कल्याण : कल्याण शिव-भीम मिठाई, मावा, खवा, ट्रान्सपोर्ट, चालक, मालक व्यापारी, कामगार संघटना कल्याण येथे कार्यरत असून सदर संघटना दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, खवा, इत्यादी विक्री व वाहतूक करणारे व्यापारी कामगार वाहतूकदार यांचे न्याय हक्कासाठी लढत असते. या संघटनेने दिवाळी निमित्ताने समाजात फ्रंटलाईनवर कार्यरत असलेले पोलीस, पत्रकार व वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना मिठाई देऊन त्यांचे तोंड गोड केले. तसेच संपूर्ण समाजातून कल्याण शिव भीम संघटनेच्या या कार्याचे कौतुक करीत त्यांचे आभार मानले.
दरवर्षी रक्षा बंधन, दसरा, गणेश उत्सव दिवाळी सणानिमीत्त खवा विक्री व वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच बनावट खव्याच्या नावावर काही तोतया पोलीस, पत्रकार, अधिकारी, खंडणी खोर कार्यकर्ते हे व्यापारी, दुकानदार व वाहतूकदार यांना त्रास देतात. वेळ दवडून तपासणी करायची नसेल तर खंडणी मागितली जाते. सदर बाबतीत संघटनेचे संस्थापक तथा कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, कल्याण पश्चिम आमदार विश्वनाथ भोईर, संघटना अध्यक्ष सागर पगारे, सचिव जयदीप सानप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध मंत्री बाबा अत्राम तसेच अन्न व औषध सह आयुक्त सुरेश देशमुख, पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त नवनाथ ढवळे, पोलीस उप आयुक्त डॉ सुधाकर पाठारे, वाहतूक पोलीस उप आयुक्त डॉ विनयकुमार राठोड, सहायक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे, सहायक पोलिस आयुक्त वाहतूक विभाग मंदार धर्माधिकारी, पत्रकार व सर्व वरीष्ठ अधीकारी कर्मचारी यांना निवेदन देऊन पत्र व्यवहार करून प्रत्यक्षात भेटुन खव्या बाबत जनजागृती करून दिली.

बनावट खवा म्हणजे काय? त्या बाबत संघटनेने प्रसार माध्यमांवर माहिती देऊन जनजागृती केली. या बाबतीत सर्व अधिकाऱ्यांनी खातर जमा करत सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या अधीपत्या खालील अधिकारी कर्मचारी यांना लेखी सूचना केली की व्यापारी संघटना व व्यापारी यांवर गैर प्रकारे कार्यवाही करू नयेत तसेच बनावटी पोलीस, पत्रकार, खंडणी खोर यांच्यावर कार्यवाही करावी. व्यापाऱ्यांना सहकार्य करावे. अशा सूचना दिल्याने अडवणूक करणारे तसेच खंडणी खोर यांच्यावर अंकुश बसला असून व्यापाऱ्यांनी निर्धास्तपणे व्यवसाय केला. असे म्हणत संघटना सचिव जयदीप सानप यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले. तसेच दरवर्षी असेच सहकार्य मिळण्याची त्यांनी आशा व्यक्त केली.

सण उत्सवात व्यस्त असणारे पोलीस व न्याय हक्कासाठी लढणारे लोकशाहीचा चौथा आधार स्थंभ मानले जाणारे पत्रकार यांना दिवाळी निमित मिठाई वाटप करण्यात आली. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मुंब्रा, टिटवाळा, तलासरी येथे एकुण दोन हजार मिठाई बॉक्स वाटप करण्यात आले. मिठाई वाटप करताना अरविंद मोरे, जयदीप सानप, सागर पगारे, राजा जाधव, विनोद शिंपी, पवन पाटिल, अशोक पाटिल उपस्थिती असल्याची माहिती जयदीप सानप यांनी दिली आहे.
Kalyan Shiv Bhim organization distributed sweets to frontline workers and made Diwali sweet
