब्लिक स्कुल, पनवेल येथे दि.२२ मे २०२३ ते ३१ मे २०२३ दरम्यान संपन्न झाला. सदर कॅम्प मध्ये शाळेचे २५ कॅडेट्स सहभागी झाले होते. या शिबिरात मुंबई ठाणे नाशिक येथील विविध नऊ शाळा आणि काही महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.

शिबिरादरम्यान विविध प्रकारच्या उपक्रम आणि स्पर्धेमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. विद्यार्थी चित्रकला, रीले टग ऑफ वार, ड्रिल, डॉजबॉल इ. स्पर्धेमध्ये भाग घेऊन शाळेला विजेतेपद मिळवून दिले. आर्य गुरुकुलच्या नेवल छात्र सैनिकांनी ड्रील स्पर्धेत द्वितीय तसेच नवल एन.सी.सी. छात्रा अनुश्री अग्रे हिने उत्कृष्ट छात्रा सैनिक या प्रकारात स्वर्ण पदक मिळविले व सांस्कृतिक कार्यक्रमात वैयक्तिक नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तर आर्य गुरुकुल शाळेने व्हॉलीबॉल मध्ये द्वितीय पदक व रिले रेस मध्ये द्वितीय पदक मिळविले. तसेच केयुर पवार व नायजेल कुटिल यांना आदर्श सुत्रसंचालक म्हणून सन्मानित केले. या शिबिरात आर्.डि.सी कमानडऱ सीनियर कैडेट कॅप्टन मुन्ना चौधरी यांच्याशी एन.सी.सी. छात्रा सैनिकांना परस्पर संवाद साधता आला.

विद्यालयाच्या प्राचार्या राधामणी अय्यर यांनी शिबिरात सहभागी छात्रसैनिकांचे त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन आणि कौतुक केले. शाळेचे क्रीडा अधिकारी दीपक वर्मा तसेच माजी एअरफोर्स ऑफिसर आणि शाळेचे व्यवस्थापन अधिकारी अनुप नायर यांचे छात्रसैनिकांना शिबिरापुर्वी मार्गदर्शन लाभले होते. त्यांनीही सर्वांचे अभिनंदन केले. तसेच १ महा. नेवल एन.सी.सी.चे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन के.के. कुर्रा तसेच शिबिर प्रशिक्षक पेटी र्ऑफिसर अर्विन्द शाह यांनीही छात्रसैनिकांचे कौतुक केले. शाळेच्या एन.सी.सी.नेवल विंग थर्ड ऑफिसर भारती नरे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले.

संतोष दिवाडकर

Arya Gurukul, Kalyan School NCC Naval Wing Student Soldiers strike at CATC Camp

The Kerala story impact : हिंदू धर्मीय मुलीने मोडले नियोजित लग्न ?

The Kerala story impact : ‘द केरला स्टोरी’ हा लव जिहादवर आधारित असलेला चित्रपट सध्या देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाचे पडसाद देखील देशभरात उमटू लागलेले आहेत. तर धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काही राज्यांनी या चित्रपटाला बॅन केले आहे. मात्र या चित्रपटामुळे काही मुलींनी आपले ठरलेले लग्न मोडल्याच्या पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागल्या आहेत.

फेसबुकच्या एका ग्रुपवर आलेल्या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले आहे. हिंदू धर्मीय मुलीने नुकताच ‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहून तरुणीने २३ मे रोजी होणारे आंतरधर्मीय नियोजित लग्न रुद्ध केले. असे या पोस्टमध्ये लिहण्यात आले आहे. सोबत या तरुणीचा एका कार्यालयातील पाठमोरा फोटो व एका नोटीशीचा फोटो शेअर केला गेला आहे. या मध्ये तरुणीची माहिती लपवण्यात आली आहे. समाज माध्यमांवरील ही पोस्ट असल्याने तिच्या सत्येतेची पुष्टी आम्ही करीत नाही.

व्हायरल केलेल्या पोस्ट नुसार हा प्रकार गुजरात राज्यातील वडोदरा जिल्ह्यातील आहे. स्पेशल मॅरेज कायद्यानुसार सदर हिंदू तरुणीचे साजिद नावाच्या २७ वर्षाच्या मुस्लिम व्यावसायिक तरुणाशी विवाह होणार होता. मात्र या तरुणीने चित्रपट पाहिल्या नंतर हे लग्नच रुद्ध केल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. बॉक्स ऑफिसवर कमावलेल्या पैशां पेक्षा मुलींचे जीव वाचवणे जास्त महत्त्वाचे असल्याचेही पोस्टमध्ये म्हटले आहे.

