कल्याण-डोंबिवली घडामोडी लेख

कल्याण पूर्व विधानसभा आणि मनसे

Kalyan East MNS : राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केली. त्यानंतर २००९ साली प्रथमच विधानसभा निवडून १३ आमदार निवडून आले. ज्यात २ आमदार हे कल्याण पश्चिम आणि ग्रामीणचे होते. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत मनसेची ताकद ही तेव्हापासूनच आहे असे दिसते. पण मनसेने इतकी ताकद असतानाही तेव्हा कल्याण पूर्वेत उमेदवार का दिला नाही? आणि अजूनही मनसे कल्याण पूर्वेत उमेदवार का उभा करीत नाही याबद्दल अजूनही मनसेमध्ये नाराजीची भावना कायम आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये मनसेचे सर्वाधिक ताकद असल्याचे मानले जाते. कारण २००९ साली याच भागात मनसेला मिळालेले २ आमदार आणि २०१० साली मनसेने महापालिका निवडणुकीत मिळवलेले भरघोस यश आणि २७ नगरसेवक. इतकेच नव्हे तर मनसेचे वाईट दिवस असतानाही मनसेने १० नगरसेवक २०१५ साली निवडून आणले होते. जर इतकी ताकद या शहरात मनसेची आहे तर महापालिका क्षेत्रातील सर्व चार जागा मनसेने लढवायला हव्यात असे राजकीय विश्लेषक म्हणतात.

डोंबिवलीत रवींद्र चव्हाण तर कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड हे २००९ पासून सलग निवडून येत आहेत. मागील निवडणूकित मनसेने डोंबिवलीची जागा लढवून रवींद्र चव्हाण यांना टक्कर दिली होती. मनसेचे उमेदवार मंदार हळबे जे आता भाजपात आहेत त्यांनी चांगले मतदान मिळवले होते. पण मनसेने मात्र कल्याण पूर्वेत उमेदवार दिला नव्हता. त्याअगोदर २०१४ साली सक्षम पर्याय असतानाही कल्याण पूर्वेत कमजोर उमेदवार मनसेने अचानकपणे उभा केला होता. तरीही मनसेने साडे सात हजार मते मिळवली होती.

२००९ साली मनसेची लाट असताना आणि कल्याण डोंबिवलीत प्रचंड ताकद असताना कल्याण पूर्वेत उमेदवार का दिला नाही असा प्रश्न अजूनही वारंवार विचारला जातो. मात्र मनसेतुन बाहेर पडलेले जुने समर्थक या ठिकाणी गौडबंगाल झाले असे अजूनही सहज सांगतात. इतकेच नव्हे तर यामागे कोणाचा हात आहे तेही सांगतात.

तर मनसेचे आले असते १४ आमदार… कल्याण पूर्वेत वारंवार निवडून येणारे गणपत गायकवाड हे पहिल्यांदाच कल्याण पूर्वेतून निवडणूक लढवीत होते. याच काळात मनसे जोरावर होती. जर मनसेने कल्याण पूर्वेत उमेदवार उभा केला असता तर कदाचित तो उमेदवार निवडणुही आला असता. मनसेची संख्या ही १३ ऐवजी १४ ही असली असती. तसेच कल्याण पूर्वेला गणपत गायकवाड हे नेतृत्व कदाचित तेव्हा मिळाले नसते असेही बोलले जाते.

कल्याण पूर्वेत आजही मनसेचे कट्टर कार्यकर्ते आणि समर्थक आहेत. मात्र आजवर मनसेला कल्याण पूर्वेत वाढू दिले जात नाही असे गंभीर आरोप ऐकावयास येतात. त्यामुळे कल्याण पूर्वेत मनसेची मत इतरांच्या पारड्यात टाकली जातात. जर मनसे ताकद नसलेल्या ठिकाणी उमेदवार देऊन राज्यात १३९ जागा लढवत आहे. मग ताकद असलेल्या कल्याण डोंबिवलीतील कल्याण पूर्वेत उमेदवार का देत नाही असा सवाल आजही कायम आहे.

यंदाच्या निवडणुकीत मनसे कल्याण पूर्वेची जागा लढवणार असल्याची चर्चाही होती. शिवाय इतर पक्षातील एक उमेदवार या भागातून मनसेतुन निवडणूक लढण्यासाठी तयार असल्याचेही बोलले जात होते. मात्र सरते शेवटी पुन्हा एकदा मनसेने ही जागा सोडली आणि कार्यकर्ते नाराज झाले असे चित्र आहे. आता हेच नाराज कार्यकर्ते आपले मत कुणाच्या पारड्यात टाकणार हे आता पहावे लागणार आहे.

Kalyan East Assembly and MNS

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *