कल्याण : कल्याण पूर्व कोळसेवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत, Kalyan police आनंदवाडी डबल टॉवर जवळ असलेली पोलीस चौकी अनेक दिवसांपासून बंद आहे. या बंद पोलीस चौकीमुळे परिसरातील लोकांमधे असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. येथून ये जा करणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी विशेषतः महिला वर्ग ज्यांना याच परिसरातून रात्री ये जा करावी लागते त्यांना या बंद पोलीस चौकीमुळे असुरक्षितता वाटत असून ही बंद असलेली पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.
कल्याण विकासिनी संस्थेचे अध्यक्ष ऍड. उदय रसाळ यांनी कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांना पत्र लिहित या विषयाकडे लक्ष वेधले आहे. बंद असलेली पोलीस चौकी पुन्हा नव्याने सुरू करून नागरिकांना सुरक्षिततेचा आधार द्यावा अशी मागणी आता केली जात आहे.
कल्याण शहरातील अनेक भागात पोलीस चौक्या उभारण्यात आलेल्या आहेत. यातील काही चौक्या या आजतागायत सुरू आहेत तर काही चौक्या या बंद अवस्थेत उभ्या आहेत. यातीलच आनंदवाडी या भागातील चौकी देखील बंद असून ती पुन्हा सुरू होण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
-कुणाल म्हात्रे
Demand for reopening of Anandwadi police station in Kalyan