संतोष दिवाडकर

The Kerala story impact : Hindu religious girl broke the arranged marriage?

https://www.facebook.com/groups/360609144576990/permalink/1246592649311964/?mibextid=Nif5oz

Raj Thackeray in Kalyan : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा कल्याण डोंबिवली दौरा ठरला

Raj Thackeray in Kalyan : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अलीकडेच कोकण दौऱ्यावर असल्याचे पहायला मिळाले होते. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता १२ तारखे पासून ते ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. याच जिल्ह्यात सर्वाधिक बळ असलेल्या कल्याण डोंबिवलीचा दौरा ते १४ आणि १५ तारखेला करणार आहेत. अशी माहिती ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी बदलापूर येथे झालेल्या आढावा बैठकीत मनसे पदाधिकाऱ्यांना दिली.

जवळपास अडीच वर्षे प्रलंबित असलेली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक यावर्षी होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने मनसे आता या शहरात सक्रिय होत असल्याचे संकेत मिळत आहेत. मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी बदलापूर येथे मनसे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी राज ठाकरेंच्या दौर्याविषयी माहिती दिली. रविवार दि.१४ मे रोजी ते कल्याण मधील पदाधिकार्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. तर सोमवारी १५ मे रोजी डोंबिवलीतील मनसे पदाधिकार्यांची ते भेट घेऊन चर्चा करणार आहेत. पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी हा दौरा असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवली प्रमाणेच राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्रितपणे पार पडण्याची शक्यता आहे. मात्र मागील महापालिका पंचवार्षिक निवडणूकित मनसेची सर्वाधिक ताकद ही याच महानगरपालिकेमध्ये आहे. मनसेचे या महानगरपालिकेत १० नगरसेवक तसेच विरोधी पक्ष नेतेपद होते. शिवाय याच मनपा क्षेत्रात मनसेचे आमदार देखील आहेत. मनसेला याच मनपा क्षेत्रात दोन वेळा आमदारपद मिळाल्याने कल्याण डोंबिवलीत असलेली मनसेची ताकद आणखीन वाढविण्यासाठी मनसे आता काय प्रयत्न करणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

संतोष दिवाडकर

Raj Thackeray in Kalyan: MNS President Raj Thackeray’s Kalyan Dombivali Tour

लिटिल आर्यन्स प्री-के, कल्याणचा एक मंत्रमुग्ध करणारा वार्षिक कार्यक्रम संपन्न

कल्याण : लिटिल आर्यन्स प्री-के चे छोटी छोटी मुले, सेंट मेरीज हायस्कूलचा हा उजवा हात, चक्कीनाका, कल्याण यांनी 18 मार्च 2023 रोजी सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली येथे त्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन दिनाच्या कार्यक्रमात जादू केली. “द व्हाय डू वुई लँड” थीम असलेला वार्षिक कार्यक्रम स्वामिनी विमलानंद आणि राधिका कृष्णकुमार यांनी लिहिलेल्या “व्हाय डू वी” या पुस्तकावर आधारित होता.

2 ते 6 वयोगटातील 300 हून अधिक मुलांनी गायन केले, नृत्य केले, संवाद सादर केले, यश मिळविणार्‍यांची नावे वाचली आणि कार्यक्रम स्वतंत्रपणे केला.

शिक्षकांच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय मुलांनी नाटकाचा प्रत्येक संच कसा सादर केला हे पाहणे अभूतपूर्व होते. लहान आर्य आपल्या मुलांना स्वतंत्रपणे विचार करायला तयार करतात. त्यामुळे मुलं संवाद विसरली किंवा चुका झाल्या तरी त्यांनी जागेवरच परिस्थिती हाताळली आणि यामुळे उपस्थित श्रोते थक्क झाले.

या शोमध्ये भारतीय विधी आणि चालीरीतींमागील खरा अर्थ दाखवण्यात आला आणि आपण दिवा का लावतो, देवाला नारळ का अर्पण करतो, प्रदक्षिणा का करतो, पुस्तकांना आणि कागदांना पायांनी हात लावू नये असे न सांगितलेले नियम आणि त्यामागील अर्थ अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. नमस्ते हा शब्द स्थापित करणे. व्हर्च्युअल रिअॅलिटी व्हिडीओ गेमद्वारे अप्रतिम चित्रण मुलांसाठी तसेच तरुण पालकांसाठी अधिक मनोरंजक बनले. सुंदर संस्कृत मंत्रोच्चार, मंत्रमुग्ध करणारे नृत्य सादरीकरण आणि शानदार होस्टिंगने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. निवेदिता चासकर, सहाय्यक. महाव्यवस्थापक, निप्पॉन पेंट इंडिया प्रा. लिमिटेड आणि रोटरी क्लबच्या अध्यक्षा, रिजन्सी इस्टेट यांनी व्यक्त केले की तरुणांना स्टेजवर अशा कृपेने आणि आत्मविश्वासाने सादरीकरण करताना पाहून मला आनंद झाला. मॉडेल कॉलेजच्या पर्यवेक्षिका आणि लेक्चरर निशा नरेंद्र पिल्ले, मुलांनी आपल्या अभिनयातून सर्व मोठ्यांना खूप काही शिकवले असे दिसून आले.

व्यासपीठावर आपली मते मांडताना डॉ. नीलम मलिक, डायरेक्टर, लिटिल आर्यन प्री-के यांनी विचारले, “आमच्या सर्व लिटिल आर्यन शाळांमध्ये इतके उपक्रम का आहेत? कारण क्रियाकलापां दरम्यान शिकलेली कौशल्ये मुलांना पुढील शिक्षण आणि त्यांच्या व्यावसायिक जीवनात मदत करतात. अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि त्यात सहभागी होणे हा आजच्या जगात अत्यंत आवश्यक असलेल्या डिझाइन थिंकिंगचा आधार आहे.”

सेंटचे माजी विद्यार्थी. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मेरीज हायस्कूलने विशेष पाहुणे म्हणून सांगितले की शाळेने त्यांना स्वतःला शोधण्यासाठी आणि आत्मविश्वास आणि उत्तम व्यक्तिमत्त्वात तयार होण्यासाठी एक अद्भुत व्यासपीठ कसे दिले. कु. अंकित अय्यर म्हणाले, “सेंट येथील शैक्षणिक मेरी नेहमीच वेळेच्या पुढे होती आणि हे वार्षिक दिवसाच्या कार्यक्रमात स्पष्ट होते. शाळा चांगली मूल्ये रुजवते आणि ज्ञान ही शक्ती आहे.” तिने सेंट. मेरी जेथे मुले नृत्य, गायन, वक्तृत्व आणि अशा अनेक क्रियाकलापांद्वारे ते काय चांगले आहेत हे शोधू शकतात.

अक्षय अय्यर यांनी मत व्यक्त केले, “शाळेतील वार्षिक दिवस आयोजन समितीचा एक भाग असल्याने विद्यार्थ्यांना नेतृत्वाच्या अनेक पैलूंबद्दल माहिती मिळाली आणि व्यवस्थापन कौशल्ये विकसित झाली. शाळा बॉलीवूडच्या बरोबरीने बायोपिकचे चित्रण करत आहे. शाळेने तंत्रज्ञान कसे सहज आत्मसात केले याचे त्यांनी कौतुक केले.

सेंट. मेरीज हायस्कूल आणि लिटल आर्यन प्री-के या मायक्रोसॉफ्ट शोकेस शाळा आहेत.
सर्वात शेवटी, सौ. विंदा भुष्कुटे, सीईओ, अनुपालन येथे सेंट. मेरी च्या चार्ज अप

तिच्या प्रेरणादायी भाषणातून श्रोते. वार्षिक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये मुलांना सहभागी होण्यासाठी तयार करण्यात पालकांच्या सहभागाचे तिने कौतुक केले आणि शिक्षक, केंद्रप्रमुख, पालक आणि लिटिल आर्यन प्री-के मधील छोट्या आश्चर्यांसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी टाळ्यांचा कडकडाट झाला.

संतोष दिवाडकर

Annual program of Little Aryan’s Pre-K Kalyan concluded

लिटल आर्यन्स चा वार्षिक स्नेह संमेलन दीन साजरा

कल्याण :- लिटल आर्यन्स प्री-के, आर्य गुरुकुल शाळेची प्री-स्कूल शाखा, नांदिवली यांनी 11 मार्च 2023 रोजी सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली येथे त्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन दिन कार्यक्रम आयोजित केला होता. “द व्हाय डू वुई लँड” थीम असलेला वार्षिक कार्यक्रम स्वामिनी विमलानंद आणि राधिका कृष्णकुमार यांनी लिहिलेल्या “व्हाय डू वी” या पुस्तकावर आधारित होता.

2-6 वर्षे वयोगटातील 500 हून अधिक मुलांनी गायन केले, नृत्य केले, संवाद सादर केले, यश मिळविणार्‍यांची नावे वाचून दाखवली आणि कार्यक्रम स्वतंत्रपणे केला.हा शो भारतीय विधी आणि चालीरीती आणि त्यामागे दडलेला अर्थ याभोवती फिरत होता. त्यामुळे आपण दिवा का लावतो, देवाला नारळ का अर्पण करतो, प्रदक्षिणा का करतो, पुस्तकांना आणि कागदांना पायांनी हात लावू नये असे न सांगितलेले नियम आणि नमस्ते या शब्दामागील अर्थ उलगडला.

हे व्हर्च्युअल रिअॅलिटी व्हिडीओ गेमच्या रूपात चित्रित करण्यात आले आहे जेणेकरून ते मुलांसाठी तसेच तरुण पालकांसाठी अधिक मनोरंजक बनले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉ. वैभव एस. भानावत, वैद्यकीय संचालक आणि भारतीय वैद्यकीय सल्लागार आणि सन्माननीय पाहुण्यांसह, मास्टर आराध्या पांडेजी, महाराष्ट्र एअर एनसीसी युनिटच्या कॅडेट सार्जंट आणि आर्य गुरुकुल, नांदिवलीच्या विद्यार्थिनी, मिस श्रिया पारेख, माजी विद्यार्थी एलए आणि एजी, राष्ट्रीय स्तरावरील रायफल शूटर आणि वैद्यकीय विद्यार्थी, डॉ. भित्रलेखा रे, व्हीपी- महिला कल्याण संस्था, ऑर्डिनन्स फॅक्टरी आणि श्री. गुरुदत्त रे, डायरेक्टर एचआर, यंत्र इंडिया.

असा अनोखा कार्यक्रम पाहून पाहुण्यांना अत्यानंद झाला आणि त्यांनी चिमुरड्यांबद्दलचा गौरव उद्गार काढले. कु. श्रिया पारेख म्हणाल्या, “लिटल आर्यनमध्ये मला आत्मविश्वासाने व्यक्त होण्याच्या दिशेने पहिले पाऊल मिळाले आणि पुढे आर्य गुरुकुलमध्ये मला उडण्यासाठी पंख मिळाले.”

संचालक, डॉ. नीलम मलिक यांनी खुलासा केला, “लिटल आर्यन प्री-के मुलांना चुका करण्याची, शिकण्याची आणि अधिक आत्मविश्वास निर्माण करण्याची संधी देण्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळे, हे लक्षात आले आहे की संपूर्ण कार्यक्रम शिक्षकांच्या कमीतकमी हस्तक्षेपासह लहान मुलांनी चालवला आहे. प्रत्येक गाणे मुलांनी स्वतः गायले आहे आणि रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये प्री-रेकॉर्ड केलेले आहे. आम्ही कोणत्याही चित्रपटातील गाणी वापरत नाही.

कार्यक्रमादरम्यान एक साक्षीदार तरुण प्रीस्कूलर सहजतेने संस्कृत शोलाचे पठण करतात, सरस्वती वंदना आणि गणेश आरती गातात आणि पूर्ण आत्मविश्वासाने आणि योगासने करतात.

अध्यक्ष, श्री. भरत मलिक म्हणाले, “चिन्मय मिशन स्कूल असल्याने भारतीय संस्कृती आणि परंपरा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आजच्या वार्षिक दिवसाचा उद्देश हे दाखविण्याचा होता की आपल्या बहुतेक प्रथांमध्ये काही वैज्ञानिक आणि तार्किक तर्क असतात आणि आपल्या मुलांनी, भावी भारतीयांनी आपल्या संस्कृतीचा समान अभिमान बाळगावा आणि तिचे वेगळेपण जपावे अशी आमची इच्छा आहे.”

चांगली मूल्ये आत्मसात करण्यासाठी, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि फरक असलेले प्रीस्कूल बनण्यासाठी यासारखे प्रयत्न करावे लागतात.

संतोष दिवाडकर

Celebrating Little Aryan’s annual love meeting